जेजुरीच्या विकासासाठी श्रद्धा आणि समाजसुधारणेचा समतोल आवश्यक; डॉ. नीलम गोऱ्हे

जेजुरी: जेजुरी देवस्थानच्या प्रगती व सर्वांगीण विकासासाठी राज्य स्तरावर अनेक बैठका घेण्यात आल्या असून, श्रद्धेला धक्का न लावता सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात आला आहे, असे प्रतिपादन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. जेजुरी येथे श्री खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी श्री खंडोबाची विधिवत पूजा करून राज्यातील जनतेच्या […]

अधिक वाचा..

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही काळ तिच्या कुटुंबीयांची धावपळ उडाली होती. मात्र जेजुरी पोलिसांच्या तत्परता, संवेदनशीलता आणि मानवतेमुळे या घटनेचा सुखद शेवट झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जवळी येथील भाविकांचा एक गट श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी येथे आला होता. त्यांच्यासोबत तीन वर्षांची स्वरांशी […]

अधिक वाचा..

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विविध विधानांवर जोरदार टीका केली. देशातील गरिबी निर्मूलन झाल्याचा दावा करताना मोदी सरकारकडून ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य दिले जात […]

अधिक वाचा..

सामाजिक न्याय की राजकीय गणित? जाहिरातीतील एका चौकटीने पेटवला नवा वाद!

मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या ओळींतूनही राजकीय भूकंपाचे संकेत मिळू लागले आहेत.सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेश जाहिरातीत अनुसूचित जाती (SC) या वर्गासोबत “मांग” आणि “मेहतर” अशा स्वतंत्र नोंदी दिसल्या आणि राज्याच्या सामाजिक-राजकीय पटावर नव्या चर्चेला तोंड फुटले.महाराष्ट्रात कागदावरील एका शब्दाचेही राजकारण होते. एखादी नवी […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात प्रथमच PLFS आणि ASUSE सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

नवी मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राज्यात प्रथमच राबविण्यात येणाऱ्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) आणि असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT) येथे आयोजित विभागीय प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली. कोकण व पुणे विभागातील क्षेत्रीय कामासाठी नियुक्त अन्वेषक आणि […]

अधिक वाचा..

एकल मातांच्या पाल्यांसाठी उच्च शिक्षणात नवा मार्ग; प्रवेश अर्जात स्वतंत्र ‘एकल पाल्य’ रकाना

मुंबई: राज्यातील एकल मातांच्या पाल्यांना उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात विविध सवलती, प्राधान्य व शैक्षणिक सुविधा मिळवून देण्यासाठी तसेच अशा विद्यार्थ्यांची अचूक नोंद ठेवण्यासाठी महाविद्यालयीन प्रवेश अर्जात ‘एकल पाल्य’ असा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सकारात्मक पावले उचलली आहेत. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री […]

अधिक वाचा..

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा वाढता प्रभाव; विकासाभिमुख कामांमुळे जनाधार मजबूत

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर शिवसेनेने केवळ विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपुरते आपले अस्तित्व मर्यादित ठेवले नसून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भक्कम संघटनात्मक ताकद निर्माण केली आहे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर पक्षाने मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी निवडून आणत विकासाभिमुख राजकारणाचा ठसा उमटविला आहे. शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून शाखा आणि उपशाखांच्या माध्यमातून तळागाळातील […]

अधिक वाचा..

महिला सेनेचा ‘शिवदुर्गा-शिवसंवाद’ दौरा १५ जूनपासून

११ जिल्ह्यांतील ८३ मतदारसंघांचा संघटनात्मक आढावा मुंबई: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला सेनेतर्फे १५ ते १६ जूनदरम्यान राज्यव्यापी ‘शिवदुर्गा-शिवसंवाद’ दौरा आयोजित करण्यात आला आहे. महिला सेनेच्या वरिष्ठ नेत्या तीन स्वतंत्र टीमद्वारे ११ जिल्ह्यांतील ८३ विधानसभा मतदारसंघांचा दौरा करून संघटनात्मक आढावा घेणार आहेत. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना नेत्या […]

अधिक वाचा..

नटराजन यांची नोटीसच रद्द! राज्यसभा निवडणूक पुन्हा घ्या, भाजपावर ‘सीटचोरी’चा आरोप

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द करून भाजपाने आणि निवडणूक आयोगाने खासदारकी पदरात पाडून घेतल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ज्या नोटीसच्या आधारे नटराजन यांचा अर्ज बाद करण्यात आला होता, ती नोटीसच तेलंगणातील न्यायालयाने रद्द केल्याने आता राज्यसभा निवडणूक रद्द करून […]

अधिक वाचा..

कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासह रखडलेल्या विकासकामांना गती देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवसेना कुर्ला विधानसभा आयोजित ‘कुर्ला फेस्टिव्हल २०२६’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आमदार मंगेश कुडाळकर यांच्या विकासाभिमुख कार्याचे कौतुक करताना, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून […]

अधिक वाचा..