परिवहन विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे राज्यात रस्ते अपघात व त्यातील बळींची संख्या उच्चांकी पातळीवर

मुंबई: राज्यभरातील रस्त्यांवर सातत्याने होत असलेले अपघात आणि त्यात मृत्यूमुखी पडणा-या नागरिकांची संख्या पाहता रस्ता सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे. परिवहन विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळेच राज्यात अपघातांची व बळींची संख्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी […]

अधिक वाचा..

परिवहन विभागाच्या कारभारावर काँग्रेसचा हल्ला; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई: राज्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने परिवहन विभागावर जोरदार टीका करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत निवेदन जारी करून राज्य सरकार रस्ता सुरक्षेबाबत पूर्णतः अपयशी ठरल्याचा आरोप केला. मुरबाड–कल्याण मार्गावरील इको कार अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांना काँग्रेसकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. […]

अधिक वाचा..

कवठे येमाईत एकाच घटनेचे दोन पैलू

मारहाण आणि विनयभंगाच्या परस्पर तक्रारींनी प्रकरण तापले शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई परिसरात ३ एप्रिल रोजी घडलेल्या एका घटनेने अनपेक्षित वळण घेतले असून, त्याच घटनेतून मारहाण आणि विनयभंगाच्या परस्परविरोधी तक्रारी समोर आल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. पोलिसांसमोर नेमका घटनाक्रम उलगडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. प्राथमिक तपासानुसार, या घटनेची सुरुवात किरकोळ वादातून […]

अधिक वाचा..

भारतीय संगीतविश्वातील जादुई आवाज हरपला

मुंबई: भारतीय संगीत क्षेत्राला अजरामर करणाऱ्या स्वरसम्राज्ञी, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असल्याची भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी व्यक्त केली. आपल्या शोकसंदेशात मंत्री भोंसले म्हणाले की, आशा भोसले यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि जादुई गायनशैलीने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. विविध भाषांमधील हजारो गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय संगीतसृष्टी समृद्ध […]

अधिक वाचा..

शिवसेना हे कुटुंब, आपापसातील कुरबुरी आणि मतभेद दूर करून एकसंघ व्हा

धाराशिव: शिवसेना हे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये काही कुरबुरी असतील काही मतभेद असतील ते दूर करा आणि एकसंघ व्हा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव येथे बोलताना केले. धाराशिवमधील भव्य नागरी सत्कार सोहळ्यातून कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हे आवाहन केले. “शिवसेना ही काँग्रेसच्या दावणीला बांधून टाकली होती… ती वाचवण्यासाठीच आम्हाला उठाव करावा लागला!” असा जोरदार […]

अधिक वाचा..

पंढरपूरच्या भूमीतून शिंदेंचा विकास मंत्र; भालके यांच्या प्रवेशाने राजकीय समीकरणांना नवा ट्विस्ट

पंढरपूर: “विकासाचा वारकरी आणि धाडसी निर्णय घेणारा जननेता” अशी ओळख अधिक ठळक करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरच्या पावन भूमीतून जनतेशी थेट संवाद साधत विकास, हिंदुत्व आणि जनसेवेचा ठाम संदेश दिला. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’च्या गजरात झालेल्या या विराट मेळाव्यात भगीरथ भालके यांच्या शिवसेना प्रवेशाने राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली, तर शिंदे यांच्या आक्रमक आणि […]

अधिक वाचा..

आशाताई यांच्या निधनाने संगीतविश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत; जयकुमार रावल

मुंबई: ज्येष्ठ गायिका स्व.आशाताई भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. स्व.आशाताई यांच्या रूपाने भारतीय संगीत विश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.   आशाताई भोसले यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या […]

अधिक वाचा..

भारताला अमेरिकेचा गुलाम बनवणारी ट्रेड डील रद्द करा; नसीम खान

मुंबई युवक काँग्रेसच्या न्याय सत्याग्रहाला माजी मंत्री आरिफ नसीम खान यांची उपस्थिती मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डील करून भारताचा स्वाभिमान, अस्मिता गहाण ठेवली आहे. या ट्रेड डिलमुळे भारताचे मोठे नुसकान होणार असून भारतातील कृषी क्षेत्र व आपला अन्नदाता पुर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. भारताला अमेरिकेचा गुलाम बनवणारी ट्रेड डील रद्द झाली पाहिजे, अशी […]

अधिक वाचा..

उबाठा गटात ‘संशय कल्लोळ’चा प्रयोग; खासदारांकडून रोज निष्ठेची परीक्षा; डॉ. ज्योती वाघमारे

मुंबई: शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर जोरदार टीका करत पक्षातील वातावरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खासदारांमधील असंतोष दडपण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. उबाठा गटात सध्या ‘संशय कल्लोळ’ नाटकाचा प्रयोग सुरू असल्यासारखी परिस्थिती असून, खासदारांना दररोज निष्ठा सिद्ध करण्यासाठी आणाभाका घ्याव्या लागत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. […]

अधिक वाचा..

फुले द्विशताब्दी वर्षासाठी राज्यभर वर्षभर उपक्रम; शालेय शिक्षण विभागाचा व्यापक आराखडा जाहीर

मुंबई: महात्मा जोतीराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त सन 2027 हे द्विशताब्दी वर्ष राज्यभर विविध उपक्रमांनी साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत सर्व शाळांमध्ये शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यासाठी व्यापक कृती आराखडा जाहीर केला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे […]

अधिक वाचा..