अंबाजोगाईत चिमुरडीवर अत्याचारानंतर मृत्यू; डॉ. नीलम गोऱ्हे यांची कडक कारवाईची मागणी

मुंबई: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे अवघ्या २ वर्षे ५ महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली असून, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनावर कठोर कारवाईसाठी दबाव आणला आहे. प्राथमिक तपासात मृत्यू अपघाती असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शवविच्छेदन अहवालातून लैंगिक अत्याचार स्पष्ट झाल्यानंतर प्रकरणाला […]

अधिक वाचा..

मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२५ दिमाखदारपणे संपन्न!

मुंबई: उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२५ २७ आणि २८ मार्च रोजी उत्साहात व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवात मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, सार्वजनिक ग्रंथालयांचे कर्मचारी, अधिकारी वर्ग […]

अधिक वाचा..

NICU बिलात मोठी सवलत; नवजात बाळाला नवजीवन

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबाला दिलासा पुणे: विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांना मदत करण्याच्या उपक्रमांतर्गत एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. श्रीमती पूजा रोहित मुळे यांच्या नवजात बाळाला गंभीर अवस्थेमुळे NICU मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बाळाच्या उपचारांचे एकूण बिल सुमारे ₹१,२५,००० इतके झाले होते, जे त्यांच्या कुटुंबासाठी परवडणारे […]

अधिक वाचा..

भोंदू बाबावर कडक कारवाई होणारच; आनंद परांजपे यांचा इशारा

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेत विकास लवांडे यांच्यावर जोरदार टीका केली. “गांडुळासारखी वळवळ बंद करा,” असा थेट टोला लगावत त्यांनी महायुती सरकारकडून कठोर कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणावर सविस्तर माहिती देत, भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सरदवाडीत ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ जनजागृतीचा अनोखा उपक्रम

शिरूर (अरुणकुमार मोटे): सरदवाडी ता. शिरूर येथे स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायत सरदवाडी, इन्हेलर इंडिया लिमिटेड व नोहाऊ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ या विषयावर भारुडाच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भारुड सम्राट ह. भ. प. अनिल महाराज सावळे (मुळशीकर) यांनी […]

अधिक वाचा..

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेला गती; राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

मुंबई: राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत राज्य शासनाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना’च्या पुढील टप्प्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली. ‘विकसित महाराष्ट्र-२०४७’ या दृष्टीकोनाशी सुसंगत असलेल्या या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार व सुसज्ज शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास […]

अधिक वाचा..

वाचनाची गोडी वाढवा, पुस्तकाला मित्र बनवा!

मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सव उद्घाटन समारंभात मान्यवरांचे आवाहन मुंबई: “ज्ञान, संस्कार आणि प्रेरणा देणारे प्रत्येक पुस्तक आपल्याला काहीतरी नवीन शिकवते. पुस्तकांशी मैत्री केल्यास कधीच एकटे वाटत नाही. वाचनाची सवय आपल्याला आयुष्यभर साथ देणारी आणि यशाच्या मार्गावर पुढे नेणारी असल्याने विद्यार्थ्यांसह सर्वांनीच वाचनात गोडी वाढवून पुस्तकाला मित्र बनवावे.” असे आवाहन मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सवच्या उद्घाटन समारंभात मान्यवरांनी […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईत ‘श्रीराम जन्मोत्सव’ उत्साहात संपन्न

ह.भ.प. सूरज महाराज अंतवडीकर यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध पाबळ (सुनिल जिते).: शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे जय श्रीराम ट्रस्टच्या वतीने आयोजित श्रीराम नवमी उत्सव अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते ह.भ.प. सूरज महाराज अंतवडीकर यांचे सुश्राव्य कीर्तन, ज्यामुळे उपस्थित शेकडो भाविक मंत्रमुग्ध झाले. चैत्र शुद्ध नवमीच्या शुभमुहूर्तावर दुपारी […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार; शेतकरी, विकास आणि कायदा-सुव्यवस्थेवर सरकारचा भर

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी महायुती सरकारची मोठी घोषणा मुंबई: राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असून शेती, उद्योग, पायाभूत सुविधा आणि कायदा-सुव्यवस्था या सर्व क्षेत्रांत वेगाने काम सुरू असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी व्यक्त केला. विधान परिषदेत नियम २५९ अंतर्गत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्धार सरकारने केला […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात सुधारित ‘शक्ती’ कायदा मंजूर; डिजिटल छळ व ॲसिड हल्ल्यांवर कडक कारवाई

महिला सुरक्षेसाठी मोठे पाऊल; BNS मध्ये राज्याच्या विशेष दुरुस्त्या समाविष्ट मुंबई: महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी सुधारित ‘शक्ती’ कायदा अखेर मंजूर करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता मध्ये राज्यस्तरीय दुरुस्ती करून या कायद्याच्या महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश करण्यात आला असून, ‘भारतीय न्याय संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक २०२६’ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकमताने मंजूर झाले. मुख्यमंत्री […]

अधिक वाचा..