उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा संपन्न

वडाळा येथील मंदिराचा विकास आणि सुशोभीकरण कामाला लवकरच होणार सुरुवात मुंबई: वडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचा विकास, सुशोभीकरण आणि सोयी सुविधांचा कामासाठी 25 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार लवकरच या प्राचीन मंदिरातील अंतर्गत विकास आणि परिसराच्या सुशोभीकरण कामाला सुरुवात करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आज आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर […]

अधिक वाचा..

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ; विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मोठा दिलासा

संभाजीनगर: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता जातपडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यांसारख्या सर्व शासकीय प्रतिज्ञापत्रांसाठी ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. घोषणा कोणी केली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ४ जुलै रोजी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. आता फक्त साधा कागद पुरेसा यापुढे ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही. फक्त […]

अधिक वाचा..

बालनिकेतन प्राथमिक विभागातील, चिमुकल्यांची आषाढी वारी आणि रिंगण…

बालनिकेतन विद्यालयात, अवतरली पंढरी  कांदिवली: पारंपरिक वेषात नटलेले नटलेल्या वारकऱ्यांनी हातात, वीणा, टाळ आणि पालखी खांद्यावर घेऊन सावळ्या विठू रायाच्या नामाचा गजर करत दिंडी काढली. यां दिंडीत प्रमुख पाहुणे नाट्य अभिनेते प्रदीप कबरे, माई च्या अध्यक्ष शीतल करदेकर सहभागी झाले .शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री माने यांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे नियोजन आणि पालकांची मेहनत यां निघालेल्या दिंडीतून प्रकर्षाने […]

अधिक वाचा..

१० जुलै ला पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर; शीतल करदेकर

मुंबई: पत्रकार हे समाजाचे चतुर्थ स्तंभ मानले जातात. दिवसरात्र मेहनत करून समाजासाठी माहितीचे दालन खुले ठेवणाऱ्या या योद्ध्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी आहे, याच भावनेतून अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन व रोटरी क्लब नॉर्थ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने एक विधायक पाऊल उचलण्यात आले आहे. गुरुवार, १० जुलै २०२५, रोजी मुंबई मराठी पत्रकार […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन एकजुटीने पुढे जाण्याची ताकद आम्हाला दे

मुंबई: “आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची सशक्त चळवळ आहे. गेली अनेक शतकं पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकरी संप्रदायानं महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाला दिशा देण्याचं, समृद्ध करण्याचं काम केलं. आजही लाखो वारकरी ‘हरिनामा’च्या गजरात पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने पंढरीच्या दिशेनं चालताना आपल्या कृतीतून […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवर्षी मिळणार ४३,००० रुपये, जाणून घ्या सरकारच्या जबरदस्त योजनेबद्दल

संभाजीनगर: गावाकडून तालुक्याच्या किंवा शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना *स्वाधार योजनेचा* मोठा फायदा होणार आहे! योजनेची वैशिष्ट्ये दरवर्षी ४३,००० रुपये- शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्यांना ३८,००० रुपये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी- जादा ५,००० रुपये बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी- २,००० रुपये शैक्षणिक साहित्य या योजनेचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना राहणे व जेवण यासाठी आर्थिक मदत करणे, जेणेकरून त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ […]

अधिक वाचा..

माजी मंत्री अशोकराव पाटील डोणगावकरांच्या निधनाने समर्पित लोकसेवक हरपला

मुंबई: काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री अशोकराव पाटील डोणगावकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस विचारांचे एक समर्पित नेतृत्व व लोकसेवक हरपला आहे अशा शोकभावना महराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. अशोक पाटील डोणगावकर यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, […]

अधिक वाचा..

महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मुंबई बँकेचा पुढाकार

मुंबई: महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे केवळ धोरणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीतून सिद्ध व्हावे, या उद्देशाने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या पुढाकाराने एक विशेष बैठक ४ जुलै, २०२५ रोजी पार पडली. बँकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या या बैठकीत महिला बचत गट व व्यावसायीकांना कर्जसुविधा आणि बाजारपेठ निर्मितीशी निगडित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी […]

अधिक वाचा..

देशाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कमिटी का बसवता? याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करा मुंबई: राज्यात शेतकऱ्यांच्या, तरुणाईच्या, बेरोजगारांच्या, कामगारांच्या आत्महत्या होत आहेत. निरपराध नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची व्यथा भयावह आहे. आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आज बळीराजाची आहे. राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली त्यावर भाजपच्या नेते कर्नाटक आणि बाकीच्या राज्यात बघा, महाराष्ट्र चांगला आहे,” […]

अधिक वाचा..