‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मनोरंजन

मुंबई: लोकप्रिय मालिका ‘कमळी’ मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची आई कायमची गेल्याचा समज असताना ती मोठ्या अपघातातून सुखरूप बचावते. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिची स्मृती हरवते. तिला कमळीच्या बालपणीच्या आठवणी असतात, पण समोर उभी असलेली स्वतःची लेकही ती ओळखू शकत नाही.

आईच्या या अवस्थेमुळे कमळीवर तिच्या सांभाळाची मोठी जबाबदारी येते. हृषी आणि निंगी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. मात्र, कमळीच्या आयुष्यात पुन्हा अडथळे निर्माण करण्यासाठी अनिका नवा डाव आखते. मुलींच्या हॉस्टेलमध्ये बाहेरच्या व्यक्तींना राहण्यास मनाई असल्याचा नियम पुढे करत ती कमळीला हॉस्टेल सोडण्यास भाग पाडते.

मुंबईत दुसरा आधार नसल्याने कमळी, तिची आई आणि निंगी कुठे जाणार, असा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी हृषी पुढाकार घेत तिघींनाही स्वतःच्या घरी घेऊन जातो. मात्र, हे पाहून नयनतारा नाराज होते. त्यावर हृषी स्पष्ट शब्दांत सांगतो की, “जर मी या घरात राहायचं असेल, तर कमळी आणि तिच्या आईलाही काही दिवस या घरात राहू द्यावं लागेल.”

हृषीची ही अट नयनतारा मान्य करणार का? कमळीच्या आईची हरवलेली स्मृती परत येणार का? आणि कमळी पुन्हा एकदा नयनताराचं मन जिंकणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना २३ जुलै, गुरुवारी प्रसारित होणाऱ्या विशेष भागात मिळणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत