‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने मोठी धास्ती घेतली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ‘छात्रों की गुंज’वर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी गेल्या १३ वर्षांत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांसाठी काय केले, हे जाहीर करावे. सरकारने विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले असते तर दिल्लीतील […]

अधिक वाचा..

VJTI वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर ॲड. अमोल मातेले आक्रमक; प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टीमेटम

मुंबई : वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI), माटुंगा येथील वसतिगृहातील अस्वच्छता, दूषित पिण्याचे पाणी, बंद वॉटर कूलर व गीझर, उघड्या विद्युत वायरी आणि अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ॲड. अमोल मातेले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत ॲड. मातेले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने VJTI चे संचालक डॉ. सचिन कोरे यांची […]

अधिक वाचा..

शाळेजवळ बिबट्याचा वावर; विद्यार्थी, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील शिवतक्रार म्हाळुंगी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ बिबट्याचा वावर आढळून आल्याने पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात ऊस असल्याने बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित अधिवास मिळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भरत दौंडकर यांच्या निदर्शनास बिबट्याचा वावर आल्यानंतर अंगणवाडी शिक्षिका लक्ष्मी भोसले […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करून सामाजिक कार्यात सहभागी व्हावे; चंद्रकांत पाटील

मुंबई: विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग विधायक कामांसाठी करत सामाजिक जाणीव जोपासावी. समाजाच्या गरजा तसेच स्वतःची आवड आणि क्षमता ओळखून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. मंत्रालयात चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैयक्तिक अडचणी जाणून घेतल्या. यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या […]

अधिक वाचा..

सीओईपीच्या शुल्क रचनेत सुधारणा; विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परताव्याचा अधिक लाभ मिळणार

मुंबई : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्क रचनेत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निर्देशानुसार ही कार्यवाही करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यापीठाने जाहीर केलेल्या शुल्क रचनेबाबत विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. १८) […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी विद्यापीठांनी तत्परतेने कार्यवाही करावी; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आरोग्य सुविधा आणि विद्यार्थीपूरक वातावरण उपलब्ध करून देणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह सर्वांगीण विकासाला पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठांनी संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कार्य करावे, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाइन बैठक मंत्रालयात पार […]

अधिक वाचा..

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई येथील युवा उद्योजक व समाजसेवक अमोल रामदास पुंडे यांनी विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप केले. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास सुलभ होणार असून परिसरात त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […]

अधिक वाचा..

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे ‘नशामुक्त मुंबई’ अभियानाची सुरुवात 30 जुलै रोजी वरळी डोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हे अभियान केवळ उद्घाटनापुरते मर्यादित नसून, वर्षभर चालणारी व्यापक जनजागृती मोहीम असेल, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. अभियानाच्या पूर्वतयारीसंदर्भातील आढावा बैठकीत […]

अधिक वाचा..

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेतले जाणार नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलिसावर तात्काळ कारवाई करून त्याला सेवेतून बडतर्फ व अटक करण्याचीही त्यांनी मागणी केली. या पार्श्वभूमीवर सपकाळ, काँग्रेस […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व विधानमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत, “हे सरकार शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेले निष्ठूर सरकार आहे. लोकशाही मार्गाने न्याय मागणाऱ्यांना लाठ्यांनी उत्तर देणे ही लोकशाहीची गळचेपी […]

अधिक वाचा..