अजितदादांच्या कार्याला सलाम! आर्यनसिंह दडियालाचा २१० किमी पोहण्याचा ऐतिहासिक विक्रम

मुंबई: ‘कामाचा माणूस’ म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या कार्याला मानवंदना म्हणून युवक आर्यनसिंह दडियाला याने २१० किलोमीटरचे खुल्या समुद्रातील दोन-मार्गी (टू-वे) एकल (सोलो) मॅरेथॉन पोहण्याचे अभूतपूर्व यश संपादन केले आहे. महाराष्ट्र सीमेजवळील क्वेरीम बीच ते कर्नाटक सीमेजवळील पोलेम बीच या दरम्यान हा पराक्रम पार पडला.२८ एप्रिल ते ३० एप्रिल […]

अधिक वाचा..

इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी; येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवित, इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली. यापूर्वी इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या अभ्यासक्रम आराखड्यांना मंजुरी देण्यात आली असून, आता सहावीचाही समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या […]

अधिक वाचा..

‘हरलो नाही, राजीनामा नाही’ ममता बॅनर्जी ठाम; कालीघाटातून संघर्षाची घोषणा

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे वळण आले असून Mamata Banerjee यांनी पराभव मान्य करण्यास नकार दिला आहे. “राजीनामा देणार नाही, आम्ही हरलो नाही. हा जनादेश चोरला गेला आहे,” अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. कालीघाट येथील निवासस्थानातून बोलताना ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की, सुमारे १०० जागांवर परिणाम झाला असून मतदार याद्यांतील SIR […]

अधिक वाचा..

एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणर; प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरात ३००० हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक आगार व प्रमुख बसस्थानकांवरही ही कार्डे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी १९९ रुपये, तर यापूर्वी स्मार्ट […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

Video! रांजणगाव MIDC दहशतीत! कामगारांवर हल्ले आणि लूटमारीचे वाढले प्रमाण…

रांजणगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत (MIDC) परिसरात परप्रांतीय कामगारांवर हल्ले, लूटमार आणि अमानुष मारहाणीच्या घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनत असून, “कामगार सुरक्षित तर उद्योग सुरक्षित” हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.   View this post on Instagram   A post shared […]

अधिक वाचा..
karegaon-drugs

रांजणगाव परिसरात ‘ड्रग्ज मुक्त गाव’ मोहिमेला वेग; कारेगाव येथे जनजागृती कार्यक्रम…

रांजणगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव MIDC पोलीस ठाणे हद्दीत कारेगाव येथील श्री कारेश्वर मंदिर सभागृहात आज सकाळी 10.30 ते 12.00 या वेळेत ‘ड्रग्ज मुक्त गाव’ या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक महादेव वागमोडे यांनी केले. यावेळी ग्रामस्थांना अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व […]

अधिक वाचा..

डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड; शिंदेंचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. सोमवारी (४ मे) महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानभवन येथे त्यांना अधिकृत निवड प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० एप्रिल रोजी डॉ. गोऱ्हे आणि ओमप्रकाश (बच्चू) कडू यांना उमेदवारी दिली होती. २ मे रोजी झालेल्या छाननीनंतर […]

अधिक वाचा..

पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात

पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे, केस आणि शरीर या सर्व महत्त्वाच्या कार्यांसाठी पाणी आवश्यक आहे. शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून तज्ज्ञ पाणी पिण्य़ाचा सल्ला देतात. पण पाणी पिण्याची देखील ठराविक वेळ असते. पाणी पिताना आपल्याकडून बरेच नकळत चुका घडतात. ज्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. […]

अधिक वाचा..

हाय ब्लड प्रेशरला हलक्यात घ्याल तर होईल पश्चाताप

बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य समस्या असल्याचं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहीत नसतं की, ही समस्या जर कंट्रोल केली नाही तर हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका अधिक वाढतो. इतकंच काय तर असेही भरपूर लोक असतात ज्यांना हेही माहीत नसतं की, ते लो बीपी किंवा […]

अधिक वाचा..

शिरूर शहरात वारंवार वीज खंडित; रोहित्रांची क्षमता वाढविण्याची नागरिकांची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांसह व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात वीज पुरवठा खंडित होत असल्याने संताप व्यक्त केला जात असून महावितरण प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित भागातील विद्युत रोहित्रांवर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे […]

अधिक वाचा..