निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा

मतदार यादींची छाननी करुन बांग्लादेशी नागरिकांना वगळण्याची मागणी नवी दिल्ली: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडणे आणि मतदार यादीची छाननी करुन त्यातून बांग्लादेशी नागरिकांना वगळण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेना नेते उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे […]

अधिक वाचा..

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर दंडाचा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडप उभारणीसाठी रस्त्यावर खड्डे घेतल्यास प्रति खड्डा ₹१५,०००/- दंड आकारण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ अन्यायकारक नव्हे, तर मुंबईतील लाखो गणेशभक्तांच्या श्रद्धेवर आघात करणारा आहे. मागील वर्षी हीच रक्कम ₹२,०००/- इतकी होती, ती सातपट वाढवून अचानक ₹१५,०००/- करणे म्हणजे गणेशोत्सवावर अडथळे निर्माण करणे होय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार […]

अधिक वाचा..

ड्युटीवर असताना डॉक्टर झोपला, उपचाराअभावी अपघातग्रस्ताचा मृत्यू…

मेरठ: एका ३० वर्षीय व्यक्तीचा अपघात झाला, अपघातानंतर लगेचच त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर व्यक्तीला आपत्कालीन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा जीव गेल्याचे म्हटले जात आहे. ही घटना मेरठमध्ये घडली आहे. मेरठच्या लाला लजपत […]

अधिक वाचा..

मंत्री योगेश कदमांच्या कारनाम्याची फाईल मुख्यमंत्र्यांना दिली; परब म्हणाले राजीनामा होईल.

मुंबई: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावाने चालणाऱ्या बारवर एकदा नाही तर तीन वेळा पोलिसांनी छापेमारी करुन कारवाई केली आहे. या कारवाईसंबंधीचे सर्व पुरावे आणि खेड येथील वाळू उपसा प्रकरणाचे पुरावे आज मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. गृहराज्य मंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी अॅड. अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे. शिवसेना ठाकरे […]

अधिक वाचा..

राष्ट्रीयकृत बँकांचे खाजगीकरण करण्याचा मोदी सरकारचा डाव हाणून पाडण्याची गरज; विश्वास उटगी

राष्ट्रीयकृत बँका वाचवण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार, १ ऑगस्ट रोजी टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक मुंबई: इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण करून सर्वसामान्य जनतेला बँकांचे दरवाजे खुले केले. या ऐतिहासिक घटनेला काल ५६ वर्ष झाली. पण आता मात्र केंद्रातील भाजपा सरकारची धोरणे राष्ट्रीयकृत बँकांच्या हिताची नाहीत. राष्ट्रीयकृत बँका भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. बँकिंग क्षेत्रातील […]

अधिक वाचा..

सन २०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर

दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी होणार पुरस्कार वितरण मुंबई: राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना दिला जाणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी पाटकर सभागृह, एसएनडीटी महिला विद्यापीठ,मुंबई […]

अधिक वाचा..

राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घ्यावी

ठाणे जिल्हा रुग्णालय एमएमआर मधील नागरिकांसाठी वरदान ठरणार मुंबई: ठाणे जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर दाखल झाले पाहिजे यादृष्टीने कामाला गती द्यावी. हे रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असून अद्ययावत यंत्रसामुग्री घेतानाच १०७८ नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील सुरू करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील सर्वच शाळांना ऑगस्ट महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या व त्याची कारण काय

मुंबई: ऑगस्ट महिना सुरू होण्याआधीच राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुढील ऑगस्ट महिन्यात अनेक दिवस सुट्ट्या राहणार आहेत. खरंतर महाराष्ट्रात श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. श्रावण हा महिना अध्यात्मिक साधनेचा काळ असतो. हा असा महिना आहे ज्या महिन्यात सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होते. या महिन्यात […]

अधिक वाचा..

पिंपरी-चिंचवडमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयासह वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई: पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाने आज मान्यता दिली आहे. पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरणाऱ्या या निर्णयाला आज मूर्त स्वरूप मिळाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. उद्योग नगरी म्हणून […]

अधिक वाचा..

सैनिकांच्या शौर्यासाठी टाळ्या वाजवण्यास नकार..? राहुल गांधींवर ‘देशद्रोही’ असल्याचा आरोप करत तीव्र टीका 

मुंबई: लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर सोमवारी (28 जुलै) चर्चेला सुरुवात झाली. चर्चेला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार घमासान पाहायला मिळाले. याचदरम्यान, संसदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल प्रशंसा करताना सर्व खासदारांना टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले, तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत आणि हात बाकावर ठेवून बसले. […]

अधिक वाचा..