सतेज बंटी पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी नियुक्ती

मुंबई: राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व विधान परिषद सदस्य सतेज बंटी पाटिल यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गो-हे यांनी आज सभागृहात त्यांच्या निवडीची घोषणा केली सतेज बंटी पाटील हे यांनी कोल्हापूर जिल्हयात पक्ष संघटना वाढीस चालना दिली […]

अधिक वाचा..

विमा कंपन्यांशी बोलून लवकर भरपाई देता येईल का?

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची कृषिमंत्री मा. अब्दुल सत्तार यांना सूचना मुंबई: शेतकरी अपघाती विमा अंतर्गत विमा कंपनीकडून मिळणारी भरपाईसाठी जवळपास सात वर्षे थांबायला लागते. त्याकरता विमा कंपनी आणि गृहविभागाशी बोलून लवकरात लवकर विम्याचा मोबदला देता येईल का यासाठी प्रयत्न करण्याची सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना केली. […]

अधिक वाचा..

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी पॅनल स्थापन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे स्वागत…

मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी करावी असे महत्त्वाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले असून या निर्देशाचे स्वागत करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचा हा एक ऐतिहासिक निर्णय असून त्यामुळे लोकशाही आणखी […]

अधिक वाचा..

के. जे. सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थी मारहाण प्रकरणी कार्यवाही करण्यात येणार…

मुंबई: “के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनांच्या शिबिरासाठी गेले असता प्राध्यापकाने मारहाण केली असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची चौकशी तातडीने चौकशी पूर्ण करून दोषींवर कार्यवाही करण्यात येईल,” असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. विधानसभा सदस्य सर्वश्री छगन भुजबळ, ॲड. आशिष […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करणार; रवींद्र चव्हाण

मुंबई: पुणे जिल्ह्यातील हवेली व वेल्हे तालुक्यातील पुणे-खडकवासला, डोणजे- रोजणे रस्ता आणि डोणजे- कोंढणपूर खेड शिवापूर रस्त्यांची अपूर्ण कामे काँक्रिटीकरण करून लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ला आणि पानशेतकडे जाणाऱ्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जांच्या कामाबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित […]

अधिक वाचा..

कसबा पेठेत जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला…

मुंबई: कसबा पेठ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय खूप बोलका आहे. हा विजय राज्यातील व देशातील जनता बदलाच्या दिशेने विचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी पक्षाने विजयासाठी सर्व गैरमार्गाचा वापर करुनही कसबा पेठेत जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला आहे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. यासंदर्भात […]

अधिक वाचा..

आमच्या मविआने व्हॅटच्या किमती कमी करुन राज्यातील जनतेला दिलासा द्या…

मुंबई: महाविकास आघाडी सरकारने व्हॅटच्या किमती कमी करून गॅसची किंमत आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसा प्रयत्न करून उपमुख्यमंत्री राज्यातील जनतेला दिलासा देतील का? असा थेट प्रश्न माजी मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात केला. आमदार जयंत पाटील यांनी पॉईंट ऑफ प्रोसीजरनुसार राज्यातील गॅस दरवाढ व वीज प्रश्न या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सभागृहाचे लक्ष वेधले. मागील वर्षभरात केंद्रसरकारने […]

अधिक वाचा..

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मुलुंड विभागात कुसुमाग्रज जयंती साजरी     

मुंबई: दर वर्षी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहलायाच्या मुलुंड विभागातर्फे येथे ग्रंथालायच्या जागेत मुलुंड येथे कुसुमाग्रज जयंती/ मराठी भाषा दिन  साजरा होतो. यावर्षी या कार्यक्रमात कार्याध्यक्ष शं रा पेंडसे यांच्या ”सत्पत्री दान या कथासंग्रहाचे प्रकाशन कोणाही ”सेलिब्रेटी”च्या हस्ते न करता मुलुंड विभागाचे कार्यवाह महेश कवटकर यांच्या हस्ते करून एक नवीन पायंडा पाडला. याप्रसंगी मुंबई मराठीग्रंथसंग्रहालया च्या शतकोत्तर […]

अधिक वाचा..

कसब्यातील विजयानंतर शिंदे – फडणवीसांवर जयंत पाटील यांचा हल्लाबोल…

मुंबई: ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आले, ज्याप्रमाणे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्यात आली, या सर्व गोष्टींचा निषेध जनतेने केला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान कसबा येथून भाजपची पकड सुटली आहे, फडणवीस आणि शिंदेंना जनतेने पूर्णपणे नाकारले आहे असा टोलाही जयंत पाटील […]

अधिक वाचा..

ज्यांनी हक्कभंग दाखल केला ते वादी असतात तेच समितीत हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून नाही

मुंबई: विधीमंडळात ज्यांनी खासदारांच्या वक्तव्यावर हक्कभंग दाखल केला त्याच सदस्यांना हक्कभंग समितीमध्ये घेण्यात आले हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाला धरून नसल्याने ही समिती पुनर्गठीत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात पॉईंट ऑफ प्रोसीजरनुसार केली. विधानसभेचे कामकाज खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या मुद्द्यावरून बुधवारी दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले होते. आज सभागृह सुरू होताच […]

अधिक वाचा..