बारामतीत विकासकामांची धडाकेबाज पाहणी; पार्थ पवारांचा ‘सरप्राइज’ दौरा, अजितदादांच्या कार्यशैलीची पुनरावृत्ती

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यशैलीची झलक पुन्हा एकदा बारामतीकरांना पाहायला मिळाली. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी बारामती शहर व तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पाहणी केली. या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. दौऱ्यात पार्थ पवार यांनी थेट कामांच्या ठिकाणी भेट देत प्रगतीचा […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपतीत किसान जागृती यात्रेत सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कन्याकुमारी ते काश्मीर हि देशव्यापी किसान जागृती यात्रा सोमवार दि १६ फेब्रुवारी २०२६ रांजणगावात दाखल होताच हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन त्याचे जोरदार स्वागत केले. ढोल-ताशा, घोषणाबाजी आणि भगव्या-हिरव्या पताकांनी परिसर भरुन गेला होता. या यात्रेचे नेतृत्व वरिष्ठ शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल करत असून ७ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान देशभर शेतकरी […]

अधिक वाचा..

‘लव्ह जिहाद’ व सक्तीच्या धर्मांतराविरोधात कठोर कायद्याची मागणी; शिरूर तहसीलदारांना निवेदन

(शिरूर अरुणकुमार मोटे): राज्यात कथित ‘लव्ह जिहाद’ तसेच बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांबाबत कठोर कायदा करण्याची मागणी करत सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि. १३ फेब्रुवारी २०२६) शिरूर येथे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, १४ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र शासन यांनी ‘लव्ह जिहाद’ व सक्तीच्या धर्मांतराच्या […]

अधिक वाचा..

राजधर्मावरून राज्यात खळबळ! शिवाजी महाराज–टिपू सुलतान वाद आणि मंदिर प्रकरणाने वाढले राजकीय तापमान

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून दोन वेगवेगळ्या घटनांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि टिपू सुलतान (Tipu Sultan) यांच्यावरील वक्तव्यावरून वाद निर्माण झाला, तर दुसरीकडे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मंदिर दर्शनावरून नवीन राजकीय आणि सामाजिक चर्चा पेटली आहे. या दोन्ही घटनांमुळे “राजधर्म” आणि राज्यकर्त्यांची जबाबदारी हा […]

अधिक वाचा..

‘माजी’ करण्याची भाषा करणाऱ्यांवर शिवसेनेचा जहरी वार; व्यंगचित्रातून गणेश नाईक यांच्यावर निशाणा

मुंबई: शिवसेना पक्षाने सोशल मीडियावरून वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका करत व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांना लक्ष्य केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने आरोप करणाऱ्या नाईक यांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेने हे व्यंगचित्र प्रसिद्ध केले असून ते सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर आणि निर्णयांवर […]

अधिक वाचा..

पुष्पगुच्छ नको, महापौर निधीस हातभार लावा; महापौर रितू तावडे यांचे आवाहन

मुंबई: मुंबईकरांनी स्वागतासाठी शाल–पुष्पगुच्छ आणण्याऐवजी महापौर निधीस आर्थिक मदत करावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले आहे. महापौर म्हणून मिळणारे संपूर्ण मानधन स्वतः महापौर निधीस देत असल्याचे सांगत त्यांनी नगरसेवक, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी यांनीही या निधीस आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन केले. या निधीतून दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांना […]

अधिक वाचा..

‘जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही’; हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर घणाघात

मुंबई: अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या तसेच संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपचा पर्दाफाश करत राहणार असल्याचा ठाम इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. भाजपाला माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सपकाळ म्हणाले की, काही भाजपा आमदार व नेत्यांनी “माझी जीभ कापून आणणाऱ्याला […]

अधिक वाचा..

भारत-अमेरिका व्यापार करारावरून देशात खळबळ; शेतकऱ्यांमध्ये भीती, सरकारकडून अद्याप तपशील गोपनीय

मुंबई: भारत-अमेरिका व्यापार कराराची घोषणा झाल्यानंतर देशभरात राजकीय आणि आर्थिक चर्चांना उधाण आले आहे. केंद्र सरकारने या कराराला ‘ऐतिहासिक’ आणि ‘रणनीतिक’ असे संबोधले असले, तरी कराराचा अधिकृत मजकूर अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. संसदेला विश्वासात न घेता आणि शेतकरी संघटनांशी सखोल चर्चा न करता करण्यात आलेल्या घोषणेमुळे ग्रामीण भागात संभ्रमाचे वातावरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald […]

अधिक वाचा..

नाशपती रसाचे फायदे

नाशपाती हे फळ शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यास मदत करते आणि त्यात भरपूर प्रमाणात फायबर, पोटॅशियम, आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे सर्व घटक मूत्रमार्ग स्वच्छ ठेवण्यास आणि मुतखडा विरघळवण्यास मदत करतात. नाशपातीच्या रसाचे मुतखड्यावर फायदे 1) मुतखडा विरघळवतो नाशपातीतील नैसर्गिक अॅसिडिक घटक खडे मऊ करून त्यांना शरीरातून बाहेर टाकण्यास मदत करतात. 2) मूत्रवहन संस्थेचे आरोग्य राखतो नियमित […]

अधिक वाचा..

पायऱ्या (जिना) चढण्याचे फायदे

मित्रांनो, शारीरिक हालचाल कमी असणारी बैठी जीवनशैली ही अलीकडच्या काळातील मोठी समस्या झाली आहे. याचा अनेकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अत्यंत विपरित परिणाम होतो आहे. त्यातून अनेक गंभीर आजार उद्भवत आहेत. मात्र, यावर मात करण्यासाठी तुम्ही तासनतास जिममध्ये जाण्याची गरज नाही. अगदी रोजच जे करतो त्यात थोडा बदल केला तरी पुरेसे आहे. म्हणजे बघा ना […]

अधिक वाचा..