आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते – नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या. 3) मुळव्याध होण्याची भीती वाटतेय – दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा. 4) किडनी फेल होण्याची भीती वाटतेय-दररोज सकाळी कोथिँबीरिचा रस अनुषापोटी प्या. 5) पित्त होण्याची भीती वाटतेय -नियमित आवळा रस प्या. 6) सर्दी होण्याची भीती […]

अधिक वाचा..

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा, यासाठी वेतन संहिता (Code on Wages), 2019 अंतर्गत महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. या नियमांनुसार, महिन्याचा पगार पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत देणे अपेक्षित असून, नोकरी सोडल्यानंतर Full & Final (F&F) सेटलमेंट दोन कामकाजाच्या दिवसांत पूर्ण करण्याची तरतूद आहे. पगारासंदर्भातील नियमांनुसार, […]

अधिक वाचा..

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या ‘खिडकी’ या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित अभिवाचनाचा विशेष प्रयोग गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजता दादर येथील शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘खिडकी’ या पुस्तकामध्ये प्रदीप कबरे यांच्या जीवनप्रवासातील विविध अनुभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. या अनुभवांपैकी काही निवडक प्रसंगांचे प्रभावी कथन […]

अधिक वाचा..

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामतीत विकासकामांच्या पाहणीसाठी जात असताना रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्या एका तरुणीला तात्काळ मदतीचा हात दिला. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी आपला ताफा थांबवून जखमी तरुणीची विचारपूस केली आणि तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी […]

अधिक वाचा..

राहुल गांधींचे आंदोलन बेजबाबदार; पंतप्रधान निवासस्थानी घातपाताचा कट होता का? एकनाथ शिंदेंचा सवाल

नीट पेपरफुटीनंतर केंद्राने कठोर पावले उचलली; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर राजकारण केल्याचा विरोधकांवर आरोप मुंबई: काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र टीका केली. आंदोलनास परवानगी नसलेल्या ठिकाणी लोकांना जमण्याचे आवाहन करून राहुल गांधींना नेमके काय साध्य करायचे होते, असा सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधानांच्या […]

अधिक वाचा..

एका डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यात अश्रू…; अजितदादांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शिंदेंची भावनिक आदरांजली

दादांची स्वप्ने पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली”; फडणवीसांच्या वाढदिवशी शिंदेंच्या भावना अनावर मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक शब्दांत त्यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि अजितदादा पवार यांच्या आठवणींचे दुःख अशा संमिश्र भावनांनी आजचा दिवस भरून गेल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले. “आजचा दिवस एका डोळ्यात […]

अधिक वाचा..

देवेंद्र! बस नाम ही काफी है; मुख्यमंत्री फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘महाराष्ट्राच्या राजकारणातील बिग डी’ म्हणत फडणवीसांच्या नेतृत्व, बुद्धिमत्ता आणि विकासदृष्टीचे शिंदेंकडून भरभरून कौतुक मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरभरून शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाचे तोंडभरून कौतुक केले. “देवेंद्र! बस नाम ही काफी है,” असे म्हणत शिंदे यांनी फडणवीस यांना “बुद्धिमान, अभ्यासू, अष्टपैलू नेतृत्व, राजकारणातील चालते-बोलते विद्यापीठ आणि विकासाची आधुनिक दृष्टी असलेले लोकनेते” […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांनी दुचाकी चोराला धाराशिवमधून केली अटक 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील महागणपती पार्किंगमधून चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा छडा लावत रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) पोलिसांनी आरोपीला धाराशिव जिल्ह्यातून अटक केली. त्याच्याकडुन ३० हजार रुपये किमतीची चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये विविध राज्यांतील आणि जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने कामगार वास्तव्यास आहेत. त्यामुळे परिसरात दाट लोकवस्ती असून दुचाकी वाहनांचीही […]

अधिक वाचा..

शिक्षकांच्या सूचनांवरच घडणार शिक्षणातील बदल; ‘शिक्षण संवाद २०२६’मध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही

मुंबई : राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांच्या प्रत्यक्ष अनुभवांना व सूचनांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. शालेय शिक्षण विभागातर्फे चर्नी रोड येथील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनमध्ये आयोजित ‘शिक्षण संवाद २०२६’ या विचारमंथन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षण आयुक्त सच्छिंद्रप्रताप सिंह, जवाहर बालभवनच्या […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जविरोधात काँग्रेसचा भाजपावर मोर्चा; राहुल गांधींना दिलेल्या वागणुकीचा निषेध

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी; परीक्षांतील अनियमिततेवर संसदेत चर्चा आणि विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्याची मागणी मुंबई: नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, परीक्षांतील कथित अनियमितता आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस लाठीचार्जाच्या निषेधार्थ काँग्रेसने मंगळवारी मुंबईत गांधी भवन ते भाजप कार्यालय असा मोर्चा काढला. मात्र, रिगल सिनेमाजवळ पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात […]

अधिक वाचा..