बोगस बियाणे, खते विक्री विरोधात कडक कायदा करणार; धनंजय मुंडे

मुंबई: राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या काही जणांवर अलीकडे कारवाई झाली आहे. मात्र बोगस बियाणे-औषधे विक्री करणाऱ्यांविरोधातील अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून चालू पावसाळी अधिवेशनातच बोगसगिरी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा अधिक कडक कायदा अस्तित्वात आणला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या […]

अधिक वाचा..

पक्ष एकसंघ रहावा यादिशेने पवारसाहेबांनी विचार करावा

मुंबई: पक्ष एकसंघ रहावा यादिशेने पवारसाहेबांनी विचार करावा, अशी विनंती कालही आणि आजही केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना दिली. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि मी रविवार (दि. 16) रोजी आम्ही शरद पवारसाहेब यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे शेतकरीविरोधी ट्रिपल इंजिन सरकार; नाना पटोले

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी भाजपाप्रणित शिंदे सरकारला घेरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव आणला होता पण सरकारने शेतकऱी प्रश्नांवर बोलू दिले नाही. बोगस बियाणामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे पण सरकार फक्त कडक कायदा करु म्हणत वेळ मारुन नेत आहे.राज्यातील भाजपाप्रणित तिघाडी सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार आहे, असा घणाघात […]

अधिक वाचा..

शेतकरी संकटात; सरकार मात्र सत्तेत मदमस्त

मुंबई: ​जुलैचा तिसरा आठवडा उलटूनही राज्यात अनेक भागांमध्ये पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. दुबार तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही संकटाची घडी आहे त्यामुळे विधानसभेतील कामकाज थांबवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने चर्चा करण्याची मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली. विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बाळासाहेब थोरात यांनी […]

अधिक वाचा..
ishwar gaykar

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याची टोमॅटो विकून 2.8 कोटी रुपयांची कमाई!

शिरूरः पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने महिनाभरात टोमॅटोची विक्री करुन तब्बल 2.8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ईश्वर गायकर (वय ३६, रा. पाचघर) असे शेतकऱ्याचे नाव आहे. 12 एकरावर सध्या टोमॅटोचं पीक असून सध्याच्या दरवाढीमुळे गायकर कुटुंबाचं टोमॅटोचं पिक म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी ठरत आहे. गायकर कुटुंब हे मुळचं पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या १ वर्षांत कक्षाकडून १०,५०० पेक्षा अधिक गोरगरीब […]

अधिक वाचा..

राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने विविध शिफारशी केल्या आहेत. त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शीघ्र कृती समिती आणि ‘पीएम मित्रा’ च्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल, तसेच या ठिकाणी येणाऱ्या उद्योजकांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून उद्योजकांना कुठलीही अडचण […]

अधिक वाचा..

जनतेच्या प्रश्नावर शिंदे सरकारला अधिवेशनात जाब विचारु; नाना पटोले

मुंबई: पावसाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न घेऊन भाजपाप्रणित शिंदे सरकारला काँग्रेस पक्ष प्रश्न विचारेल. शेतकरी, कामगार, गरिब, महिला, कायदा व सुव्यवस्था, महागाई, तरुणांचे प्रश्न आहेत. राज्यातील सध्याचे सरकार शेतकरी विरोधी आहे. त्यांना शेतकरी व जनतेच्या प्रश्नांची त्यांना चाड नाही. महागाई वाढली आहे, शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, बेरोजगारी वाढली आहे, यासह जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांवर सरकारला अधिवेशनात प्रश्न […]

अधिक वाचा..

नवीन सांस्कृतिक धोरण निश्चितीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येईल

नवी दिल्ली: मराठी भाषिक केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देश-विदेशात वास्तव्यास असून मराठी संस्कृतीचे जतन व संवर्धन करीत आहेत तसेच अन्य भाषिकांपर्यंत आपली संस्कती पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. नवीन सांस्कृतिक धोरण निश्चितीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सांगितले. राजधानी स्थित महाराष्ट्र सदनच्या बॅंक्वेट हॉलमध्ये महाराष्ट्र सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीची […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचे क्रांतिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जागे व्हा…

मुंबई: माध्यमकर्मीसाठी  बदललेल्या काळ आणि परिस्थितीनुसार पत्रकार धोरण, पत्रकार सर्वसुरक्षा आणि सर्वसामावेशक हितासाठी लोकशाहीच्या इतर तिन्ही स्तंभाप्रमाणे त्यांच्या सन्मानासाठी निवृत्तीनंतर आणि काम करतानाही हितकारक कृती होण्याची गरज होती व आहे. मात्र आपल्या राज्यातील एकूणच स्वार्थी अराजकी पाहता कोणत्याही राजकारण्याला अथवा आपणास पत्रकारांसाठी सर्वसामावेशक अशी ठोस भूमिका घेण्याची गरज वाटत नाही असे दिसून येते. जर राज्यकर्तेच […]

अधिक वाचा..