ज्या भाषेने यूपी, बिहारवाल्यांचं भलं केलं नाही त्या भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भांडत आहे 

मुंबई: आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मीरा भाईंदर येथे सभा पार पडली, या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदीच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडत आहे, इतर शाळात मराठी सक्तीची केली पाहिजे. ते सोडून हिंदी सक्तीची करत आहात, असं […]

अधिक वाचा..

शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार पण…

मुंबई: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन समाप्तीनंतरच्या पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते ते पूर्ण करणारच.पण कर्जमाफी हा तात्कालीक उपाय आहे. कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी कर्जमाफी देऊ शकत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांसाठी कधीही हात आखडता घेतलेला नाही. शेतकऱ्यांचे जीवन सुखाचे व्हावे त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या […]

अधिक वाचा..

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; आता महाराष्ट्रातील ‘या’ शहराचे नाव बदलणार

मुंबई: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका शहराचे नाव चेंज होणार आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे अशा आशयाच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला केंद्रातील सरकारकडून मंजुरी मिळाली होती. दरम्यान आज पावसाळी अधिवेशनात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील आणखी एका मोठ्या […]

अधिक वाचा..

नाशिकच्या ‘हनीट्रॅप’ प्रकरणातला ‘तो’ हॉटेलचालक कोण?

नाशिक: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी नाशिकच्या हनीट्रॅप प्रकरणावर सभागृहाला माहिती दिली. शिवाय कुठल्याही आजी-माजी मंत्र्याची तशी तक्रार नसल्याचं ते म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी सभागृहात पेन डाईव्ह बॉम्ब फोडला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना थेट इशारा, ‘ही’ चूक केली तर निलंबन नाही तर थेट बडतर्फ

मुंबई: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विविध मुद्द्यांवर सविस्तर निवेदन मांडत आहेत. ते विरोधकांच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत. तसेच ते विविध प्रश्नांवर भूमिका मांडत आहेत. राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांवरही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माहिती दिली. राज्यातील गुन्हेगारी ही गेल्या वर्षाच्या तुलनेत साडेसहा टक्क्यांनी घटल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

अधिक वाचा..

14 वर्षीय मुलीवर बापानेच केला बलात्कार आणि…

मध्य प्रदेश: माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील मझौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. येथे एका नराधम पित्याने आपल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. यामुळे ती गर्भवती झाली होती. पीडितेच्या पोटदुखीच्या तक्रारीनंतर वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या गर्भवती असल्याचं उघड झालं. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून […]

अधिक वाचा..

एकतर्फी प्रेमातून लग्नाच्या आमिषाने वारंवार अत्याचार

नवी दिल्ली: एकतर्फी प्रेमातून सुरु झालेला संबंध, नंतर लग्नाचे आमिष, त्याचाच आधार घेऊन वारंवार बलात्कार, जबरदस्तीचा गर्भपात आणि धमक्यांचं भयाण चक्र – उलवेतील एका महिलेच्या आयुष्याला गालबोट लावणाऱ्या या थरारक गुन्ह्याचा उलगडा आता समोर आला आहे. उलवे पोलिसांनी याप्रकरणी मोहित विरेंद्र सिंग (वय ३०) या आरोपीला अटक केली असून, दुसरा आरोपी आकाश यादव फरार आहे. […]

अधिक वाचा..

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय

मुंबई: सरकारी कामात अडथळा आणल्यामुळं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. देशमुख यांना विधानभवना बाहेर घेऊन जात असतानाच आव्हाड आक्रमक झाले. त्यांनी […]

अधिक वाचा..

बोरीवली तहसिल मधील आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करा

एका दाखल्यासाठी विद्यार्थ्यांना मोजावे लागतात ३ ते ४ हजार रुपये आमदार अस्लम शेख यांचा आरोप मुंबई: बोरीवली तहसिल कार्यालयातील आपले सरकार केंद्र दिड महिना बंद राहणार आहे, अशी माहिती आपल्याला मिळाली असून हे केंद्र जर एवढ्या कालावधीसाठी बंद राहिलं तर गोरगरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठे असा सवाल विचारत हे आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करावे, […]

अधिक वाचा..

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना

मुंबई: नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत केली. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी या प्रकरणात गंभीर स्वरूपाचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू झाली […]

अधिक वाचा..