सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडू नका; सतर्कताच आर्थिक फसवणुकीचा प्रभावी उपाय; कुमार कदम

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मोबाईल आणि इंटरनेटचा वापर वाढत असतानाच सायबर गुन्हे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट कर्ज योजना, डिजिटल अरेस्ट आणि खोट्या गुंतवणूक योजनांचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी न पडता नागरिकांनी प्रत्येक आर्थिक व्यवहार थांबून, विचार करुन आणि खात्री करुनच करावा. सतर्कता आणि वेळेत तक्रार करणे हाच सायबर फसवणूक रोखण्याचा प्रभावी […]

अधिक वाचा..

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण कच्चा खावा की भाजून खावा

लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक फायदेही मिळतात. लसणाला आयुर्वेदात एक शक्तीशाली वनस्पती मानलं गेलं आहे. कारण आरोग्या संबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीही कच्चा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, याची तिखट आणि डार्क टेस्टमुळे कच्चा […]

अधिक वाचा..

ग्रामीण-शहरी वाद नव्हे, तरुणाईच्या एकतेतूनच घडेल सक्षम महाराष्ट्र; दिनेश शिंदे

मुंबई: राज्यातील स्पर्धा परीक्षांबाबत ग्रामीण आणि शहरी तरुणाईमध्ये तुलना करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्यांचा संगम घडवून महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याची गरज असल्याचे मत शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय सह समन्वयक व प्रसार माध्यम समन्वयक दिनेश शिंदे यांनी व्यक्त केले आहे. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राची तरुणाई ही राज्याच्या प्रगतीची सर्वात मोठी ताकद असून MPSC, UPSC आणि SSC सारख्या स्पर्धा परीक्षा […]

अधिक वाचा..

कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; बिगर-काश्मिरी मजुरावर गोळीबार, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील केल्लम परिसरात शनिवारी दहशतवाद्यांनी बिगर-काश्मिरी मजुरांना लक्ष्य करत गोळीबार केला. या हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मजूर कामाच्या […]

अधिक वाचा..

सिंहस्थातून घडणार पुढील १०० वर्षांचा नाशिक; ३२ हजार कोटींच्या विकास आराखड्याची शिंदेंची घोषणा 

स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून नाशिकच्या पुढील शतकभराच्या विकासाचा पाया ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दिव्य मराठी आयोजित ‘वसा सिंहस्थाचा… वारसा नाशिकचा… गौरव महाराष्ट्राचा’ या सिंहस्थ कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी ३२ हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची माहिती […]

अधिक वाचा..

जनतेच्या विश्वासाचा सन्मान करत महायुती सरकार स्थापन; विकासालाच प्राधान्य; दिनेश शिंदे 

२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेना-भाजप युतीवर विश्वास ठेवत विकास आणि स्थैर्याच्या बाजूने कौल दिला होता. मात्र, निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय घडामोडींमुळे जनतेच्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष सत्तासमीकरण यामध्ये तफावत निर्माण झाली, असे मत शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय सह समन्वयक व प्रसार माध्यम समन्वयक दिनेश […]

अधिक वाचा..

अण्णाभाऊ साठे जयंतीकडे सांस्कृतिक विभागाची पाठ?; विशेष कार्यक्रम नसल्याने कलाक्षेत्रात नाराजी

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा ज्येष्ठ साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन करण्यात आले. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून त्यांच्या जयंतीनिमित्त कोणताही विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला नसल्याने साहित्य, लोककला आणि सांस्कृतिक क्षेत्रात नाराजी व्यक्त होत आहे. अण्णाभाऊ साठे यांचे […]

अधिक वाचा..

लोकमान्यांनी दिला स्वराज्याचा मंत्र, मोदी-शहा भारताला देत आहेत सुरक्षेचा मंत्र; एकनाथ शिंदे

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने अजित डोवाल यांचा गौरव; राष्ट्रसुरक्षा, निर्णायक नेतृत्व आणि गुप्तचर व्यवस्थेचे शिंदेंकडून कौतुक पुणे: लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी देशाला स्वराज्याचा मंत्र दिला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जगाला सुरक्षेचा मंत्र देत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६ राष्ट्रीय […]

अधिक वाचा..

‘विनोबा’ डिजिटल व्यासपीठाचा राज्यभर विस्तार; ३१ लाख विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ

एससीईआरटी–ओएलएफ सामंजस्य करार; एआय-आधारित मूल्यमापन, शिक्षक सक्षमीकरण आणि पालक सहभागाला चालना मुंबई: राज्यातील शासकीय शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी राज्य शासनाने ‘विनोबा’ या डिजिटल शैक्षणिक व्यासपीठाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि ओपन लिंक्स फाउंडेशन (ओएलएफ) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे राज्यातील […]

अधिक वाचा..
ramdas-thite

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची तयारी ठेवली पाहिजे. बौद्धिक क्षमतेइतकेच शारीरिक सदृढतेलाही महत्त्व आहे. ध्येयपूर्तीसाठी सातत्य, समर्पण आणि प्रामाणिक प्रयत्न या मूल्यांची जोड आवश्यक आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पाटील यांनी केले. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या शिक्रापूर शाखेच्या […]

अधिक वाचा..