गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुतुल्य नेतृत्वाला विनम्र अभिवादन

मुंबई: भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. गुरुपौर्णिमा हा केवळ पूजनाचा उत्सव नसून प्रेरणा देणाऱ्या, घडवणाऱ्या आणि संकटसमयी मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. समाजजीवनाप्रमाणेच राजकारणातही काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांच्या नेतृत्वातून हजारो कार्यकर्ते घडतात, त्यांना दिशा मिळते आणि संघर्ष करण्याची ऊर्जा प्राप्त होते. शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे […]

अधिक वाचा..

एसटी प्रवासासाठी NCMC स्मार्ट कार्डची मुदत वाढली; आता १ सप्टेंबरपर्यंत मिळणार अतिरिक्त वेळ

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ दिली आहे. पूर्वी १ ऑगस्टपर्यंत असलेली अंतिम मुदत आता १ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि इतर लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आणखी एक महिन्याचा अतिरिक्त वेळ मिळाला आहे. […]

अधिक वाचा..

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षीच्या परंपरेनुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सहकाऱ्यांसमवेत स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी […]

अधिक वाचा..

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ गुरुवार (३० जुलै) रोजी सकाळी ११ वाजता वरळी येथील एनएससीआय डोममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या अभियानात युवक, विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नशामुक्त […]

अधिक वाचा..

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या दर्जाच्या भाषेवर टीका होत आहे. सार्वजनिक चर्चेत सभ्य भाषेचे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार आहे; पण शिवीगाळ, वैयक्तिक अपमान आणि अश्लीलतेचे समर्थन कोणत्याही बाजूने होऊ शकत नाही. पण या वादात एक वेगळाच विरोधाभास समोर येतो आहे. ज्यांनी […]

अधिक वाचा..

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ही केवळ अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराचा परिणाम असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी […]

अधिक वाचा..

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र प्रदेश NSUI चे अध्यक्ष सागर साळुंखे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सात दिवसांत नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस, NSUI आणि समविचारी संघटनांसह राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. टिळक भवन […]

अधिक वाचा..

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे ‘नशामुक्त मुंबई’ अभियानाची सुरुवात 30 जुलै रोजी वरळी डोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हे अभियान केवळ उद्घाटनापुरते मर्यादित नसून, वर्षभर चालणारी व्यापक जनजागृती मोहीम असेल, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. अभियानाच्या पूर्वतयारीसंदर्भातील आढावा बैठकीत […]

अधिक वाचा..

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार वीरसैनिक, वीरपत्नी, वीरमाता आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी कायम ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. महाराष्ट्र शासन आणि स्वरनिनाद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकभवन, मुंबई येथे आयोजित या सोहळ्यात कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच वीरसैनिकांच्या वीरपत्नी आणि वीरमातांचा […]

अधिक वाचा..

उबाठा गटाला मोठा धक्का! अहिल्यानगर, पुणे, नांदेडमधील शेकडो पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीर पक्षप्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त ठाणे: राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून अहिल्यानगर, पुणे आणि नांदेड जिल्ह्यांतील उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ठाण्यात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे संबंधित जिल्ह्यांमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का […]

अधिक वाचा..