जम्मू काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रमाला रद्द

दहशतवादी हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात देशातील २७ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना शिवसेनेच्या युवा सेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून या प्रत्यार्थ परिवहन […]

अधिक वाचा..

जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अजित पवारांनी घेतला पुढाकार

प्रत्येक नागरीकाला सुखरुप घरी परत आणणे हीच प्राथमिकता;पर्यटकांना परत आणण्यासाठी अतिरिक्त विमानाची व्यवस्था – अजित पवार मुंबई: पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्यसरकार ॲक्शन मोडवर काम करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून […]

अधिक वाचा..

मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एकसष्ठी निमित्त प्रवास या जीवनचरित्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

ठाणे: परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांच्या एकसष्ठी निमित्त त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित ” प्रवास ” या कृतज्ञता दर्शक चरित्राचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होत असून प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार हे उपस्थितीत राहणार आहेत. अशी माहिती निमंत्रक व युवासेना […]

अधिक वाचा..

पहलगाम इथे भारतीयांवर झालेला दहशतवादी हल्ला हा भ्याड हल्ला आहे

देशामध्ये दोन समाजात वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा हा कट मुंबई: पहलगाम इथे झालेला दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप भारतीयांचा जीव गेला.हा भारतावर भ्याड हल्ला करण्यात आला आहे, याचा आम्ही निषेध करतो अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पहलगाम इथे सगळ्यात जास्त पर्यटक फिरायला जातात तिथे दहशतवाद्यांनी हल्ला केला, निष्पाप नागरिकांचा यात […]

अधिक वाचा..

पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मधील तीन पर्यटकांचा मृत्यू

मृतांच्या नातेवाईकांना मदतीसाठी जिल्हा प्रशासन तत्पर ठाणे: जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी,संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांच्या […]

अधिक वाचा..

विलेपार्लेतील दिगंबर जैन मंदिर पाडून भाजपा सरकारने जैन बांधवांच्या भावना पायदळी तुडवल्या

काँग्रेस नेत्यांनी महापालिकेने जमीनदोस्त केलेल्या विलेपार्लेतील जैन मंदिर परिसराला दिली भेट मुंबई: भाजपाच्या राज्यात मंदिर तोडले जात असताना सरकार मात्र मूग गिळून गप्प बसते ही लाजीरवाणे आहे. मंदिर पाडण्यास एकीकडे न्यायालय स्थगिती देत असताना दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी मंदिर पाडतात, हे शासनाचे अपयश आहे. जैन मंदिर पाडून भाजपा सरकारने जैन बांधवांच्या भावना पायदळी तुडवल्या आहेत, असा […]

अधिक वाचा..

पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य न करता ऐच्छिक ठेवणार

मुंबई: राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात राज्यातील विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेत कुठेही कमी पडू नयेत याचीही दक्षता घेतली जात आहे. सर्व शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक असून इंग्रजी भाषा शिकविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. आता नवीन धोरण राबविताना सुकाणू समितीने घेतलेल्या निर्णयानुसार पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा विषय अनिवार्य करण्यात […]

अधिक वाचा..

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुम्ही प्रवेश केलात मात्र माझ्याकडून कधी भेदभाव होणार नाही 

मुंबई: आपला महाराष्ट्र हा महापुरूषांचा आहे. त्यांच्या विचारांवरच आपल्याला चालायचे आहे असे सांगतानाच मला जे पटते ते काम मी करतो. मी ज्याला शब्द दिला त्याचे काम कधी अपूर्ण ठेवले नाही. आज पक्षात तुम्ही प्रवेश केलात मात्र माझ्याकडून कधी भेदभाव होणार नाही अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज दिली. आज […]

अधिक वाचा..

काँग्रेस पक्ष राज्यात ‘संविधान बचाव’ व ‘सद्भावना यात्रा’ काढणार; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार राज्यात संविधान बचाव यात्रा तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित सद्भावना यात्रा काढण्यात येणार आहेत. २९ एप्रिलला नाशिक येथे सद्भावना यात्रेचे आयोजन केले असून १ मे रोजी सद्भावना सत्याग्रह तर ४ व ५ मे रोजी परभणी येथे सद्भावना यात्रा व संविधान बचाव यात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रदेश […]

अधिक वाचा..

महाविद्यालयातील तसेच शाळेतील तरुणींना कोणी त्रास देत असेल तर त्याची गाठ महाराष्ट्र पोलिसांशी आहे

बीड: धाराशिव येथे मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या साक्षी कांबळे प्रकरणात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज बीडमध्ये पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी कुटुंबीयांच्या मागण्या ऐकून घेत त्यांना मानसिक आधार दिला, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचा विश्वास दिला. या प्रकरणातील आरोपीस जामीन मिळाल्याने कुटुंबात संतापाची लाट उसळली आहे. […]

अधिक वाचा..