दीर्घायुष्यासाठी दीर्घ श्‍वसन फायदे तोटे

आपण अस्वस्थ होतो तेव्हा नेहमी शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय जेव्हा जखम होते तेव्हा उपचार करीत असताना आपण श्‍वास रोखून धरतो. श्‍वासाचा वापर करून मानसिक अस्थिरता कमी करण्या सोबतच वेदनेची तीव्रता कमी करता येते. श्‍वास ही नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे ती चालू राहण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज नाही, असे आपल्याला वाटते; पण याच विचारातून आपण […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत एल्गार थांबणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ 

छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आयोजित ‘एल्गार अन्नदात्याचा’ आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारने फसवी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, सातबारा कोरा होईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

संगमनेर अॅसिड हल्ला प्रकरणात आरोपीला तातडीने अटक करून पीडितेला न्याय द्या; आमदार सत्यजीत तांबे

मुंबई: संगमनेर येथे १२ वर्षीय मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणात ९० दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही आरोपीचा शोध लागलेला नसल्याने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून पीडित मुलीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तांबे यांनी निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर […]

अधिक वाचा..

महागाई, नोकरभरती आणि शेतकरी प्रश्नांवरून अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : राज्यातील वाढती महागाई ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती किंवा आखाती युद्धामुळे नसून राज्य सरकारच्या चुकीच्या आणि दिशाहीन धोरणांचा परिणाम असल्याचा घणाघात माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार यांनी विधान परिषदेत केला. विरोधकांच्या वतीने मांडण्यात आलेल्या २६० च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी महागाई, रखडलेली नोकरभरती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले. महागाईसाठी प्रत्येकवेळी आखाती युद्धाला जबाबदार धरण्यावर टीका […]

अधिक वाचा..

MPSC प्रश्नांवर सरकारने स्पष्ट उत्तर द्यावे; सतेज पाटील यांचे विधान परिषद सभापतींना पत्र

मुंबई: “लोकशाहीत प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही, तर विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे,” असे सांगत विधान परिषदेतील काँग्रेसचे विधिमंडळ नेते सतेज (बंटी) पाटील यांनी राम शिंदे यांना पत्र लिहून महाराष्ट्र लोकसेवा आयोग संदर्भातील सभागृहात विचारलेल्या प्रश्नांना सरकारने सविस्तर, वस्तुनिष्ठ आणि समाधानकारक उत्तरे द्यावीत, अशी मागणी केली आहे. सतेज पाटील यांनी पत्रात […]

अधिक वाचा..

TET पेपरफुटीप्रकरणी विधानभवनात शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे; NSUI चे आंदोलन

मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीप्रकरणी काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI आक्रमक झाली असून, आज विधानभवन परिसरात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवत तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. NSUI महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थी व कार्यकर्ते विधानभवन परिसरात जमले होते. शिक्षणमंत्री दादा भुसे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र बनविण्यास शासन कटिबद्ध; डॉ. राजेश गवांदे

मुंबई: महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा (Oral Healthcare) क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, परकीय थेट गुंतवणुकीसह (FDI) देशांतर्गत उद्योगांनाही चालना दिली जाईल, असे प्रतिपादन राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय व्यवहार व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे यांनी केले. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे […]

अधिक वाचा..

नसरापूर प्रकरणातील फाशीच्या शिक्षेचे शिवसेना महिला आघाडीने केले स्वागत; शिक्षेची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी

मुंबई: नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल शिवसेना महिला आघाडीने समाधान व्यक्त केले आहे. मात्र, या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी महिला आघाडीने केली. तसेच अशा गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी आरोपींना कठोर आणि तातडीने शिक्षा होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना प्रवक्त्या […]

अधिक वाचा..

एमएमआरचा सर्वांगीण विकास काही वर्षांत प्रत्यक्षात; परवडणारी घरे आणि आधुनिक वाहतूक सुविधांवर भर; डॉ. श्रीकांत शिंदे

मुंबई: परवडणारी घरे, दर्जेदार मूलभूत सुविधा आणि आधुनिक दळणवळण व्यवस्था या तीन प्रमुख बाबींवर भर देत मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन Dr. Shrikant Shinde यांनी केले. माजी खासदार Rahul Shewale यांच्या संकल्पनेतून Mumbai Metropolitan Region Development Authority तर्फे मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये आयोजित ‘एमएमआर@2047’ या परिषदेत […]

अधिक वाचा..

बिश्नोई गँगवर सरकारला काँग्रेसचा घेराव; कायदा-सुव्यवस्थेवर विजय वडेट्टीवार यांचे गंभीर प्रश्न

मुंबई: राज्यात बिश्नोई गँगच्या नावावरून सुरू असलेल्या खंडणी, जीवे मारण्याच्या धमक्या आणि गोळीबाराच्या वाढत्या घटनांवरून विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक बनल्याचा आरोप करत त्यांनी गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. पिंपरी-चिंचवड येथील एका फर्निचर व्यावसायिकाच्या दुकानावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियावर […]

अधिक वाचा..