गणेशोत्सवात मद्य विक्री बंदीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

पुणे: गणेशोत्सव काळात शहरातील मध्य भागातील मद्य विक्रीची दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा आदेशाला मंगळवारी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थिगितीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुधारित आदेश दिले. त्यानुसार मध्य भागातील मद्य विक्री दुकाने गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट), गौरी आगमन (३१ ऑगस्ट), गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) आणि विसर्जन सोहळ्याच्या (६ सप्टेंबर) दिवशी बंद राहणार आहेत. […]

अधिक वाचा..

कोणत्याही परिस्थितीत संविधान आणि कायद्याचे पालन करायला हवे

मुंबई: कोणत्याही परिस्थितीत संविधान आणि कायद्याचे पालन करायला हवे. आपल्या श्रद्धेला कुणी डिवचलं तरी देखील कायदा हातात घेऊ नका, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमातून केलं आहे. कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी देशासह जगभरात सुरू असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केलं. सध्या जगभरात कट्टरता असहिष्णुता आणि […]

अधिक वाचा..

शिरूरच्या मानाच्या महिला दहीहंडीचा जल्लोष

  सीताबाई थिटे डी फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनींचा सलग दुसरा विजय शिरुर (अरुणकुमार मोटे): “बोल बजरंगबली की जय!” या जयघोषात शिरूर शहर दुमदुमले, कारण यंदाही शिरूरच्या मानाच्या महिला दहीहंडीचा थरार रंगला. यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन व स्वराज्य रक्षक फाउंडेशन शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अद्वितीय महिला दहीहंडी उत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात […]

अधिक वाचा..

धारिवाल कुटुंबाकडून विठ्ठल मंदिर गणपतीला चांदीचा मुकुट अर्पण

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मानाचा चौथा समजला जाणारा श्री विठ्ठल मंदिर गणपती उत्सव यंदा खास ठरला आहे. शहरातील प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशशेठ धारिवाल व त्यांचे सुपुत्र आदित्य धारिवाल यांच्या हस्ते गणपतीची प्राणप्रतिष्ठा विधीपूर्वक पार पडली. या प्रसंगी धारिवाल कुटुंबाकडून पाच किलो वजनाचा भव्य चांदीचा मुकुट गणपती बाप्पाला अर्पण करण्यात आला. दानशूर वृत्ती, समाजाभिमुख कार्य व […]

अधिक वाचा..

चक्कर येणे घरगुती उपाय 

साध्या कारणामुळे चक्कर आली असली तर त्यावर पुढीलप्रमाणे घरगुती उपचार करता येतात. 1) पित्त वाढल्यामुळे चक्कर येत असली तर ताज्या आवळ्याचा रस चार चमचे त्यात चमचाभर खडीसाखर मिसळून घेतल्यास बरे वाटते. 2) रक्‍तदाब कमी झाल्याने चक्कर येत असली तर आल्याचा चमचाभर रस व चमचाभर मध हे मिश्रण थोडे – थोडे चाटून खाण्याचा उपयोग होतो. 3) […]

अधिक वाचा..

सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे

1) बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या रुग्णांसाठी सफरचंदाचे सेवन फायदेशीर ठरते. 2) किडनी स्टोनची समस्या टाळण्यासाठी रोज सकाळी सफरचंदाचे सेवन करावे. 3) सफरचंदाच्या सेवनाने वृद्धत्वामुळे मेंदूवर होणारा परिणाम दूर होण्यास मदत होते. 4) सफरचंदात आहारातील फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे पचनक्रिया योग्य ठेवण्यास मदत करतात. 5) सफरचंदात फायबर असते, जे दात मजबूत ठेवण्यास मदत करते. […]

अधिक वाचा..

पालकमंत्री गोरे-आमदार कल्याशेट्टींमुळे मिळालेली मानेंची खुर्ची डळमळीत

दोन आमदार देशमुखांचा गुप्त करार सोलापूर: बाजार समितीत पुन्हा एकदा सत्ता समीकरणांचा खेळ रंगताना दिसतो आहे. पालकमंत्री गोरे व आमदार कल्याणशेट्टी यांच्या मदतीने सभापतिपदाची खुर्ची पटकावलेले माजी आमदार दिलीप माने यांचे स्थान आता डळमळीत होऊ लागल्याची चर्चा आहे. अविश्वासाच्या सावटाने बाजार समितीचे राजकारण तापले आहे. नाराज संचालकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील निवडणुकीत कट्टर […]

अधिक वाचा..

व्यापार हत्यार बनलं असून हा हिंदुस्थानसाठी वेकअप कॉल 

मुंबई: अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के टॅरिफची अंमलबजावणी सुरू झाली असून यामुळे हिंदुस्थानवर मोठा आर्थिक बोझा पडणार आहे. याचा विविध क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. याबाबत आता ‘रिझर्व्ह बॅक ऑफ इंडिया’चे माजी गव्हर्नर आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. रघुराम राजन यांनी मोठे विधान केले आहे. जागतिक पातळीवर व्यापाराला हत्यार बनवले जात असून हिंदुस्थानसाठी हा वेकअप कॉल असल्याचे रघुराम […]

अधिक वाचा..

विरार इमारतीच्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू 

वसई: विरार इमारत दुर्घटनेत मागील वीस तासांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व पालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 17 जणांचा शोध लागला असून त्यात 14 जणांचा मृत्यू तर 1 जण जखमी झाले आहे. तर 2 जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढत आहे. मंगळवारी रात्री विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या […]

अधिक वाचा..

गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रात तोडपाण्याचा उद्योग, महाराष्ट्र बिहार होण्याच्या मार्गावर

पुणे: पुण्यात गोरक्षकांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी निषेध व्यक्त केला. गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये तोडपाण्याचा उद्योग सुरू असून महाराष्ट्र बिहारप्रमाणे होण्याच्या मार्गावर असल्याची टीका नायकवडी यांनी केली. त्यामुळे या गोरक्षकांच्या मुद्यावरुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या इद्रिस नायकवडी यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला. गोरक्षणाच्या […]

अधिक वाचा..