लहानग्या विराटला ‘शिंदे काकां’चा दिलासा; विनामूल्य शस्त्रक्रियेमुळे पुन्हा खुलले हास्य

ठाणे : सातारा जिल्ह्यातील मुनावळे गावातील ८ वर्षीय विराट भोसलेच्या मदतीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde धावून आले आहेत. जन्मतः नाक आणि घशात गाठ असलेल्या विराटवर ठाण्यात विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात आली असून उपचारानंतर त्याला मोठा दिलासा मिळाला आहे. मुनावळे गावातील विराटच्या नाकात आणि घशात जन्मापासूनच गाठ होती. वय वाढत गेले तसे या गाठींचा आकारही वाढत गेला. […]

अधिक वाचा..

डॉलरला राष्ट्रवाद कळत नाही; बाजाराला फक्त गणित समजते!

मुंबई: भारतीय शेअर बाजारातून गेल्या दोन महिन्यांत तब्बल 21 अब्ज डॉलरची परदेशी गुंतवणूक बाहेर गेल्याने अर्थव्यवस्था आणि बाजारातील स्थैर्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता, अमेरिकेतील वाढते व्याजदर, कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतार आणि भारतीय बाजारातील उच्च मूल्यांकन यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून माघार घेतल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) मोठ्या प्रमाणात विक्री […]

अधिक वाचा..

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर आर्थिक आणि संसाधनांच्या टंचाईची शक्यता निर्माण झाली असताना, महाराष्ट्र शासनाने राज्यभरात संसाधन बचत आणि आर्थिक शिस्तीवर भर देणारे महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी केले आहे. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या या परिपत्रकात इंधन बचत, ऊर्जा संवर्धन, डिजिटल प्रशासन, नैसर्गिक शेती आणि सार्वजनिक वाहतूक वापर […]

अधिक वाचा..

शहरी कामगारांच्या हक्कांसाठी युवक काँग्रेसचा एल्गार; शहरी कामगार न्याय अभियान सुरू

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबई उभी करणारे लाखो शहरी कामगार आजही असुरक्षित, असंघटित आणि शोषणात्मक परिस्थितीत जीवन जगत असल्याचा गंभीर आरोप मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केला. स्वच्छता कामगार, घरकामगार, ऑटो-रिक्षा चालक, फेरीवाले आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकार मूलभूत हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक जीवनापासून वंचित ठेवत असल्याचे त्या म्हणाल्या. मुंबई काँग्रेस कार्यालयात […]

अधिक वाचा..

‘नमुना ७’मुळे बौद्ध समाजाची ३५ वर्षांची कोंडी?; अच्युत भोईटे यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई: “‘अनुसूचित जाती’चा विषय हा भारतीय चलनासारखा आहे. जशा चलनी नोटा छापण्याचा अधिकार फक्त रिझर्व्ह बँकेला आहे, तसाच अनुसूचित जातींची यादी निश्चित करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे. मग महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र ‘नमुना ७’ काढणे म्हणजे स्वतःच्या चलनी नोटा छापण्यासारखे नाही का?” असा सवाल ‘द बुद्धिस्ट – शेड्यूल्ड कास्ट मिशन’चे अच्युत भोईटे यांनी उपस्थित केला आहे. […]

अधिक वाचा..

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना मदत द्या; शेतकरी आंदोलन दडपल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई: Harshvardhan Sapkal यांनी कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी अडवल्याचा आरोप करत राज्य सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानाकडे निघालेल्या मोर्चाला रोखण्यात आल्याने सरकार लोकशाही दडपत असल्याचा आरोप त्यांनी केला. गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला असा मोर्चा काढण्याचे नियोजन होते. यावेळी Raju Shetti, Mahadev Jankar, Vinayak […]

अधिक वाचा..

१ जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP ) बसविणे अनिवार्य; प्रताप सरनाईक

मुंबई: राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना १ जुलै पासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे. यासाठी यापूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक […]

अधिक वाचा..

महसूल विभागाच्या निर्णयांमुळे नागरिकांना मोठा दिलासा; चंद्रशेखर बावनकुळे

‘महाराजस्व समाधान शिबीर’ लोकाभिमुख उपक्रम मुंबई: चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य शासन लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक प्रशासनाच्या दिशेने काम करत असल्याचे सांगत, ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ हे नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे प्रभावी माध्यम असल्याचे म्हटले. मुंबई उपनगर जिल्ह्यातील सहावे शिबिर अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल येथे आयोजित […]

अधिक वाचा..

२० मेपासून पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरू; तंत्र शिक्षण संचालनालयाचे कालबद्ध नियोजन

मुंबई:  दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ प्रवेश प्रक्रियेला २० मे २०२६ पासून सुरुवात होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. प्रवेश प्रक्रिया वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाला कालबद्ध नियोजनाचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, तंत्र […]

अधिक वाचा..

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगतची ११ एकर शासकीय जमीन नवीन कारागृहासाठी सुपूर्द

मुंबई: राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी नवीन कारागृह उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगतची सुमारे ११ एकर अतिक्रमणमुक्त शासकीय जमीन मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते कुर्ला तालुक्यातील मौजे मानखुर्द येथील या जमिनीचा ताबा मुंबई […]

अधिक वाचा..