पॉलीटेक्निक प्रवेशासाठी अर्जाची मुदत ६ जुलैपर्यंत वाढली.

मुंबई: राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ६ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम मुदत २ जुलै होती. मात्र विद्यार्थ्यांकडून मुदतवाढीची सातत्याने होत असलेली मागणी आणि प्रवेश […]

अधिक वाचा..

महापुरुषांच्या साहित्याच्या पुनर्मुद्रणाला गती; संशोधनाधिष्ठित साहित्यनिर्मितीवर भर; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनकार्याचे सखोल संशोधन होणे गरजेचे असून, चरित्र-साधने प्रकाशन समित्यांनी समाजोपयोगी व संशोधनाधिष्ठित साहित्यनिर्मितीला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महात्मा जोतिराव फुले चरित्र-साधने प्रकाशन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उच्च […]

अधिक वाचा..

हरित इंधन की महागडा प्रयोग? नागरिकांच्या खिशाची जबाबदारी कोणाची?

मुंबई: देशाला हरित ऊर्जा हवी, पर्यावरणाचे संरक्षण झाले पाहिजे आणि परदेशी तेलावरील अवलंबित्व कमी झाले पाहिजे, याबद्दल दुमत नाही. मात्र, खरा प्रश्न असा आहे की हा विकास जनतेच्या हिताचा आहे की जनतेच्या खिशावरचा? अनेक वाहनचालकांचा दावा आहे की इथेनॉल-मिश्रित पेट्रोल वापरल्यानंतर फ्यूल पंप, इंजेक्टर, रबर सील आणि इंधन यंत्रणेतील काही भाग अपेक्षेपेक्षा लवकर खराब होत […]

अधिक वाचा..

शिरुर; ‘हेड टू टेल’ आणि ‘टेल टू हेड’ समजायला विद्यमान आमदारांना अजुन काही दिवस लागतील”; अशोक पवार

शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विद्यमान आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार हे आमनेसामने आले असुन चासकमान कालव्याच्या पाणीवाटप आणि अस्तरीकरणाच्या मुद्द्यावर “हेड टू टेल आणि टेल टू हेड समजायला विद्यमान आमदारांना अजून काही दिवस लागतील” अशी घणाघाती टिका माजी आमदार अशोक पवार यांनी कटके यांच्यावर केली.  […]

अधिक वाचा..
nitin-thorat-award

आमदाबाद येथील नितीन थोरात यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान!

शिरूर : शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावचे सुपुत्र आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी नितीन थोरात यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला. श्री. थोरात यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्हा परिषद पुणे, कृषी विभाग (महाराष्ट्र शासन), आत्मा पुणे आणि पंचायत समिती हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. कै. वसंतरावजी […]

अधिक वाचा..

डॉ. श्रीकांत शिंदे! विकासाभिमुख नेतृत्वाची ओळख अधिक दृढ

मुंबई: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी पायाभूत सुविधा, आरोग्य, वाहतूक आणि नागरी विकासाच्या विविध प्रकल्पांचा सातत्याने पाठपुरावा करत विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातून सार्वजनिक जीवनात प्रवेश केलेल्या डॉ. शिंदे यांनी लोकसेवा हेच ध्येय ठेवून राजकारणात सक्रिय भूमिका स्वीकारली. कल्याण-डोंबिवलीसह मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या नागरी गरजा लक्षात […]

अधिक वाचा..

परिणय फुके यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार प्रतिउत्तर

मुंबई: भाजपचे आमदार परिणय फुके यांनी राज ठाकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे “चोराच्या उलट्या बोंबा” असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे. ज्यांच्या पक्षावर सातत्याने पक्षफोडीचे आरोप झाले, त्यांनी इतरांना फोडाफोडीचे धडे देणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या बुद्धिमत्तेचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले. ॲड. मातेले म्हणाले की, राज ठाकरे […]

अधिक वाचा..

राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करा; आयुष्मान योजनेचा विस्तार करा; सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि खासगी रुग्णालयांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची मागणी विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत अर्धा तास चर्चेदरम्यान केली. तांबे यांनी सांगितले की, शासकीय रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता, औषधांचा […]

अधिक वाचा..

शेतकरी आत्महत्यांवरील चर्चा नाकारल्याने विरोधकांचा विधानसभेत सभात्याग.

मुंबई: राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांचा अत्यंत गंभीर मुद्दा आज विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला. मात्र, या विषयावर चर्चा घेण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने काँग्रेससह विरोधी पक्षांच्या आमदारांनी सभागृहातून सभात्याग केला. विजय वडेट्टीवार यांनी पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच लातूरमध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख करत, राज्यातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती, वाढते आर्थिक […]

अधिक वाचा..

राम कदमांचा नैतिकतेचा आव; ‘दुसऱ्याला सांगे ज्ञान, स्वतः कोरडे पाषाण’; अमोल मातेले

मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर हक्कभंगाची भाषा करून नैतिकतेचा आव आणला असून, “दुसऱ्याला सांगे ज्ञान, स्वतः कोरडे पाषाण” ही म्हण त्यांच्यावर तंतोतंत लागू पडते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी केली आहे. मातेले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे […]

अधिक वाचा..