राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण…

मुंबई: स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ध्वजारोहण समारंभानंतर दोन्ही मान्यवरांनी सर्व कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष […]

अधिक वाचा..

शिरुरच्या महिला दक्षता समितीचे कामच लय भारी…

पिडीत तरुणी अन् महिलांच्या इथे निवारण होतात तक्रारी… शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशनची हद्द पूर्वेला तांदळी तर पश्चिम दिशेला काठापुर बुद्रुक पर्यंत असुन शिरुर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत 52 गावे येतात. तसेच शिरुर ते काठापूर 50 किमी आणि शिरुर ते तांदळी 50 किमी तर शिरुर ते पारगाव पुल 40 किमी अशी संपूर्ण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील […]

अधिक वाचा..

विधिमंडळ कामकाज समित्यांची तात्काळ स्थापना करा; नाना पटोले

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज हे केवळ अधिवेशनापरुतेच चालत नसते तर ते वर्षभर चालत असते. विधिमंडळ कामकाजासाठी कमिट्या अत्यंत महत्वाच्या असतात परंतु २०१९ नंतर आतापर्यंत या कमिट्यांचे गठन करण्यात आलेले नाही आणि वर्षभराच्या आत तर पुन्हा निवडणुका लागणार आहेत. नवीन आमदारांसाठी या कमिट्या महत्वाच्या आहेत, या कमिट्या गठीत करण्याचे निर्देश देऊन अधिवेशन संपताच तात्काळ त्याची अंमलबजावणी व्हावी,अशी […]

अधिक वाचा..

शेतकरी प्रश्नांवर सरकार गंभीर नाही; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम; नाना पटोले

मुंबई: राज्यातील भाजपाप्रणित ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. सरकार कर्ज वाटप व बियाणांसंदर्भात चुकीची माहिती देत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने निर्देश जारी केल्याने अनेक सहकारी बँकांनी कर्ज वाटपच केले नाही, राष्ट्रीयकृत बँका तर शेतकऱ्यांना दारातही उभे करत नाहीत आणि सरकार सांगते कर्जवाटप झाले. सरकार चुकीचे उत्तर देत असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा […]

अधिक वाचा..

सरकार जनतेसाठी नव्हे तर मोजक्या लोकांसाठी काम करतय

मुंबई: सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील पंचामृतातील अमृताचा जनतेला कोणताही फायदा झाला नाही. सरकारने फक्त फसव्या घोषणा केल्या जनतेच्या पदरात प्रत्यक्षात निराशा आली. हे सरकार जनतेसाठी नव्हे तर मोजक्या लोकांसाठी काम करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केला. शेतकरी, कामगार प्रश्नांवर आम्ही विरोधक म्हणून सभागृहात आवाज उठविला. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मूग […]

अधिक वाचा..

वर्किंग वूमन्सच्या बॅगमध्ये या वस्तू असायलाच हव्या, सेफ्टी-कम्फर्टसाठी आवश्यक…

महिला घराबाहेर पडताना बॅग घेऊन जायला विसरत नाहीत. विशेषत: नोकरदार महिला ऑफिसला जाताना बहुतांश वस्तू हॅण्ड बॅगमध्ये ठेवतात. मात्र जर तुम्ही नोकरी करणारी महिला असाल तर तुमच्या बॅगमध्ये गोष्टी जरूर ठेवा. फोन चार्जर:- अनेक वेळा महिला कामात व्यस्त असल्यामुळे फोन चार्ज करणे विसरतात. त्याचबरोबर तुमच्या सुरक्षिततेसाठी फोन चार्ज करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे हाताच्या पिशवीत […]

अधिक वाचा..

ग्रामस्थांनी पोलिसांसोबत काम करत सहकार्य करावे; यशवंत गवारी

शिक्रापूर (शेरखान शेख): 1 जानेवारीचा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाबरोबर ग्रामस्थांची भूमिका महत्वाची असून ग्रामस्थांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करत पोलिसांच्या बरोबरीने काम करावे, असे आवाहन शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी केले आहे. करंदी (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी शौर्यदिनी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने ग्रामस्थांशी संवाद साधताना शिरुर उपविभागाचे उपविभागीय […]

अधिक वाचा..