मोबाईलने गाड्यांचे फोटो काढल्यास वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई होणार

महाराष्ट्र

औरंगाबाद: वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे! आता कोणताही वाहतूक पोलीस अधिकारी खाजगी मोबाईल वापरून वाहनांचे फोटो किंवा व्हिडिओ काढू शकणार नाही.

नवे आदेश जारी — थेट शिस्तभंगाची कारवाई 

अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडून नव्या आदेशानुसार

ई-चलान कारवाईदरम्यान खाजगी मोबाईलचा वापर पूर्णतः बंद राहील.

नियम तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.

हा आदेश तात्काळ प्रभावाने संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे.

परिवहन मंत्र्यांची नाराजी

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वाहतूक संघटनांनी तक्रार केली की

काही पोलीस अधिकारी खाजगी मोबाईलने मोठ्या प्रमाणावर वाहनांचे फोटो काढतात.

नंतर हे फोटो सोयीनुसार ई-चलान प्रणालीमध्ये अपलोड करून चुकीचे चलान तयार करतात.

या पद्धतीबद्दल मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

चुकीच्या पद्धतीने ई-चलान देणाऱ्यांना इशारा 

काही पोलीस अधिकारी अजूनही स्वतःचे मोबाईल वापरून

चुकीच्या वेळेचे फोटो अपलोड करतात

नंतर ते ई-चलान प्रणालीत टाकतात

आणि चुकीच्या वाहनधारकांवर दंड लावतात

आता असे करताना कोणी सापडल्यास

संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशारा अपर पोलीस महासंचालक प्रविण साळुंके यांनी दिला आहे.

आता वाहतूक पोलिसांनी खाजगी मोबाईल वापरून ई-चलान करणे बंद केल्यामुळे, चुकीच्या दंडप्रकरणांना आळा बसणार आहे.

वाहनधारकांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे.