शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरीचा सन्मान; डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी संतोष जगदाळे यांनी पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळाल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते आसावरी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एप्रिल २०२५ मध्ये जगदाळे कुटुंबीयांची भेट घेऊन शासकीय सेवेत नोकरी […]

अधिक वाचा..

एपस्टिन फाईल प्रकरणावरून नागपुरात काँग्रेस-वंचितचा ‘संघ मुख्यालयावर’ धडक मोर्चा

मुंबई: एपस्टिन फाईल प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर Indian National Congress (काँग्रेस) आणि Vanchit Bahujan Aghadi (वंचित बहुजन आघाडी) यांच्या वतीने सोमवार, २३ मार्च रोजी नागपुरात संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा संविधान चौक येथून Rashtriya Swayamsevak Sangh (रा. स्व. संघ) यांच्या मुख्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal आणि वंचित बहुजन […]

अधिक वाचा..

रामनवमीत नवी मुंबईत रंगणार ‘लोककला दर्शन’चा भव्य सोहळा

नवी मुंबई: रामनवमी निमित्त नवी मुंबईकरांसाठी यंदा खास सांस्कृतिक मेजवानीची पर्वणी ठरणार आहे. सेक्टर १९, भूमिकोलोसा चौक, ऐरोली येथे श्रीराम संकल्प प्रतिष्ठानतर्फे २६ मार्च रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे मुंबई विश्व लोककला मंच सादर करीत असलेला ‘लोककला दर्शन’ हा महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सांगीतिक कलाविष्कार. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना राज्यातील विविध […]

अधिक वाचा..
ashok-kharat

शिरूरच्या राजकीय पुढाऱ्याकडून अशोक खरात अन् दोन आमदारांना आलिशान महागड्या गाड्यांची भेट…?

शिरूर (तेजस फडके) : नाशिक जिल्ह्यातील वादग्रस्त आध्यात्मिक धर्मगुरु अशोक खरात याने काही महिन्यांपुर्वी शिरुरमधील राजकीय पुढारी राजेंद्र जासुद याच्यावर तब्बल पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करत वावी (जि. नाशिक) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. शिरूर तालुक्यातील राजकीय पुढारी राजेंद्र जासुद […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री, उशीर झाला! नाशिक भोंदू बाबा प्रकरणात चौकशीची मागणी; महिला आयोगावरही प्रश्नचिन्ह

  नाशिक : राज्यात चैत्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या कथित भोंदू बाबा प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अंधश्रद्धा, महिलांचे कथित शोषण आणि त्याला मिळालेल्या संभाव्य राजकीय आश्रयामुळे राज्यातील वातावरण तापले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नाशिकमध्ये अशोक खरात या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा […]

अधिक वाचा..

मिलेटचे महत्व लक्षात घेऊन महोत्सवाची व्याप्ती राज्यभर वाढविणार; पणन मंत्री जयकुमार रावल

बोरीवली येथे तीन दिवसीय मिलेट महोत्सवाचे उद्घाटन मुंबई: राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक असण्याबरोबरच आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या मिलेट्सना शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने मिलेट्स महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने मिलेट्स महोत्सव राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगत […]

अधिक वाचा..

एका दिवसात ५ धक्कादायक घटना; नागपूरच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

नागपूर: महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात बुधवारी घडलेल्या सलग गुन्हेगारी घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. महिलांवरील अत्याचार, फसवणूक, अपघात आणि चोरीच्या घटनांनी शहराच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.  प्रमुख घटना एका नजरेत 1) शाळकरी मुलीचा पाठलाग, विनयभंग प्रकरण खापरखेडा परिसरात १३ वर्षीय मुलीचा पाठलाग करून गैरवर्तन करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. मुलीच्या […]

अधिक वाचा..

अंशकालीन स्त्री परिचरांना दिलासा; मानधनात दुप्पट वाढ, एप्रिलपासून ६ हजार रुपये

मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रांमध्ये कार्यरत अंशकालीन स्त्री परिचरांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. १ एप्रिल २०२६ पासून ही वाढ लागू होणार असून, यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. गाव पातळीवर, विशेषतः आदिवासी, दुर्गम व डोंगराळ भागात प्राथमिक आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यात अंशकालीन स्त्री परिचरांची भूमिका महत्त्वाची आहे. […]

अधिक वाचा..

उन्हाळी सुट्ट्यांवर जनगणनेचं सावट; शिक्षकांना सुट्टीऐवजी सरकारी कामाची जबाबदारी

मुंबई: राज्यात २ मे ते १४ जूनदरम्यान शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागण्याची शक्यता असताना, यंदा शिक्षकांना मात्र या सुट्ट्यांचा लाभ घेता येणार नाही. सरकारने आगामी जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात शिक्षकांना जनगणनेची कामे करावी लागणार असून, या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व अनुदानित व […]

अधिक वाचा..

महाडात समतेचा जलक्रांती संदेश; चवदार तळे शताब्दी वर्षाचा भव्य शुभारंभ.

मुंबई: महाड चवदार तळे सत्याग्रह च्या शताब्दी वर्षानिमित्त महाडमध्ये भव्य कार्यक्रमाने शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्यात समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देत विविध मान्यवरांनी प्रभावी भाषणे केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाडच्या चवदार तळ्याचे पाणी हे “समतेचे अमृत” असल्याचे सांगत, हे पाणी गावोगावी नेऊन तलाव, नद्या आणि धरणांमध्ये सोडून समतेचा संदेश […]

अधिक वाचा..