राष्ट्रवादीतील सर्व गैरसमज दूर; राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा; सुनिल तटकरे

महाराष्ट्र

नवी दिल्ली: Sunil Tatkare यांनी आज दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाल्याचा दावा करत, पक्षसंघटनेची मजबूत बांधणी आणि विस्तारासाठी लवकरच राज्यव्यापी दौरा करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसंदर्भात निवडणूक आयोगाला आवश्यक ते सुधारित पत्र येत्या काही दिवसांत सादर करण्यात येईल. यासाठी पक्षांतर्गत बैठकीत सर्व नेत्यांमध्ये सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

विलीनीकरणाच्या चर्चेबाबत बोलताना Sharad Pawar यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष Shashikant Shinde आणि Supriya Sule यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडल्याने त्या विषयात आता काहीही शिल्लक राहिलेले नसल्याचे तटकरे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस हा शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर तसेच Yashwantrao Chavan यांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष असल्याचे सांगत, पक्षातील सर्व निर्णय एकमताने घेतले जातात आणि पक्षात लोकशाही पद्धतीने कामकाज चालते, अशी भूमिका त्यांनी मांडली.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हा एनडीएमधील प्रमुख घटक पक्ष असून, Bharatiya Janata Party यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्यात काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विकासाभिमुख भूमिका कायम ठेवून पुढील काळात कामांना अधिक गती दिली जाईल, असेही तटकरे यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत