देशविरोधी बोलणाऱ्यांना २० वेळा नाही तर २०० वेळा रोखू; डॉ. श्रीकांत शिंदे

लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मांडली रोखठोक भूमिका नवी दिल्ली: भारत विरोधी आणि लष्कराच्या विरोधात जर कोणी बोलण्याची हिंमत केल्यास आमच्याकडून २० वेळा नाही तर २०० वेळा रोखलं जाईल, असा इशारा शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी यांना दिला. लोकसभा अध्यक्षांविरोधात इंडि आघाडीने आणलेल्या अविश्वास ठरावाला खासदार डॉ. शिंदे यांनी विरोध […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना ‘क्लायमेट क्वेस्ट’द्वारे हवामान शिक्षण; शालेय शिक्षण विभागाचा केंब्रिजसोबत करार

मुंबई: पर्यावरण आणि हवामान बदलाबाबत विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने Cambridge University Press & Assessment इंडिया यांच्या सहकार्याने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. ‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ या ई-लर्निंग उपक्रमासाठी शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हवामान शिक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रालयात झालेल्या […]

अधिक वाचा..

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त मेघदूत येथे अभिवादन

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आज मुंबई येथील मेघदूत निवासस्थानी पार पडला. या कार्यक्रमात स्व. बाळासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे , विधानसभेचे अध्यक्ष राहुल नारावेकर , विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक […]

अधिक वाचा..

शीतगृह कंटेनर विद्युत जोडणी शुल्कात ८०% सवलत; अडकलेल्या फळ-भाजी निर्यातदारांना दिलासा

मुंबई: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर बंदरांमध्ये अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यात कंटेनरांबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून शीतगृह कंटेनरच्या विद्युत जोडणी शुल्कात ८० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच साठवण/थांबा कालावधी शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले असून जहाज उपलब्ध होईपर्यंत साठवणूक सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे […]

अधिक वाचा..

संदीप शेळके शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये; सपकाळ यांचा फडणवीसांना ‘गेट वेल सून’ टोला

मुंबई: बुलढाणा जिल्ह्यातील धडाडीचे नेते संदीप शेळके यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.यावेळी सपकाळ यांनी शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला अखिल […]

अधिक वाचा..

LPG बुकिंगचे नवे नियम; दुसरा सिलिंडर आता २५ दिवसांनीच बुक करता येणार

नवी दिल्ली : मध्य-पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन व्यवस्थेवर दबाव येऊ नये आणि साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने घरगुती LPG सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केला आहे. Ministry of Petroleum and Natural Gas कडून दिलेल्या माहितीनुसार आता दोन सिलिंडर बुकिंगमधील किमान कालावधी २५ दिवस करण्यात आला आहे. यापूर्वी हा कालावधी २१ दिवसांचा होता. नव्या नियमानुसार ग्राहकांना दुसरा सिलिंडर […]

अधिक वाचा..

अमेरिका–इराण युद्धाचा भारतावर परिणाम; गॅस महागला, उद्योग ठप्प, स्मशानभूमीही बंद

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या US–Iran conflict चा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे. आखाती प्रदेशातील वाढत्या तणावामुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला असून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. या संकटाचा परिणाम केवळ स्वयंपाकाच्या गॅसपुरता मर्यादित न राहता उद्योग, बाजारपेठ आणि अगदी स्मशानभूमीपर्यंत पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव; गॅस […]

अधिक वाचा..

महिलांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत; शक्ती कायदा लवकरच; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विधानपरिषदेत दिली. महिलांच्या सुरक्षेसह सन्मान, संधी आणि सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महिला दिनानिमित्त विधानपरिषदेत झालेल्या विशेष चर्चेला उत्तर देताना पवार […]

अधिक वाचा..

कट मारल्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; महिलेसह दोन अल्पवयीनांवर गुन्हा

पुणे: शहरातील कोंढवा परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दुचाकी चालवताना ‘कट’ मारल्याच्या वादातून ही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे.या प्रकरणी एका महिलेसह दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहेत. या घटनेमुळे भाग्योदयनगर परिसरात काही काळ खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी […]

अधिक वाचा..

नाथषष्ठीच्या उत्सवात दुर्दैव! गोदावरीत बुडून वारकऱ्याचा मृत्यू

पैठण: पैठण येथे सुरू असलेल्या संत एकनाथ महाराज षष्ठी महोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच आज सकाळी गोदावरी नदीपात्रात दुर्दैवी घटना घडली. सिल्लोड तालुक्यातील एका ६० वर्षीय वारकऱ्याचा पवित्र स्नानासाठी नदीत उतरले असताना बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील श्री क्षेत्र मुक्ताई संस्थान (हाळदा) येथील दिंडी […]

अधिक वाचा..