मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने १३ जून २०२६ रोजी काँग्रेस पक्षाच्या टिळक भवन येथील मुख्यालयात ‘भारतातील आर्थिक-राजकीय संकटे : वास्तव आणि परिणाम’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, अरुणकुमार, पृथ्वीराज चव्हाण, कुमार केतकर तसेच प्रदेश काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख विश्वास उटगी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हर्षवर्धन सपकाळ असतील.
देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, कामगार क्षेत्रावरील संकट, कंत्राटी नोकरभरती, नोटबंदी व जीएसटीचा कृषी आणि उत्पादन क्षेत्रावर झालेला परिणाम, बँकिंग व विमा क्षेत्रासमोरील आव्हाने तसेच वित्तीय क्षेत्राच्या परदेशीकरणासारख्या गंभीर आर्थिक मुद्द्यांवर या चर्चासत्रात सखोल चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून देण्यात आली.