waghale-krushi-pujan

वाघाळे येथे अक्षय तृतीयेनिमित्त कृषी पूजनाने संस्कृतीचा जागर; बैलगाडीची भव्य शोभायात्रा…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय परिवाराच्या वतीने अक्षय तृतीया उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने परिसरातील दाम्पत्यांच्या हस्ते शेती व भूमीचे पूजन करून कृषी हीच खरी अक्षय संपत्ती असल्याचा संदेश देण्यात आला. स्वाध्याय परिवाराच्या पुढाकाराने शेती व भूमीचे पूजन करण्यात आले. पारंपरिक बैलगाडीची भव्य शोभायात्रा […]

अधिक वाचा..

वाघोलीत घडली हृदयद्रावक घटना; उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य…

वाघोली : वाघोलीतील ‘रविनंदा कॉयलाईट’ सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी केलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून रचयिता अभिषेक गुप्ता (वय ३७) या उच्चशिक्षित विवाहितेने १६ एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रचयिता या व्यवसायाने संगणक अभियंता होत्या. मात्र, गेल्या काही काळापासून सासरच्या मंडळींकडून त्यांच्याकडे […]

अधिक वाचा..

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मोठे यश संपादन करत मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती मिळवली आहे. तिच्या या यशामुळे अरणगाव परिसराततुन सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. निकिता मखर हि आर्थिक अडचणींना सामोरी जात असतानाही शिक्षण आणि करिअरच्या वाटचालीत खंबीरपणे […]

अधिक वाचा..

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे 

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने नगरविकास विभागाने स्वतंत्र आणि परिणामकारक कार्यप्रणाली विकसित करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. दि. १६ एप्रिल रोजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महिला सुरक्षेसंदर्भात निवेदन सादर केले होते. त्यानंतर […]

अधिक वाचा..

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक भेट उत्साहवर्धक ठरली. या वेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा विद्यार्थ्यांशी झालेला संवाद विशेष आकर्षण ठरला. डॉ. गोऱ्हे यांनी अत्यंत सोप्या भाषेत विधिमंडळाची कार्यपद्धती समजावून सांगताना शिस्त, नियम आणि सभागृहातील कामकाजाची रचना स्पष्ट […]

अधिक वाचा..

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. महिलांना आरक्षण मिळायला हवे होते; मात्र या मुद्द्यावर काँग्रेसने वर्षानुवर्षे केवळ राजकारण केले, अशी टीकाही त्यांनी केली. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव […]

अधिक वाचा..

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde ठाणे: “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली आहे,” असे सांगत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी ठाण्याच्या झपाट्याने होत असलेल्या विकासाचा आढावा घेतला. क्रेडाई एमसीएचआय ठाणे युनिट आयोजित 23 व्या रियल […]

अधिक वाचा..

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आल्यानंतर राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाईसह मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली असून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मराठी भाषेच्या अध्यापनासाठी २०२० मध्ये लागू करण्यात आलेल्या […]

अधिक वाचा..

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय पक्षांच्या भूमिकांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकीकडे संसदेत महिला आरक्षणाबाबत जोरदार चर्चा आणि घोषणाबाजी होत असताना, दुसरीकडे प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत महिलांचे प्रतिनिधित्व अपेक्षेइतके दिसत नसल्याचे निरीक्षण समोर येत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, भारतीय जनता पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस […]

अधिक वाचा..

लता म्हणजे आयुष्याची वेल, आशा म्हणजे जगण्याची उमेद; एकनाथ शिंदे 

  पुणे: “Lata Mangeshkar म्हणजे आयुष्याची कोमल वेल, तर Asha Bhosle म्हणजे त्या वेलीला मिळालेली जगण्याची उमेद आहे. या दोघींच्या संगमामुळे आयुष्य अधिक बहरते,” असे भावनिक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पुण्यात उभारण्यात येणाऱ्या ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या कोनशिला समारंभात ते बोलत होते. हा समारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या […]

अधिक वाचा..