मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम…

नाशिक: मी रामकृष्ण हरी वाली आहे, फक्त माळ घालत नाही, कधी कधी खाते, खरे बोलते…मी त्यांच्यासारखं खोटं बोलत नाही आणि खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातोय आणि […]

अधिक वाचा..

त्यांची वर्षा बंगल्यावर दीड तास चर्चा, उपराष्ट्रपती पदाबद्दल काय निर्णय होणार…

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री वर्षा निवासस्थानी दीड तासाहून अधिक वेळ बैठक घेतली. या चर्चेत महायुतीतील समन्वय, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि मराठा आरक्षण आंदोलन यावर सविस्तर चर्चा झाली. दरम्यान, मागील काही दिवसांपासून महायुतीत समन्वयाचा अभाव जाणवत होता. मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये, भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे वातावरण ढवळून निघाले […]

अधिक वाचा..

निवृत्त न्यायमूर्तींच्या निर्णयांवर सर्वोच्च कोर्टाचा मोठा आदेश

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुरेश्वर ठाकूर यांच्या सर्व निकालांना रद्द केले आहे. “सुदैवाने, हे न्यायमूर्ती आता निवृत्त झाले आहेत,” असे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी सांगितले. ठाकूर यांच्या निकालांमधील अस्पष्ट भाषा आणि तर्कशास्त्र समजून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही अडचणी आल्या होत्या. ठाकूर 17 मे रोजी निवृत्त झाले. खटल्यातील गुंतागुंत […]

अधिक वाचा..

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेतून ते नाव वगळल्याने नागरिकांमध्ये नाराजी

पुणे: महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचना भाजपचे पालिकेतील माजी पदाधिकारी आणि नेत्यांना अनुकूल झाली आहे. मात्र, भाजपच्या काही माजी नगरसेवकांचे प्रभाग तोडल्यामुळे अनसेफ झाले आहेत. नगरविकास खाते शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे शिंदेसेनेच्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रभागरचना सेफ झाली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांचे प्रभाग तोडले आहेत. त्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाची कोंडी झाली […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपती पदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंबा नाही; शरद पवार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनी करून उपराष्ट्रपती पदासाठी भाजप आघाडीचे उमेदवार, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती केली असली तरी ते आमच्या विचाराचे नसल्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल असतानाच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनात अटक करण्यात […]

अधिक वाचा..

अमित ठाकरे आशिष शेलारांना भेटणार; दोन दिवसांआधी राज ठाकरेंनीही देवेंद्र फडणवीसांची भेट का घेतली…

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे आज मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांची भेट घेणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांआधीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (23 ऑगस्ट) अमित ठाकरे आशिष शेलार यांची भेट घेणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आजच्या भेटीत अमित ठाकरे […]

अधिक वाचा..

अखेरच्या क्षणापर्यंत सुटली नाही साथ; पतीच्या निधनानंतर अवघ्या 20 मिनिटात पत्नीनेही सोडले प्राण

वहागाव: पती- पत्नीचे नाते हे अतूट आणि एकमेकांचे आयुष्य व्यापून टाकणारे असते. चुकूनही मी तुझा हात सोडणार नाही, असे वचन एकमेकांना देत ते निभवण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतात; पण मृत्यूनंतरही एकमेकांची साथ सोडत नाहीत, अशा काही अपवादात्मक घटना कुठेतरी घडल्याचे कानावर पडते. तळबीडलाही (गुरुवार) अशीच घटना घडली. आयुष्यभर साथ देणाऱ्या पतीच्या निधनानंतर अवघ्या २० मिनिटांतच पत्नीनेही […]

अधिक वाचा..

बेरोजगारीच्या प्रश्नावर २५ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा.

मुंबई: राज्य सरकारच्या विविध विभागात तब्बल २.५ लाख रिक्त पदे असूनही नोकर भरती केली जात नाही. लाखो तरुणांच्या भविष्याशी सरकार खेळ खेळत आहे. रिक्त जागा असतानाही सरकार मात्र कंत्राटीपद्धतीने भरती करत आहे. काँग्रेस पक्ष या बेरोजगारी विरोधात आवाज उठवत असून छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी २५ ऑगस्ट रोजी “रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. […]

अधिक वाचा..

‘एक वही, एक पेन’ उपक्रमास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा उत्साहवर्धक प्रतिसाद

गणेशोत्सवात समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे सहकार्य मुंबई: समाजातील गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी सुरू असलेल्या ‘एक वही, एक पेन’ या उपक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोलाचा हातभार लावला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने हारफुलांसह शैक्षणिक साहित्य श्री गणेशचरणी अर्पण करून वंचित विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संदेश या अभियानातून दिला […]

अधिक वाचा..

मी सोबत नांगराचा फाळ आणला आहे, माझ्या नादाला लागला तर…

सांगोला: सांगोला येथे जर्सी आणि पोस्टन भाकड गाई कत्तलखान्याला पाठवण्यास विरोध करणाऱ्या गोरक्षकांच्या विरोधात रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. ते बोलताना म्हणाले, माझ्या नादाला लागून आजवर अनेक जण भेंडाळले आता तुम्ही आलात काय? अस बोलत महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांना थेट […]

अधिक वाचा..