वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई: भारतात उत्पादित होणाऱ्या पहिल्या मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिपबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मोठी घोषणा केली. २०२५ च्या अखेरीस पहिली मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप बाजारात उपलब्ध होईल, असं मोदी म्हणाले. तसेच, मेड इन इंडिया 6 जी नेटवर्क विकसित करण्यासाठी सरकार वेगाने काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी मोदी म्हणाले, “या वर्षाच्या […]

अधिक वाचा..

सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा

बीड: बीड येथील सरकारी वकील विनायक लिंबाजी चंदेल (वय ४७, रा. इंदेवाडी, जि. परभणी) यांनी २० ऑगस्ट रोजी वडवणी न्यायालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणात दोन दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी एका न्यायाधीशावर आणि लिपीकावर मनमानी कारभार, वारंवार अपमान करून मानसिक छळाचा आरोप केल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. […]

अधिक वाचा..

कुत्र्यांनी वाचवले मालकाचे प्राण! मेंढपाळांवर बिबट्याचा हल्ला

खोडद: मेंढ्यांच्या वाड्यात घुसून करडावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता, बिबट्याने मुलगा आणि बापावर हल्ला केला. मात्र, याचवेळी वाड्यावर असलेल्या चार पाळीव कुत्र्यांनी बिबट्यावर झडप घातल्याने बाप व मुलगा बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले. तर कुत्र्यांच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव कांदळी येथे शुक्रवारी (दि. २२) रात्री दीडच्या सुमारास घडली. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवासाठी शाळांना किती दिवसांची सुट्टी, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

पुणे: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, या उत्सवासाठी शाळांना किती दिवस सुट्टी मिळणार याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. यंदा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होत असून, ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. या ११ दिवसांच्या उत्सवादरम्यान शाळांना मिळणाऱ्या सुट्ट्यांबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे मुंबई आणि कोकणातील शाळांना किती सुट्ट्या मुंबई आणि कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या […]

अधिक वाचा..

पुण्यात त्या हॉस्पिटलमध्ये पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू

पुणे: डेक्‍कन येथील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पतीचा व त्‍यांना यकृत देणाऱ्या पत्‍नीचा सहा दिवसांनी मृत्यू झाला. नातेवाइकांनी रुग्णालयाकडून शस्त्रक्रियेत निष्काळजीपणा झाल्याचा आरोप केला आहे.तर, वैद्यकीय नियमांनुसार शस्त्रक्रिया करण्यात आली असून प्रत्‍यारोपणानंतर पतीला हृदयविकाराचा झटका (कार्डिओजेनिक शॉक) आल्‍याने व पत्‍नीचा अचानक रक्तदाब खूप कमी झाला (हायपोटेन्सिव्ह शॉक) ने मृत्‍यू झाल्‍याचे रुग्‍णालयाच्‍या वतीने सांगण्‍यात आले.यामध्ये […]

अधिक वाचा..

वादानंतर आईने भडकावले, हातात चाकू सोपवला

संभाजीनगर: दोन्ही कुटुंबांचे अवघ्या १०० मीटर अंतरावर घर. दोघांचा किराणा दुकानाचा व्यवसाय. मात्र, निमोणे कुटुंबाचा वाळू, जेसीबी, पाण्याच्या टँकर व्यवसायात जम वाढला होता. राजकीय पाठबळामुळे गुंडगिरीचा आत्मविश्वास वाढला होता. पाेलिस, मनपा, सिडकोकडे तक्रारींनंतरही त्यांनी पाडसवान कुटुंबाला मारहाण व धमकावणे सुरूच ठेवले. दोन वर्षांचे वाद अखेर प्रमोद पाडसवान यांच्या हत्येपर्यंत येऊन थांबले. शुक्रवारी दुपारी १ वाजता […]

अधिक वाचा..

सचिन तेंडुलकरचा ‘तो’ सल्ला ऐकल्याचा पश्चाताप, राहुल द्रविडनं बोलून दाखवली खंत

मुंबई: महान क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविडनं त्याच्या कारकिर्दीमधील एका घटनेबद्दल पहिल्यांदाच सांगितलं आहे. ज्यामध्ये त्यानं सचिनचा सल्ला ऐकला होता. त्याचा मला आजही पश्चाताप होतो, असं द्रविडनं सांगितलं. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे दोघंही टीम इंडियाचे महान क्रिकेटपटू आहेत. त्यांनी जवळपास दीड दशकं आंतरराष्ट्रीय क्रिकेट एकत्र खेळलं. भारताकडून खेळताना अनेक विक्रम […]

अधिक वाचा..

सत्यानाश होईल साल्यांचा, ठाकरे गट सोडणाऱ्यांवर बडा नेता संतापला

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राज्य तसेच स्थानिक पातळीवर युती आणि आघाडीचे राजकारण जोर धरू लागले आहे. काही ठिकाणी तर स्थानिक पदाधिकारी ही निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी आग्रही आहेत. तर राज्यपातळीवरील नेते महापालिका, जिल्हा परिषदा हातातून जाऊ नयेत म्हणून ताकद असलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात बोलवून घेत आहेत. […]

अधिक वाचा..

मनोज जरांगे आंदोलनावर ठाम, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

  मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे, येत्या 29 ऑगस्टला मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे. हा मोर्चा पहिल्या मोर्च्यापेक्षा पाच पट मोठा असेल असा इशारा देखील मनोज जरांगे पाटलांकडून देण्यात आला आहे, जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान यावर आता ओबीसी नेते […]

अधिक वाचा..

कोल्हापुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घातलं लक्ष

कोल्हापूर: कोल्हापुरामध्ये दोन गटांत वाद होता. पोलिसांनी वाद नियंत्रणात आणलेला आहे; पण ज्यांनी दंगली घडविली, त्या सर्वांवर कारवाई होणार, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना दिला. भाजप जातीय दंगली घडवून आणत आहे, या विरोधकांच्या टीकेला त्यांनी उत्तर द्यायचे टाळले. विरोधकांना काही कामधंदा उरलेला नाही. त्यामुळे त्यांचे प्रश्न विचारून माझा वेळ […]

अधिक वाचा..