मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची चिमुरडी हरवल्याची घटना घडली. गर्दीत आई-वडिलांपासून ताटातूट झाल्याने ती मुलगी प्रचंड घाबरलेली होती. डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर थरथर—स्वतःचे नाव सांगतानाही तिचा आवाज दाटून येत होता. सकाळच्या सुमारास पाठीवर काळी बॅग असलेली, रडत आणि घाबरलेल्या अवस्थेत एकटी फिरताना ही मुलगी दिसली. […]

अधिक वाचा..

खडकवासला धरण परिसरात सतर्क सुरक्षारक्षकामुळे युवती सुरक्षित घरी

पुणे: खडकवासला धरण परिसरात रात्री नऊच्या सुमारास १५ ते १६ वर्षांच्या एका युवतीला तिचा मित्र एकटीला सोडून निघून गेल्याची घटना घडली. अंधारात ती एकटी उभी असताना धरण परिसरातील सुरक्षारक्षक हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड यांच्या सतर्कतेमुळे तिला वेळेवर मदत मिळाली आणि पोलिसांच्या माध्यमातून ती सुखरूप घरी पोहोचली. मिळालेल्या माहितीनुसार, ही युवती गुरुवारी (ता. १२) आपल्या चुलतभावासोबत धरण परिसरात […]

अधिक वाचा..

लष्करी अधिकाऱ्याच्या धाडसामुळे पुण्यात भीषण अपघातातून चालकाचे प्राण वाचले

कारमधील लाखो रुपयांची रोकडही सुरक्षित पुणे: पुणे शहरात माणुसकी, धैर्य आणि कर्तव्यभावनेचं दर्शन घडवणारी एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. वानवडी परिसरात झालेल्या भीषण अपघातात नाल्यात कोसळलेल्या कारमधील चालकाचे प्राण लष्करी अधिकारी आशिष कुमार यादव यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ जीव वाचवला नाही तर कारमध्ये असलेली लाखो रुपयांची रोकडही सुरक्षितपणे चालकाकडे सुपूर्द केली. […]

अधिक वाचा..

पोलिसांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे हरवलेला मोबाईल सापडल्याने त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच…

ट्रॅफिक पोलीस राजेंद्र वाघमोडे यांचे स्तुत्य कार्य शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बी.जे. कॉर्नर परिसरात वाहतूक नियमन करत असताना ट्रॅफिक पोलिसांनी दाखवलेली सजगता व प्रामाणिकपणा याचे कौतुक होत आहे. शिरूर पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक पोलीस राजेंद्र वाघमोडे यांनी रस्त्यावर सापडलेला मोबाईल फोन योग्य तपासणी करून तो प्रत्यक्ष मालकाच्या हाती परत करताना मानवतेचे उत्तम उदाहरण घालून दिले. […]

अधिक वाचा..

पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्लांना हटवल्याबद्दल धन्यवाद, पण…

मुंबई: वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना भाजपा युती सरकारने बेकायदेशीपणे दोन वर्षाची मुदतवाढ देत त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले होते. रश्मी शुक्ला या सत्ताधारी भाजपाला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याने त्यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती त्या मागणीला यश आले आहे. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले त्याबद्दल धन्यवाद […]

अधिक वाचा..

सुप्रीम कोर्टाला धन्यवाद; न्यायदेवतेवरील आमचा विश्वास आणखी दृढ झाला

मुंबई: आमचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाला धन्यवाद देत न्यायदेवतेवरील आमचा विश्वास आणखी दृढ झाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे यांनी दिली आहे. नवाब मलिक यांचा पक्षाच्या ध्येय धोरणांमध्ये आणि पक्षाच्या वाटचालीत सिंहाचा वाटा राहिला आहे. […]

अधिक वाचा..