अजितदादांच्या दूरदृष्टीला समर्पित अर्थसंकल्प; विकसित महाराष्ट्राचा पाया; सुनिल तटकरे

मुंबई: यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित करून विकसित महाराष्ट्राचा पाया रचणारा ठरल्याबद्दल महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी अभिनंदन करत आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प मांडला आहे. त्याच धर्तीवर विकसित महाराष्ट्राचा वेध घेणारा आणि पायाभरणी करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे तटकरे […]

अधिक वाचा..

हा महाराष्ट्राचा नव्हे, MMRDA चा अर्थसंकल्प;  विजय वडेट्टीवर यांची सरकारवर उपरोधिक टीका

मुंबई: विधानसभेत सादर करण्यात आलेला राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचा आणि आकड्यांचा मारा असून त्यातून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आली आहे, अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.राज्य सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य २०४७ मध्ये होईल, असा टोला लगावत त्यांनी सरकारवर उपरोधिक निशाणा साधला. अर्थसंकल्पातील त्रुटींवर बोट ठेवताना वडेट्टीवार […]

अधिक वाचा..

UPSC 2025 मध्ये ‘मनोबल’चा दबदबा! 19 विद्यार्थ्यांचे यश; दृष्टिबाधित रवी राज दिव्यांगांमध्ये देशात अव्वल

8 दिव्यांग विद्यार्थ्यांची कर्तबगारी; सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कामगिरी पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या UPSC 2025 नागरी सेवा परीक्षेत दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकल्पातील 19 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे यामध्ये 8 दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांपैकी दृष्टिबाधित रवी […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ पत्रकार संजीवन ढेरे यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

मुंबई: मुंबईतील आघाडीच्या दैनिकांमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार संजीवन ढेरे (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सांगली जिल्ह्यातील कुच्ची गावाहून मुंबईतील माझगाव येथे स्थायिक झालेल्या ढेरे यांनी काही काळ हिंदुस्थान लेव्हर या कंपनीत नोकरी केली होती. आपल्या मिश्कील आणि हजरजबाबी स्वभावामुळे ते कंपनीत […]

अधिक वाचा..

विकसित महाराष्ट्र नव्हे, घोषणांचा महाराष्ट्र! राज्याच्या अर्थसंकल्पावर अमोल मातेले यांची घणाघाती टीका

मुंबई: महाराष्ट्र सरकारने सादर केलेला 2026 चा अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राचा नसून “घोषणांचा महाराष्ट्र” घडविण्याचा अर्थसंकल्प असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे. सरकारने अर्थसंकल्पात प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभांची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात हा अर्थसंकल्प “नाव मोठे […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा! फडणवीसांच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला प्राधान्य

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना कृषी क्षेत्राला मोठे प्राधान्य दिले. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी स्वीकारली. विशेष म्हणजे राज्याच्या इतिहासात अर्थसंकल्प सादर करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात […]

अधिक वाचा..

सामाजिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी हाती धरला भगवा

नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा गटातील विविध पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश  मुंबई: नाशिक जिल्ह्यातील येवला लासलगाव विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा गटाच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी […]

अधिक वाचा..

शेखचिल्लींच्या विकासात गुदमरतेय मुंबई; निसर्ग, नागरिक आणि नियोजनाचा प्रश्न

मुंबई: मुंबईच्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या अनियोजित बांधकामांमुळे शहराचा नैसर्गिक समतोल ढासळत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. खारफुटींचा नाश, मोकळ्या जागांचे कमी होत चाललेले प्रमाण आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा व भविष्यातील अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये वाढत आहे. मुंबई विकास आराखडा २०३४ अंतर्गत शहराचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा सुधारणा […]

अधिक वाचा..

वाहतूकदारांनी राज्यव्यापी संप मागे घेतला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची यशस्वी शिष्टाई मुंबई: अन्यायकारक इ-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन देत तसेच वाहतूकदारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच पोलीस व परिवहन विभागाची संयुक्त बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती दिल्यानंतर राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना ग्लोबल करिअरची संधी! जर्मन-जपानी भाषा प्रशिक्षणासाठी करार

मुंबई: अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील कौशल्ये प्राप्त व्हावीत तसेच परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई यांच्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थित सामंजस्य करार डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ,मुंबई येथे करण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणूगोपोल […]

अधिक वाचा..