राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय; संगणक केंद्रे व प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

मुंबई: ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक ते मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष […]

अधिक वाचा..

कृषीमंत्र्यांच्या ‘पत्ते’ प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापल

पुणे: राज्याच्या राजकारणात सध्या कृषीमंत्र्यांच्या सभागृहातील ‘पत्ते’ खेळण्याच्या प्रकरणावरून जोरदार वादंग सुरू आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री सभागृहात महत्त्वाच्या चर्चेदरम्यान पत्ते खेळत असल्याचा आरोप झाल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी तर या प्रकरणावरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला आहे.

अधिक वाचा..

तो मेसेज वाचला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली…

सरकारने जलजीवन मिशन योजनांच्या कामांचे पैसे न दिल्याने निराश होऊन सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी गावातील 35 वर्षीय कंत्राटदार हर्षल पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. हर्षल पाटील यांची सरकारकडे 1 कोटी 40 लाखांची बिले थकीत होती. सावकार व इतर लोकांकडून त्यांनी जवळपास 65 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यांनी पैशासाठी तगादा लावल्याने पाटील हैराण झाले होते. […]

अधिक वाचा..

महायुतीत निधीवरून नवा वाद

पुणे: राज्यात महायुती सरकारमधील अंतर्गत कुरघोडी आणि सत्तेतील भागीदारांमधील नाराजीच्या बातम्या सातत्याने समोर येत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास खात्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता नगरविकास खात्यातील मोठ्या रकमेच्या निधीवाटपासाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी बंधनकारक असणार आहे. यामुळे फडणवीस यांनी शिंदे यांच्या निवडक पद्धतीने आणि भरभरून निधी खर्च […]

अधिक वाचा..

मोदींचा सर्वात विश्वासू मंत्री होणार उपराष्ट्रपती, त्यांच्याच कार्यालयातून फिरली होती धनखड यांच्या राजीनाम्याची सूत्र

नवी दिल्ली: धनखड यांनी दोनच दिवसापूर्वी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता उपराष्ट्रपती पदाची संधी कोणाला दिली जाणार? याची उत्सुकता लागली आहे. येत्या काळात लवकरच उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेतली जाणार असल्याने भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे. त्यामुळेच भाजपकडून यासाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव केली जात आहे. उपराष्ट्रपती पदासाठी पीएम मोदींचे सर्वात विश्वासू केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ […]

अधिक वाचा..

कोकाटेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नाबद्दल रोहित पवार अजितदादांना करणार ही विनंती

मुंबई: विधीमंडळाच्या सभागृहात ऑनलाइन रमी खेळताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे ते पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ समोर आणल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याीची मागणी केली होती. मात्र माणिकराव कोकाटे यांनी आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याची भाषा केली आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले […]

अधिक वाचा..

त्या वीस दिवसांची चिमुकलीला दूध पाजतानाच आईन सोडले प्राण

कोल्हापूर: वीस दिवसांची चिमुकली पीयुषाला दूध पाजतानाच आई रचना स्वप्नील चौगले (वय २७, रा. संभाजीनगर स्टँडजवळ, कोल्हापूर) बेशुद्ध झाल्या. हा प्रकार लक्षात येताच नातेवाइकांनी त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांना मृत्यूने गाठले. बुधवारी (दि. २३) पहाटे ही घटना घडली. रचना यांच्या दोन मुली आईच्या मायेला पोरक्या झाल्या. अचानक घडलेल्या घटनेने चौगले कुटुंबीयांना धक्का […]

अधिक वाचा..

पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन गरोदर पत्नीला पतीने केलेल्या मारहाणीमुळे महिलेचा गर्भपात

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या एरंडवणे भागात एका व्यक्तीने त्याच्या गर्भवती पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा गर्भपात झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पत्नीच्या तिच्या पतीच्या विरोधात अलंकार पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवी (वय ३५ वर्षे, राहणार एरंडवणे) याची पत्नी सात महिन्यांची गर्भवती […]

अधिक वाचा..

अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर ईडीची छापेमारी

मुंबई: देशातील प्रमुख उद्योगपतींपैकी एक असलेल्या अनिल अंबानी यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. प्रवर्तन निदेशालय (ED) ने आज, गुरुवार, २४ जुलै रोजी मुंबईत अंबानींच्या कंपन्यांशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापेमारी केली. काही दिवसांपूर्वीच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCom) आणि त्याचे प्रवर्तक अनिल अंबानी यांना ‘फसवणूक’ करणारे (फ्रॉड) म्हणून घोषित केले होते. याच […]

अधिक वाचा..

अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरकडून नाशिक शहराच्या दिशेने मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास परतीचा प्रवास करताना कारवरील ताबा सुटल्याने कार (एमएच १२ एलजे १४१६) अंजनेरीजवळच्या बेझे फाट्यावर त्र्यंबकरोडवरील दुभाजकावर जाऊन आदळली. पंकज दिलीप दातीर (वय ३०), अभिषेक ज्ञानेश्वर घुले (वय २८, दोघे रा. अंबड) या दोघा मित्रांचा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेने अंबड गावात शोककळा पसरली आहे. […]

अधिक वाचा..