राम मंदिर देणगी प्रकरणी पारदर्शक चौकशीची काँग्रेसची मागणी

मुंबई: अयोध्येतील राम मंदिरासाठी प्राप्त झालेल्या देणग्या, निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांबाबत स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक ॲड. श्रीनिवास बिक्कड यांनी केली आहे. बिक्कड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या मतलेखात राम मंदिर हे कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचे प्रतीक असल्याने मंदिराशी संबंधित प्रत्येक आर्थिक व्यवहार पारदर्शक असणे आवश्यक असल्याचे […]

अधिक वाचा..

शिवसेनेकडून संजय राठोड यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी; विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई: शिवसेनेचे नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय दुलीचंद राठोड यांच्यावर शिवसेनेने विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २३ जून २०२६ रोजी जारी केलेल्या नियुक्तीपत्राद्वारे ही नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या हिरक महोत्सव मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

अधिक वाचा..

अधिकारी मॅनहोलमध्ये पडल्यानंतर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या पाहणीदरम्यान एका अधिकाऱ्याचा उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याच्या घटनेनंतर पालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर टीका करत स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. ॲड. मातेले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी […]

अधिक वाचा..

दुर्गम हिवाळी पाडा शाळेचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले कौतुक; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील हिवाळी पाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी कौतुक केले. त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अध्ययनाचा आढावा घेतला आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. सकाळी ९ ते रात्री ९ अशा तब्बल १२ तास कार्यरत असलेल्या या शाळेत शेती, परसबाग, […]

अधिक वाचा..

कर्जमाफी नव्हे, शेतकऱ्यांची कर्जवसुली योजना; सरकारची दिशाभूल; अंबादास दानवे

मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी नसून कर्जवसुली योजना असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केला. या योजनेतील १७ जाचक अटींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील, असा दावा त्यांनी केला. महाराष्ट्र विधान परिषदेत नियम २६० अंतर्गत […]

अधिक वाचा..

शालेय शिक्षण विभाग राज्यातील सर्वाधिक भ्रष्ट विभाग; लोकसेवा हक्क कायद्याची पायमल्ली – आमदार सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील शालेय शिक्षण विभाग हा सर्वाधिक भ्रष्ट विभाग बनला असून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची सर्रास पायमल्ली केली जात असल्याचा गंभीर आरोप आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत केला. शिक्षण विभागातील प्रशासकीय कामकाज, ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी, प्रलंबित प्रकरणे आणि वाढत्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला धारेवर धरले. प्रश्न क्रमांक ४ वर बोलताना तांबे म्हणाले की, महसूल […]

अधिक वाचा..

खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी; पत्रकार संघाची मागणी

मुंबई: नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत वापरलेल्या आक्षेपार्ह, अवमानकारक आणि असंसदीय भाषेचा मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र निषेध केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना खासदार पाटील यांनी “माझे काय करायचे ते करा, समोर पोलीस आहेत, कमिशनरकडे तक्रार करा” अशा स्वरूपाची भाषा वापरल्याचा आरोप संघाने केला आहे. लोकप्रतिनिधींना […]

अधिक वाचा..

संविधान रक्षणासाठी संघर्षाची तयारी ठेवा; अनुसूचित जातींची भूमिका महत्त्वाची; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात असून संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने संघर्ष करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. मुंबईतील टिळक भवन येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त चेअरमन अनिरुद्ध वनकर यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, […]

अधिक वाचा..

संजय राऊतांविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार; खासदार ज्योती वाघमारे

नवी दिल्ली: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांबाबत खासदार डॉ. ज्योती सावित्री नग्नाथ वाघमारे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे (NCW) अधिकृत तक्रार दाखल केली आहे. राऊत यांच्या गेल्या चार वर्षांतील वादग्रस्त विधानांची दखल घेऊन त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे. खासदार […]

अधिक वाचा..

पत्रकारांशी झालेल्या वादाबाबत खासदार संजय पाटील यांची जाहीर माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जाहीर दिलगिरी व्यक्त करत संपूर्ण माध्यम क्षेत्राची माफी मागितली आहे. वादाच्या प्रसंगी अनवधानाने वापरलेल्या अपशब्दांबद्दल खेद व्यक्त करत त्यांनी आपल्या राजकीय भूमिकेवर टीका करण्यास हरकत नसली तरी कुटुंबीयांना आणि दिवंगत वडिलांना राजकारणात ओढू नये, अशी भावनिक विनंती केली. पत्रकारांशी संवाद साधताना संजय पाटील म्हणाले […]

अधिक वाचा..