कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील यांचा आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…

राज्यातील लाडक्या बहिणींनी आपली चांगली जबाबदारी पार पाडली; त्यांनी दिलेली जबाबदारी आम्ही कधीच विसरु शकत नाही;  अजित पवार मुंबई: आम्ही आणलेल्या लाडकी बहीण योजनेत राज्यातील लाडक्या बहिणींनी आपली चांगली जबाबदारी पार पाडली आणि आम्हाला सत्तेत बसवले आहे त्यामुळे त्यांनी दिलेली जबाबदारी आम्ही कधीच विसरु शकत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा […]

अधिक वाचा..

कुंडेश्वर अपघात: उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून पीडित कुटुंबांना एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार तत्काळ आर्थिक मदत

पुणे: खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे ११ ऑगस्ट रोजी दर्शनासाठी नीघालेल्या भाविकांच्या वाहनाचा झालेल्या अपघातात १२ महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडुन ना.एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार तत्काळ पुढाकार घेत पीडित कुटुंबांना आर्थिक मदत दिली आहे. नीलमताई गोर्हे यांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

मुंबई, ठाण्यातील पावसाच्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतला आढावा, नदी काठच्या परिसरात यंत्रणा सज्ज

मुंबई: मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली. मुंबईतील मिठी नदीची आणि नदी काठच्या परिसराचा आढावा घेतला तसेच विक्रोळी पार्कसाईट येथील दरडप्रवण परिसराची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन […]

अधिक वाचा..

प्रोफेसर बनून 3 Idiots मध्ये ठसा उमटवणारे अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड

मुंबई: काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्यातून कोणी सावरलं नव्हतं तोवर आणखी एक दुख:द बातमी समोर आली आहे. मराठी अभिनेते अच्युत पोतदार यांचे सोमवारी निधन झाले आहे. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अच्युत पोतदार यांनी आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ चित्रपटात प्राध्यापकाची भूमिका साकारली होती. काही […]

अधिक वाचा..

अपघातग्रस्त गोविंदांना प्रताप सरनाईक यांचा दिलासा

मुंबई: दहिहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांच्या वर के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज के.ई.एम रुग्णालयात जाऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जखमी गोविंदाची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. त्यांच्याशी संवाद साधताना मंत्री सरनाईक म्हणाले की, दुदैवाने दहिहंडी उत्सवात जोखिम जास्त असल्याने अनेक गोविंदा जखमी होतात. गेली २९ वर्षापेक्षा अधिक काळ दहीहंडी उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या […]

अधिक वाचा..

ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन

कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी साधावा संपर्क ठाणे: ठाणे जिल्ह्याला आज (दि. 19) ऑगस्ट 2025 रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून प्राप्त झाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व विभागांमध्ये सतर्क ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील खाडी आणि नदी / नाला इ. पाण्याकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे. नागरिकांनी स्वतःची […]

अधिक वाचा..

उदय जाधव लिखित पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर हा कवितासंग्रह आजच्या काळाशी समर्पक 

मुंबई: दीप तारांगण क्रियेशन्स आयोजित कवी उदय जाधव लिखित आणि प्रभा प्रकाशन प्रकाशित “पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर” या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि चर्चा शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी, सायंकाळी ५ वाजता मृणालताई दालन, पहिला मजला, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, आरे रोड, अंबाबाई देवस्थान जवळ, गोरेगाव ( पश्चिम ), मुंबई – ४००१०४ या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न […]

अधिक वाचा..

मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट, नाकर्त्या व निष्क्रिय कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आसूड

मुंबई पावसाळा सुरू होताच दरवर्षी पाण्यात बुडते, रस्ते खड्ड्यांनी पोखरले जातात, वाहतूक ठप्प होते आणि नागरिकांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण होतो. यंदाही तेच वास्तव सायन-माटुंगा, वडाळा चार रस्ता, चेंबूर, दादर, भायखळा यांसारख्या ठिकाणी दिसून आले. आज या सर्व परिस्थितीची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस व आमदार रोहितदादा पवार, मुंबई अध्यक्षा राखी जाधव आणि युवक मुंबई […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपती पदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांचंच नाव का; यामागे भाजपची नेमकी रणनीती काय?

मुंबई: भाजपने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी जाहीर केलं आहे. माजी उपराष्ट्रपदी जगदीप धनकड यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन उपराष्ट्रपती कोण होणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. या पदासाठी बरेच नावही चर्चेत होते. मात्र, राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत भाजपने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. विशेष म्हणजे भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा […]

अधिक वाचा..

वाल्मिक कराडला जामीन मिळणार? अटकेच्या वेळी नेमकं काय घडलं होत

बीड: बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. राज्यात संतापाची लाट पाहायला मिळाली. दरम्यान या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव समोर आल्यानं त्याला अटक करण्यात आली आहे, सध्या तो जेलमध्ये आहे. दरम्यान या प्रकरणात आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे वाल्मिक […]

अधिक वाचा..