विकसित भारत संवाद’ ऑनलाइन व्याख्यानमालेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. मंत्री श्री. […]

अधिक वाचा..

पंतप्रधानांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध आणि चित्रकला स्पर्धा

मुंबई: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा (दि. 17) सप्टेंबर, 2025 रोजी 75 वा वाढदिवस आहे. या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. सर्वसाधारणपणे राष्ट्र प्रथम, आत्मनिर्भर भारत, स्वदेश, ऑपरेशन सिंदूर, पर्यावरण हे या स्पर्धांचे विषय असणार आहेत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला मिळाला सन्मान

शिरूर (अरुणकुमार मोटे): हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा होणारा राष्ट्रीय क्रीडा दिन यंदा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, मलठन येथे विविध क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि क्रीडागणात जोशाचे वातावरण पाहायला मिळाले. या निमित्ताने कबड्डी, खो-खो तसेच क्रीडांगण मापनाशी संबंधित प्रश्नमंजुषा यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवासाठी शाळांना किती दिवसांची सुट्टी, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

पुणे: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, या उत्सवासाठी शाळांना किती दिवस सुट्टी मिळणार याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. यंदा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होत असून, ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. या ११ दिवसांच्या उत्सवादरम्यान शाळांना मिळणाऱ्या सुट्ट्यांबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे मुंबई आणि कोकणातील शाळांना किती सुट्ट्या मुंबई आणि कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या […]

अधिक वाचा..

पदविका प्रवेशाला विक्रमी प्रतिसाद; १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश

मुंबई: राज्यातील पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंत १ लाख ३ हजार ११५ विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. हा मागील दहा वर्षांतील सर्वोच्च आकडा असून, प्रवेशाची टक्केवारी तब्बल ९३ टक्क्यांवर पोहोचली आहे. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून प्रवेशाची अंतिममुदत १४ ऑगस्टवरून दि. ४ सप्टेंबर २०२५ […]

अधिक वाचा..

सविंदणे येथे जाणीव शैक्षणिक १ संकल्पना ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच श्री गुरुदेव दत्त विद्यालय येथे जाणीव शैक्षणिक १ संकल्पना ट्रस्ट यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी वह्या व खाऊ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे प्रमुख प्रणेते ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष रवींद्र ढगे,आपटी असून, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ढगे आणि सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गव्हाणे यांच्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील बिबट प्रवण भागात विद्यार्थ्यांची जनजागृती; सहजीवनाचा संदेश देत वनविभागाचा उपक्रम

शिरूर(अरुणकुमार मोटे): “बिबट हा शत्रू नाही, जंगलाचा अविभाज्य घटक आहे” या संदेशासह शिरूर वनविभागाने बिबट प्रवण भागातील टाकळीहाजी, पिंपरखेड, चांडोह, जांबुत येथे विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केले होता. माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे प्रोजेक्ट मॅनेजर महेंद्र ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात तेथील मुलांना, पालकांना बिबट्याच्या जीवनशैली, स्वभाव, सवयी तसेच मानव–बिबट संघर्ष कमी करण्यासाठी घ्यावयाच्या […]

अधिक वाचा..

मुंबई, हिंदू सण ‘रक्षाबंधन’ दिवशी परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावना पायदळी तुडवण्यासारखे; अ‍ॅड. अमोल मातेले

मुंबई: भारतीय परंपरेतील बंधुत्वाचे प्रतीक आणि पवित्र हिंदू सण – रक्षाबंधन यावर्षी ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा केला जात आहे. त्याच दिवशी “ज्युनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट” ही महत्त्वाची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी आहे. रक्षाबंधन हा सण बहिणी आणि भावामधील अतूट प्रेम, विश्वास व सुरक्षा यांचे प्रतीक आहे. वर्षभर बहिण […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील सर्वच शाळांना ऑगस्ट महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या व त्याची कारण काय

मुंबई: ऑगस्ट महिना सुरू होण्याआधीच राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुढील ऑगस्ट महिन्यात अनेक दिवस सुट्ट्या राहणार आहेत. खरंतर महाराष्ट्रात श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. श्रावण हा महिना अध्यात्मिक साधनेचा काळ असतो. हा असा महिना आहे ज्या महिन्यात सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होते. या महिन्यात […]

अधिक वाचा..

या वर्षीपासून इयत्ता चौथी, पाचवी, सातवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची होणार शिष्यवृत्तीची परीक्षा

सोलापूर: चालू शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीची परीक्षा इयत्ता चौथी, पाचवी आणि सातवी, आठवी या चार वर्गांसाठी घेण्यात येणार आहे. तर पुढील शैक्षणिक वर्षापासून फक्त चौथी व सातवीच्या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. प्राथमिक शिक्षक संघटनांच्या या मागणीला शालेय शिक्षण विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. आतापर्यंत चौथी व सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. मात्र, २०१६ […]

अधिक वाचा..