बेरोजगारीच्या प्रश्नावर २५ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा.

मुंबई: राज्य सरकारच्या विविध विभागात तब्बल २.५ लाख रिक्त पदे असूनही नोकर भरती केली जात नाही. लाखो तरुणांच्या भविष्याशी सरकार खेळ खेळत आहे. रिक्त जागा असतानाही सरकार मात्र कंत्राटीपद्धतीने भरती करत आहे. काँग्रेस पक्ष या बेरोजगारी विरोधात आवाज उठवत असून छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी २५ ऑगस्ट रोजी “रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. […]

अधिक वाचा..

‘एक वही, एक पेन’ उपक्रमास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा उत्साहवर्धक प्रतिसाद

गणेशोत्सवात समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे सहकार्य मुंबई: समाजातील गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी सुरू असलेल्या ‘एक वही, एक पेन’ या उपक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोलाचा हातभार लावला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने हारफुलांसह शैक्षणिक साहित्य श्री गणेशचरणी अर्पण करून वंचित विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संदेश या अभियानातून दिला […]

अधिक वाचा..

मी सोबत नांगराचा फाळ आणला आहे, माझ्या नादाला लागला तर…

सांगोला: सांगोला येथे जर्सी आणि पोस्टन भाकड गाई कत्तलखान्याला पाठवण्यास विरोध करणाऱ्या गोरक्षकांच्या विरोधात रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. ते बोलताना म्हणाले, माझ्या नादाला लागून आजवर अनेक जण भेंडाळले आता तुम्ही आलात काय? अस बोलत महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांना थेट […]

अधिक वाचा..

दोन मैत्रिणींच एकाच बाॅयफ्रेंडवरून वाद झाल्याने महिला होमगार्डचा गळा दाबून नाल्यात फेकल अन्…

बीड: गेल्या काही महिन्यांमध्ये बीड जिल्हा गुन्हेगारीच्या मोठ्या घटनांमुळे चर्चेत आला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच आणखी दोन खुनांच्या घटनाने जिल्हा हादरला आहे. बीडमध्ये एका प्रेम प्रकरणातून होमगार्ड महिलेला संपवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तर परळी तालुक्यातील जळगव्हाण येथे कौटुंबिक वादातून […]

अधिक वाचा..

माझ्या नवऱ्याचा नाद सोड, नाहीतर…

पुणे: पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या अनैतिक संबंधाला वैतागून एका महिलेने असं काही केलंय की शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने पतीच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागली होती. पतीच्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तिने आपली आई आणि भावाच्या मदतीने पतीच्या प्रेयसीचे अपहरण केले. […]

अधिक वाचा..

ओबीसीमध्ये आणखी ‘या’ २९ जातींचा होणार समावेश राज्य सरकार पाठविणार केंद्राकडे प्रस्ताव

संभाजीनगर: राज्यातील इतर मागासवर्ग (OBC) यादी आणखी विस्तारित होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने नुकताच मोठा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. या प्रस्तावात २९ जाती व उपजाती नव्याने समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पुढची प्रक्रिया कशी राज्य सरकारची मंजुरी त्यानंतर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल केंद्राची अंतिम मोहोर उमटल्यानंतर नव्या जातींना आरक्षणाचा लाभ मिळणार […]

अधिक वाचा..

शेतकरी बांधवांनो, आत्महत्या करू नका; शेतकरी मेल्याचे सरकारला सोयर सुतक नाही

शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर सही करण्यास देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का मुंबई: राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत आहेत परंतु भाजपा युती सरकारला त्याचे काहीच सोयर सुतक नाही. राज्यातले सरकार फक्त गेंड्याच्या कातडीसारखे निगरगट्टच नाही तर नाही तर आंधळे, मुके व बहिरे आहे. या सरकारला भ्रष्टाचारापुढे शेतकऱ्यांचे दुःख दिसत […]

अधिक वाचा..

सरकारमध्ये ताळमेळ नसल्याने मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यातून, खड्डे कोण बुजवणार यावरून गोंधळात गोंधळ

मुंबईतील टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी निर्णयाची टोलवाटोलवी मुंबई: मुंबईतील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमधून मुंबईकरांना होणारा त्रास हा महायुती सरकारच्या धोरण लकव्यातून होत असून निवडणुकीपूर्वी मतदानाचा रतीब मिळवण्यासाठी घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारच्या नाकीनऊ आले आहे हे दिसत येत आहे. कोणतेही आर्थिक नियोजन न करता अविचाराने निवडणुकीपूर्वी लोकांना भुलवण्यासाठी घेतलेले निर्णय आता सरकारला पूर्ण करता येत […]

अधिक वाचा..

जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालका सोबत सहाय्यकची (क्लिनर) गरज नाही

मोटार वाहन कायदा, 1988 अन्वये मसुदा अधिसूचना जारी मुंबई: जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालका सोबत सहाय्यकची (क्लिनर ) गरज लागणार नाही, या बाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर 29 ऑगस्टपर्यंत सर्वसामान्यांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत.अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यातील जड मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनधारक संघटनांनी केलेल्या […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीची तिसरी बैठक पार

नवाब मलिकांनी घेतला संघटनेचा आढावा.. मुंबई: मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली आज उत्तर मुंबईची मालाड येथे बैठक पार पडली. मुंबई महानगरपालिका निवडणूकीची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर सोपवल्यावर आज तिसरी […]

अधिक वाचा..