खरात प्रकरणावर सरकार झोपेत? सपकाळांचा घणाघात

साताऱ्यातील प्रकारावरून लोकशाहीवर प्रश्नचिन्ह मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली आहे. दिवाळीपासूनच खरातच्या गैरव्यवहारांची माहिती सरकारकडे होती, मग सहा महिने कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, या प्रकरणाची सखोल […]

अधिक वाचा..

विधान परिषद की आदेशशाहीचा दरबार? धक्काबुक्कीने उघड केला सत्तेचा उन्माद!

सातारा: साताऱ्याच्या राजकारणात काल जे घडलं, ते केवळ धक्काबुक्की नव्हतं—ते लोकशाहीच्या गालावर बसलेला झणझणीत चापट होता. मात्र खरी धक्कादायक गोष्ट आज विधान परिषदेत घडली. कारण इथे फक्त एका मंत्र्याचा संताप व्यक्त झाला नाही, तर थेट संविधानाच्या चौकटीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली, तसेच काही जिल्हा परिषद सदस्यांना मतदानापासून रोखण्यात […]

अधिक वाचा..

१५०० कोटींचा जैवठेवा खासगीकडे? हाफकिनच्या निर्णयावर वडेट्टीवारांचा आक्षेप

मुंबई: हाफकिन संस्था कडे असलेला DPT लस तयार करण्यासाठीचा स्टेन हा अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक जैव-संपत्तीचा ठेवा असल्याचा मुद्दा उपस्थित करत विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आक्षेप नोंदवला. रिलायन्स लाईफ सायन्सेस या खाजगी कंपनीने प्रस्ताव दिल्यानंतर, कोणतीही सखोल विचारणा न करता हाफकिनने थेट Expression of Interest (EOI) मागवण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे त्यांनी नमूद केले.हाफकिनसारखी सक्षम संस्था […]

अधिक वाचा..

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मध्ये ६ अल्पवयीन मुलींचे अपहरण सरकारने विशेष शोध मोहीम राबवावी; विजय वडेट्टीवार

मुंबई: राज्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून, अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे.दुसरीकडे, मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना सरकार केवळ भोंदू बाबांच्या मागे लागल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडत असताना वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीसह राज्यातील सुरक्षिततेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. ब्रह्मपुरी शहरात गेल्या काही दिवसांत […]

अधिक वाचा..

एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे भव्य लोकार्पण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेला आधुनिकतेची सुवर्ण किनार लाभली, तो क्षण आज विधानभवन प्रांगणात साकारला. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या लयबद्ध तालावर आणि उत्साहाच्या उधाणलेल्या लाटांमध्ये ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचे भव्य लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. जणू इतिहास आणि वर्तमानाचा संगम घडवत, या सोहळ्याने सार्वजनिक परिवहनाच्या नव्या युगाची पहाट उजळवली. या दिमाखदार […]

अधिक वाचा..
rajendra-jasud-ashok-kharat

नाशिकच्या भोंदूबाबासाठी शिरूरच्या नेत्याने खर्च केले करोडो रुपये; महागडी गाडी, परदेश दौरा अन् बरंच काही…

शिरूर (तेजस फडके): राज्यात सध्या नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणाची चर्चा आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. दिनेश परब याने 22 डिसेंबर 2025 आणि 28 डिसेंबर 2025 रोजी अशोक खरात […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार दत्ताजी मेघे यांच्या निधनामुळे विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत दत्ताजी मेघे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “दत्ताजी मेघे यांनी विदर्भाच्या विकासासाठी, विशेषतः शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांनी उभ्या केलेल्या शैक्षणिक […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा दमदार विजय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिनंदन

पुणे: वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी आपल्या जिद्द, ताकद आणि उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावत कुस्तीप्रेमींची मने जिंकली. या उल्लेखनीय यशाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. स्पर्धेतील उपविजेता महेंद्र गायकवाड यांनीही तितक्याच दमदार कामगिरीतून प्रेक्षकांची दाद मिळवली. अंतिम लढत अत्यंत […]

अधिक वाचा..

परिवर्तनवादी विचारांची दीपज्योत विझली; सामाजिक उपक्रमांतून ‘तेरवी’ला दिला मानवतावादी अर्थ

तिवसा: तिवसा तालुक्यातील संवेदनशील, अभ्यासू आणि परिवर्तनवादी व्यक्तिमत्त्व असलेल्या निर्वाणस्थ लीलादेवी माणिकराव माहोरे (वय ६२) यांचे मुंबई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने माहोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी जपलेले विचार आणि संस्कार समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. त्या “दरारा” साप्ताहिकाचे संपादक प्रवीण उर्फ राज माहोरे यांच्या मातोश्री होत, तसेच ज्येष्ठ पत्रकार […]

अधिक वाचा..

सेक्स रॅकेट प्रकरणाने महाराष्ट्र हादरला; अशोक खरात अटकेत, SIT मार्फत सखोल चौकशी सुरू

छत्रपती संभाजीनगर: राज्यात खळबळ उडवणाऱ्या कथित सेक्स रॅकेट आणि लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला २४ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ३५ वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात […]

अधिक वाचा..