विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा महायुतीवर निशाणा

मुंबई: राज्यातील १७ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे १७ पैकी १५ जागांवर एकमत झाले असून दोन जागांवरही लवकरच निर्णय होईल. काँग्रेस पक्ष चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड या जागा लढवणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष पुणे, ठाणे व सांगली-सातारा या ३ जागा आणि शिवसेना (उबाठा) रायगड, जळगाव, परभणी-हिंगोली, छत्रपती […]

अधिक वाचा..

समन्वयाअभावी रखडली ‘अहिल्यादेवी महिला सन्मान’ योजना; राज्यातील हजारो कर्तबगार महिला वंचित

मुंबई: राज्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील कर्तबगार महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे हजारो पात्र महिला सन्मानापासून वंचित राहिल्याचे समोर आले आहे. महिला व बालविकास विभाग आणि ग्रामविकास विभागातील समन्वयाअभावी ही योजना अपेक्षित गतीने राबविली जात नसल्याची बाब उघड झाली आहे. महिला व बालविकास विभागाने […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचा गृहविभाग ‘पांडू हवालदार’ चालवतो म्हणूनच राज्यात अवैध धंदे, ड्रग्ज, विषारी दारुचे थैमान; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असून खालच्या स्तरापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत हप्ते पोहचवले जात आहेत. हप्ता वसुलीमुळे पोलीस प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही म्हणूनच राज्यात ड्रग्जचा खुलेआम काळाधंदा सुरु आहे, गांजा विकला जातो, हातभट्ट्या व विषारी दारुने थैमान घातले आहे. या अवैध धंद्यातूनच पुण्यात विषारी दारुने २२ निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत. राज्याचा गृहविभाग […]

अधिक वाचा..

नियमांना हरताळ? दावडी निमगावात कंपनीचे काळे प्लास्टिक जाळल्याचा गंभीर प्रकार

नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणाला धोका दावडी निमगाव (अक्षय टेमगिरे): खेड तालुक्यातील दावडी निमगाव हद्दीतील लोणकरवाडी परिसरात एका इसमाने कंपनीमधील काळ्या प्लास्टिकचा साठा उघड्यावर जाळल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पर्यावरणालाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इसमाने कंपनीतील वापरात असलेले काळे प्लास्टिक […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी येथे डाळिंब चोरीचा प्रयत्न फसला; दुचाकीसह तीन चोरटे रंगेहाथ जेरबंद

शिरूर (सुनिल जिते): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील सोदकवस्ती परिसरातील डाळिंबाच्या बागेत चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या तीन चोरट्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. शिरूर पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करून त्यांच्याकडील दुचाकी व चोरीसाठी आणलेली गोणपाटे जप्त केली आहेत. याप्रकरणी शेतकरी रोहीदास पोपट हिल्लाळ (वय ४१, रा. सोदकवस्ती, टाकळी हाजी, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात […]

अधिक वाचा..

विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! रोडरोमिओंना लगाम घालण्यासाठी दामिनी पथक सुरु करा; आयेशा सय्यद

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष ‘दामिनी पथक’ तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागणी शिरूर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा कलीम सय्यद यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप केंजळे यांना देण्यात आले. शहरातील शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थिनींची दैनंदिन ये-जा मोठ्या प्रमाणात वाढली […]

अधिक वाचा..

राज्यमाता गोमाता संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांनी सहभागी व्हावे; प्रतीक बनकर

शिरूर (अरुणकुमार मोटे): पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’ या राज्यव्यापी उपक्रमाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा राबविण्यात येत असून, गोसंवर्धन आणि गोसेवेबाबत जनजागृती करणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुणे जिल्हा समन्वयक प्रतीक बनकर […]

अधिक वाचा..

आपलं अमूल्य रक्त

शरीरात कोणतीही प्रक्रिया होण्यामागे रक्त हे महत्त्वाचं काम करते. रक्त शरीराचे संतुलन बनवून ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे. जर शरीरातील रक्त कमी झाले किंवा शरीर रक्ताचा पुरवठा करण्यास असमर्थ ठरले, तर ते घातक ठरू शकते. डायबिटीस हा आजार रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढल्यानेच होतो, आणि तो अत्यंत घातक असतो. ज्यांचा डायबिटीस जास्त असतो त्यांना इन्शुलिनची ईंजेक्शन थेट […]

अधिक वाचा..

लहान मुले माती का खातात

नवीनच रांगायला शिकणारी मुले जे दिसेल ते तोंडात घालतात. काही मुले माती खातात, पेन्सिल खातात याचे कारण काय ते आता पाहू. आहारात लोह व कॅल्शियम या क्षारांची कमतरता असल्यास, मुलाला वरचे अन्न सुरू न केल्यास, ऍनेमिया वा रक्तक्षय (कोणत्याही कारणामुळे) असल्यास मुले माती खातात. काही मुलांमध्ये, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही ही भावना वाढीस लागल्यानेही […]

अधिक वाचा..

किडनीत रक्ताची गाठ झाल्यास दिसतात ‘ही’ लक्षण

शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात याबाबत तुम्ही कधीना कधी वाचलं असेलच. वेगवेगळ्या कारणांनी शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये या रक्ताच्या गाठी तयार होत असतात. ज्या गंभीर समस्या निर्माण करू शकतात. रीनल व्हेन थ्रोम्बोसिस एकप्रकारची रक्ताची गाठ असते. ही किडनीच्या अशा नसांमध्ये तयार होते ज्या विषारी तत्व बाहेर काढण्याचं काम करतात. किडनीमध्ये जर रक्ताची गाठ तयार झाली तर […]

अधिक वाचा..