कॉन सिंड्रोमची लक्षणे आणि उपाय 

आजार वेगवेगळ्या प्रकारचे असतात, असाच एक आजार म्हणजे कॉन सिंड्रोम. ही एक अशी स्थिती आहे ज्यात शरीरात एल्डोस्टेरॉन नावाच्या हार्मोनचं प्रमाण वाढतं. या हार्मोनमुळे शरीरात सोडिअम आणि पोटॅशिअमचं संतुलन कायम ठेवण्यास मदत मिळते. पण जेव्हा याचं प्रमाण खूप जास्त वाढतं, तेव्हा याने किडनी आणि हृदयाच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. लक्षणे हाय ब्लड प्रेशर होणं, डोकेदुखी, […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष:मेष राशीसाठी दिवस सकारात्मक आहे. रखडलेली ऑफिसमधील कामे पूर्ण होतील. जोडीदाराकडून आर्थिक सहकार्य मिळेल. मुदत ठेव, विमा पॉलिसी यांसारख्या गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. व्यवसायात नवीन योजना गती घेईल. सरकारी कामे मार्गी लागतील. लव्हलाईफ उत्तम राहील आणि जोडीदाराला गिफ्ट देण्याचा योग आहे. वृषभ:वृषभ राशीसाठी दिवस आनंददायी आहे. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. मुलांच्या शिक्षणासाठी किंवा ऑनलाइन कोर्सेससाठी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भीषण अपघात! निमोणे येथील काळे कुटुंबावर मध्यरात्री काळाचा घाला

न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमोणे गावावर मध्यरात्री दुःखाचा डोंगर कोसळला असुन न्हावरे चौफुला रोडवरील नलगे वस्ती दरम्यान झालेल्या भीषण अपघातात काळे कुटुंबातील दोघांचा तर त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला असुन एक जण गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहे. या दुर्घटनेमुळे निमोणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास […]

अधिक वाचा..

खसखस खाण्याचे काही प्रमुख फायदे

हिवाळ्यात खसखस खाणे अत्यंत फायदेशीर आणि आरोग्यदायी मानले जाते. थंडीच्या दिवसात शरीराला उबदारपणा आणि पोषण देण्यासाठी याचा अनेक प्रकारे उपयोग होतो. हिवाळ्यात खसखस खाण्याचे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत. 1) शरीराला ऊर्जा आणि उबदारपणा मिळतो खसखसमध्ये निरोगी फॅट्स आणि प्रथिने असतात, जे हिवाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास आणि नैसर्गिक उबदारपणा टिकवून ठेवण्यास मदत करतात. 2) […]

अधिक वाचा..

आपले जीवन सुंदर ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय

1) अंघोळ: अंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे; सर्दी, खोकला, ताप येत नाही. २) झोपेची दिशा: पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा (पॅरालीसीस) येत नाही. ३) तोंडाचा वास: रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही. ४) हार्ट: रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट […]

अधिक वाचा..

आमची लग्न व्हायची आहेत; मुठभर चुकीच्या लोकांसाठी शिरुरची बदनामी कशासाठी…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांनी निवडणुकीत दारु आणि ड्रॅगचा मोठया प्रमाणात वापर केल्याचा विरोधकांवर गंभीर आरोप केला. या वक्तव्यांमुळे संपुर्ण तालुक्याच्या तरुणाईवर संशयाची सावली पडली असून, संतप्त युवकांनी सोशल मिडीयावर […]

अधिक वाचा..

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बीडमध्ये ११ वसतिगृहे; १५९ कोटींच्या निधीला मंजुरी; सुनेत्रा पवार

बीड: बीड जिल्हा येथे ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात तब्बल ११ वसतिगृहे उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पासाठी सुमारे १५९ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाल्याची माहिती खासदार सुनेत्रा पवार यांनी दिली. ऊसतोड हंगामादरम्यान हजारो कुटुंबे स्थलांतरित होत असल्याने मुलांचे शिक्षण खंडित होते. अनेक मुलांना शाळा सोडावी लागते […]

अधिक वाचा..

राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहायक प्राध्यापक पदभरतीला मान्यता

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५ हजार १२ रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी, तसेच विद्यार्थ्यांच्या वाढत्या […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेचा सर्वसमावेशक अ‍ॅक्शन प्लॅन जाहीर; ‘ड्रग्स-फ्री ते वर्ल्ड क्लास मुंबई’चा संकल्प

मुंबई: मुंबईला ड्रग्स-फ्री, झोपडपट्टीमुक्त आणि अतिक्रमणमुक्त करून जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी राज्य सरकारने व्यापक अ‍ॅक्शन प्लॅन जाहीर केला आहे. प्रत्येक महापालिका रुग्णालयात डी-अ‍ॅडिक्शन सेंटर सुरू करण्यापासून झोपडपट्टी पुनर्विकास, प्रदूषण नियंत्रण आणि पायाभूत सुविधा बळकटीकरणापर्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई शहर जिल्हा नियोजन समिती (DPDC) बैठकीनंतर झालेल्या पत्रकार […]

अधिक वाचा..

अजितदादांसोबत आले तेच खरे कुटुंब; आनंद परांजपे यांची ठाम भूमिका

ठाणे: “कुटुंब म्हणजे फक्त रक्ताची नाती नसतात. २ जुलै २०२३ रोजी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर जे सर्व अजितदादांसोबत आले, तेच त्यांचे खरे कुटुंब होते,” अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मांडली. अजितदादांच्या निधनानंतर होत असलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्या कुटुंबावर किती वेदना होत असतील, याचा क्षणभर विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. ठाणे […]

अधिक वाचा..