vaishnavi-jamkar-lonikand

लोणीकंद येथील ‘वैष्णवी’ने सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच संपवलं जीवन…

पुणे : सासरच्या जाचाला कंटाळून लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यात युवतीने आपलं जीवन संपवल्यामुळे लोणीकंद परिसरात खळबळ उडाली आहे. वैष्णवी जामकर असे आत्महत्या केलेल्या विवाहीत युवतीचे नाव आहे. सासरच्या लोकांकडून, छळ करत पैशाची मागणी करण्यात येत असल्याने वैष्णवीने घरातच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, मुलीच्या कुटुंबीयांकडून दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये सासू-सासरा […]

अधिक वाचा..

बारामतीत २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बारामती (पुणे): प्रेमसंबंधातून झालेल्या कथित फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळाला कंटाळून २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरातील रुई बयाजीनगर येथे घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाणे येथे पुण्यातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाचे नाव विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय २३, रा. रुई बयाजीनगर, बारामती) […]

अधिक वाचा..

भर वर्गात गोळीबार! विद्यार्थिनीची हत्या करून तरुणाची आत्महत्या

तरनतारन (पंजाब): पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यात एका विधी महाविद्यालयात घडलेल्या थरारक घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. भर वर्गात एका विद्यार्थ्याने आपल्या सहाध्यायी विद्यार्थिनीवर गोळी झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वर्ग सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली. […]

अधिक वाचा..

MD च्या स्वप्नाला ब्रेक! MBBS झालेल्या डॉक्टरची आत्महत्या

नागपूर: शहरातील एका हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागातील निवासी डॉक्टर ऋत्विक सागर ठाकूर (वय २६) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. बुलढाणा (चिखली) येथील रहिवासी ऋत्विकने मुंबईतील सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज व के.ई.एम. रुग्णालयातून एमबीबीएस पूर्ण केले होते. वडील डॉ. सागर ठाकूर व आई दोघेही डॉक्टर असून, बहीण देखील […]

अधिक वाचा..

पाबळ हादरले! घरगुती वादातून विवाहितेची दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या 

पाबळ (सुनिल जिते): पाबळ (ता. शिरूर) येथे पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. राजू पांडुरंग जाधव असे आरोपी पतीचे नाव असून अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०), […]

अधिक वाचा..

पुण्यात पुन्हा हुंडाबळी! सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; जबरदस्तीच्या गर्भपाताचा गंभीर आरोप

पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरात हुंडाबळीच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच, पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ […]

अधिक वाचा..

हत्या की आत्महत्या! MPSC परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या सचिन जाधव यांचा संशयास्पद मृत्यू

बीड: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत २०१२ साली राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेले, इंग्रजी व्याकरणाचे प्रसिद्ध लेखक व राज्यकर अधिकारी सचिन नारायण जाधव यांचा बीड जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जाधव हे रात्री घरी परत न आल्याने त्यांच्या पत्नीने आज सकाळी शिवाजीनगर पोलीस […]

अधिक वाचा..

आत्महत्येच्या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्याची वाढीव कलमे

डॉ. नीलम गोऱ्हे आणि अंनिस यांच्या पाठपुराव्याला यश नाशिक: पंचवटी येथील नेहा पवार आत्महत्या प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली आहे. महिलेच्या सात पानी चिठ्ठीत नमूद केलेल्या गंभीर बाबींचा अभ्यास करून नाशिक पोलिसांनी महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा २०१३ मधील कलम २(क) आणि २(ख) आता प्रकरणात समाविष्ट केले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. […]

अधिक वाचा..

केरळमधील इंजिनिअर आनंदू अजि यांच्या आत्महत्येस जबाबदार लोकांवर कारवाई करा

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत केरळमधील तरुण आयटी इंजिनिअर आनंदू अजि यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व मुंबई युवक काँग्रेसने आज दादर येथील काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनच्या परिसरात तीव्र आंदोलन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा सरकारविरोधात घोषणा दिल्या. युवक […]

अधिक वाचा..

सरकारने ओबीसी समाजाचा केला विश्वासघात! त्या तरुणाने केलेल्या आत्महत्येला महायुती सरकार जबाबदार

नागपूर: लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदारी गावातील भरत कराड या ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. हे वृत्त धक्कादायक आहे. ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निराशेने या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. गेले काही दिवस मुख्यमंत्र्यांपासून ते ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष सांगत आहे की सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा येणार नाही पण हाच […]

अधिक वाचा..