मुंबईतील विधानभवन, उच्च न्यायालय, बीएसई व मेट्रोला बॉम्बची धमकी; सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी; विजय वडेट्टीवार

मुंबई: मुंबईतील विधानभवन, मुंबई उच्च न्यायालय, बीएसई आणि मेट्रोला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची सरकारने अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारची धमकी येणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. औचित्याच्या […]

अधिक वाचा..

विधानभवन येथे महिला सुरक्षा सेफ्टी ऑडिटचा आढावा; तातडीच्या अंमलबजावणीचे निर्देश

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात करण्यात आलेल्या राज्यव्यापी सेफ्टी ऑडिटचा आढावा घेण्यासाठी विधानभवन येथे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना आणि स्वारगेट बसस्थानकावरील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यातील २४२ ठिकाणी करण्यात आलेल्या सेफ्टी ऑडिटमधील शिफारशी तातडीने आणि निश्चित […]

अधिक वाचा..

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात उत्साह;

‘जावे विनोदाच्या गावा’ रंगला, ‘लोकसेवेचा लोकजागर’ ग्रंथाचे प्रकाशन मुंबई: कविश्रेष्ठ कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन आज विधान भवनात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे आयोजित ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमात अभिजात मराठी साहित्यातील विनोदी साहित्याचे अभिवाचन, संवाद आणि सांस्कृतिक सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली.याचवेळी वि. स. पागे […]

अधिक वाचा..

विधानभवन लॉबीतील मारामारीला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार; प्रायश्चित म्हणून राजानीमा द्या

भाजपाने जे पेरले तेच उगवले; विरोधकांच्या अंगावर सोडण्यासाठी भाजपने गुंड; मवाली पोसले मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असेच म्हणावे लागेल. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, महिला सुरक्षित नाहीत, ड्रग्जचा सुळसुळाट जोरात सुरु आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीकविमा, बेरोजगारी यातील एकाही प्रश्नावर ना सविस्तर चर्चा […]

अधिक वाचा..

विधान भवन, मुंबई येथे 23 व 24 जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद

अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रण यासाठी अंदाज समितीची भूमिका… मुंबई: भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला 75 वर्षे पूर्ण होत असून या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान भवन, मुंबई येथे 23 व 24 जून, 2025 रोजी या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून लोकसभा अध्यक्ष […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र विधान मंडळाच्या समित्यांच्या एकत्रित उद्घाटन कार्यक्रम सोहळा १४ मे रोजी विधान भवनात होणार 

मुंबई: महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४-२०२५ या वर्षासाठीच्या समित्यांचे एकत्रित उद्घाटन कार्यक्रम १४ मे बुधवार २०२५ रोजी. सकाळी११.३० वाजता विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित केला आहे महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४-२०२५ या वर्षासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या समित्या.२३ एप्रिल२०२५. रोजी. समित्या शासनाने जाहीर केल्या होत्या या सर्व समित्यांचे एकत्रित उद्घाटनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक१४ मे २०२५ रोजी. सकाळी […]

अधिक वाचा..

शक्तीपीठ महामार्गविरोधात बुधवारी विधानभवनावर धडक; १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा एल्गार

कोल्हापूर: शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही असा एल्गार पुकारत येत्या बुधवारी अधिवेशन काळात मुंबईतील विधानभवनावर १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समनव्यक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली. आझाद मैदानात सकाळी ९ वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. राज्यभरातून या मोर्चाला दहा हजारांहून अधिक शेतकरी […]

अधिक वाचा..

विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई: विधान भवन, मुंबई येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६व्या दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) विलास आठवले यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना उपसभापती डॉ. […]

अधिक वाचा..

काँग्रेसचा सोमवारी ११ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा…

महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार नागपूर: राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वा-यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार […]

अधिक वाचा..