अकरावी प्रवेश प्रक्रियेमधील गोंधळाबाबत शिक्षणमंत्र्यांना ॲड. अमोल मातेले यांचे निवेदन

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी, प्रशासनाची ढिसाळ तयारी आणि परिणामी विद्यार्थ्यांना व पालकांना भेडसावणाऱ्या मानसिक त्रासाबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना सविस्तर निवेदन ईमेलद्वारे पाठवले आहे. ७ जून २०२५ पासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू […]

अधिक वाचा..

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण

मुंबई: मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोरबा रोड ते मुंबई-गोवा हायवे रस्ता, साईनगर कालवा ब्रिज ते उत्तेखोल कालवा गावापर्यंतचा रस्ता आणि निजामपूर रोड कालवा ते भादाव रस्ता हे माणगाव नगरपंचायत हद्दीतील तीन रस्ते आणि मुंबई – गोवा महामार्गावरील इंदापूर […]

अधिक वाचा..

अजिंक्यतारा किल्ल्यातील राजसदर, बुरुज, तटबंदींची दुरुस्ती होणार

मुंबई: मराठा साम्राज्याची राजधानी, ऐतिहासिक शहर साताऱ्यातील संगम माहूलीच्या शिवकालीन राजघाट परिसरातील काशीविश्वेश्वर, संगमेश्वर, रामेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार, महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई, पहिले शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे संवर्धन, झुलत्या भग्न पदपुलाच्या नवनिर्माणासह घाटपरिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना, स्वराज्यनिर्मितीसह […]

अधिक वाचा..

विधानसभेतील ‘मतचोरी’ विरोधात आज काँग्रेसचे राज्यभर मशाल मोर्चे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गडचिरोलीतील आंदोलनात सहभागी होणार मुंबई: विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून राज्यात भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांवर दरोडा टाकलेला असून या मतचोरीची चौकशी केली जात नाही. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली असून लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात आहे. म्हणून प्रदेश काँग्रेस उद्या गुरुवार दिनांक १२ जून रोजी […]

अधिक वाचा..

सात जन्म ही पत्नी नको म्हणत घातले साकड…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये वटसावित्री पौर्णिमेपूर्वी पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली. पिंपळाला ७ फेरे मारून कायद्याचा दुरुपयोग करून पतीच्या कुटुंबाला वेठीस धरणारी, आयुष्य उध्वस्त करणारी पत्नी यापुढे नको अशी प्रार्थना केली.तसेच पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एकतर्फी व्यवस्थेविरोधात साकडे घालण्यात आले. या वेदनेमागे काय होत. चला जाणून घेऊया मुख्य आरोप आणि वेदना कायद्याचा गैरवापर: पुरुषांनी सांगितलं की महिला […]

अधिक वाचा..

दारू महाग, नोकरभरती जाहीर! मंत्रिमंडळ बैठकीत मद्यप्रेमींना झटका, तर तरुणांना आणि विद्यार्थ्यांना खुशखबर

संभाजीनगर: झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकीकडे मद्यावरील शुल्कात वाढ करून मद्यप्रेमींना धक्का दिला आहे, तर दुसरीकडे मोठी पदभरती आणि विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करून दिलासाही दिला आहे. मद्यप्रेमींची चिंता वाढली  झालेल्या बैठकीत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर (IMFL) तब्बल दीड टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत तब्बल १४ हजार कोटींचा महसूल वाढणार […]

अधिक वाचा..

वटपौर्णिमेच्या दिवशीच सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

बीड: वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विवाहित महिलेने आत्महत्या केल्यामुळे धक्कादायक घटना बीडमध्ये घडली. सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून या महिलेने टोकाचे पाऊल उचलले. विहिरीमध्ये या महिलेचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या गेवराई तालुक्यातील एरंडगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली. वर्षा ओमप्रकाश लाखे असं […]

अधिक वाचा..

विविध योजनांची माहिती व प्रचार -प्रसार करण्यासाठी पालखी मार्गावर परिवहन विभागाचा चित्ररथ

मुंबई: परिवहन विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी व त्यांचा जनमानसात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परिवहन विभागाचा चित्ररथ यंदा तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर दिंडी सोबत मार्गक्रमण करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री श्री. ‌प्रताप सरनाईक यांनी दिली. या संदर्भात नियोजन व मार्गदर्शन करण्यासाठी मंत्री सरनाईक हे स्वतः उद्या (११जुन रोजी) पंढरपूर पर्यंत या पालखी मार्गाचा दौरा करणार […]

अधिक वाचा..

उपनगरी रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि क्लेशदायक

मुंबई:“मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखीत झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास आहे. अपघातात जखमी प्रवाशांच्या […]

अधिक वाचा..

दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करा; शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

ठाणे: लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉ. शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यावेळी ते पत्रकारांशी […]

अधिक वाचा..