काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेश पदाधिका-यांची ११ व १२ ऑगस्ट रोजी दोन दिवसांची निवासी कार्यशाळा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंच्या ऑनलाईन संबोधनाने कार्यशाळेचे उद्घाटन, प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करणार मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नवनियुक्त कार्यकारिणीची दोन दिवसांची निवासी कार्यशाळा पुण्याच्या खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे आयोजित केली आहे. दिनांक ११ व १२ ऑगस्ट रोजी ही कार्यशाळा असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे या […]

अधिक वाचा..

उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश

मुंबई: उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने घवघवीत यश मिळवित 14 जागांवर विजय मिळविला आहे. उत्तराखंड राज्यातील गाढवाल ; कुमाव या जिल्ह्यातील ग्रामपंचायत ; जिल्हा परिषद ; नगरपरिषद निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने 14 जागांवर विजय मिळविला आहे. गढवाल भागात रिपब्लिकन पक्षाचे 4 ग्राम प्रधान निवडून आले आहेत. कुमाव क्षेत्र येथे 1 ग्राम पंचायत आणि […]

अधिक वाचा..

राहुल गांधींच्या प्रश्नांना भाजपकडून उत्तर, शरद पवार यांचा टोला काय? म्हणाले…

मुंबई: कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप करत टीका केली. निवडणूक आयोगाने विरोधकांना, काँग्रेसला कधीच डिजिटल डेटा दिला नाही. एकाच व्यक्तीचं कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मतदान केल्याचा गंभीर आरोप केला होता. मतचोरीच्या मुद्यावरून त्यांनी रान उठवत भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. त्यांच्या या […]

अधिक वाचा..

देशात इंग्रज राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही व संविधान गिळंकृत करु पाहणाऱ्या प्रवृत्तींनो ‘चले जाव’

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेस पक्ष व सामाजिक संघटनांची पदयात्रा व हुतात्म्यांना आदरांजली मुंबई: आजच्या दिवशी १९४२ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘करो या मरो’चा मंत्र देत जुलुमी इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. आज देशात तीच परिस्थिती आहे, हुकूमशाही प्रवृत्ती फोफावली असून ती लोकशाही व संविधान गिळंकृत करु पहात आहे. आज या प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवण्याची […]

अधिक वाचा..

जमीन विकण्यास विरोध केल्याने आईचा खून करून मुलानेही संपवले जीवन

लातूर: जमीन विकून मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी विरोध करणाऱ्या वयोवृद्ध आईची ६ जुलै रोजी हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून स्वतःच्या शेतातील उसाच्या फडात पुरला. त्यानंतर मुलानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.७) रेणापूर पिंपळफाटा येथे घडली होती. या प्रकरणी रेणापूर पोलिसांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मयताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्या अनुषंगाने रेणापूर पोलिस […]

अधिक वाचा..

पुण्यात जादूटोण्यासाठी विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ

पुणे: सासरच्या लोकांनी अघोरी प्रथा पाळून एका २२ वर्षीय विवाहितेवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री विवाहितेस नग्न होऊन झोपण्यास भाग पाडणे, मुलावर संशय घेऊन अघोरी चाचणी घेण्यास भाग पाडणे यांसारखे प्रकार तिच्यासोबत घडल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध […]

अधिक वाचा..

अजित पवार म्हणाले कुठून उठलो अन् मी पुण्याचा पालकमंत्री झालो

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. पण दोन्ही जिल्ह्यामध्ये काम आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे अजितदादांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये बोलताना अजित पवार वैतागले होते. त्यानंतर आता पुणेकरांच्या थेट प्रश्नामुळे अजित पवार यांनी तर ‘कुठून उठलो आणि पुण्याचा पालकमंत्री झालो’, असे वैतागून बोलून धन्यवाद मानले. पिंपरी […]

अधिक वाचा..

मनसेच्या राड्याचा सुरक्षारक्षकांना फटका; पाच जणांची बदली

पुणे: महापालिका आयुक्तांच्या बैठकीदरम्यान मनसे पदाधिकार्‍यांनी केलेल्या राड्याचे पडसाद सुरक्षारक्षकांवर उमटले आहेत. आयुक्त कार्यालयाच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींचा ठपका ठेवत महापालिकेच्या दोन कायमस्वरूपी आणि तीन कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश महापालिका उपायुक्त संदीप खलाटे यांनी जारी केले. स्वच्छतेच्या विषयावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम अधिकार्‍यांसमवेत बैठक घेत असताना मनसेचे पदाधिकारी माजी नगरसेवक अ‍ॅड. […]

अधिक वाचा..

माझ हरवलेल पोरग 8 वर्षांनी सापडल, बघताच आईने मिठीत घेतल अन्…

बीड: काही क्षण हे शब्दात मांडण्याच्या पलीकडचे असतात. अश्रूंमध्ये साठवलेल्या आठवणी, हृदयात दडलेली आस आणि काळजाच्या एका कोपऱ्यात जपलेली शेवटची आशा. हे सगळं आज एका क्षणात खरं ठरलं आहे, जेव्हा 2017 पासून हरवलेला मुलगा तब्बल आठ वर्षांनंतर आपल्या आई-वडिलांच्या मिठीत परत आला. हे शक्य झालं बीड पोलिसांच्या सततच्या प्रयत्नातून आणि त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर.. […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंचा ‘तो’ नेता भाजपाच्या दरबारात

मुंबई: ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपनं जनता दरबारचं आयोजन केलं होतं.. मुंबई महापालिकेतील जी उत्तर विभागात उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. आमदारांची पालकमंत्र्यांच्या जनतादरबारातील हजेरी चर्चचा विषय ठरला. लोकप्रतिनिधींनी आयोजित केलेले जनता दरबार म्हटलं की त्यामध्ये जनतेची गा-हाणी आलीच. मात्र मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागासाठी उपनगर पालकमंत्री आशिष शेलारांनी जनता दरबार […]

अधिक वाचा..