विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का?

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात असून त्यांचा घातपात करण्याचा डाव समोर आला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मारण्याची सुपारी देण्यात आल्याचे समजते. असे प्रकार राज्यात वाढत असून विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे. […]

अधिक वाचा..

मॅनहटन कम्युनिटी कॉलेज समवेत करार…

कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास होईल मदत मुंबई: मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरो सोबतच्या करारामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण कमी खर्चात उपलब्ध होणार असून कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास आणि रोजगार उपलब्ध होण्यास देखील निश्चितच मदत होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी […]

अधिक वाचा..

कोश्यारी यांच्या वक्तव्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही…

मुंबई: महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पायउतार झाल्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. त्यांचे वक्तव्य राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे. वास्तविक राज्यपाल पदाची जबाबदारी स्वीकारल्यावर भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करणे, राज्य शासनास वेळोवेळी मार्गदर्शन करणे अशा अनेक गोष्टी भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून अपेक्षित होत्या. […]

अधिक वाचा..

बेरोजगारीने बेजार झालेल्या तरुणांच्या पदरी पुन्हा निराशा टाकण्याचे पाप सरकारने करू नये…

पुणे: MPSC अभ्यासक्रमात अचानक होणारा बदल हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. सरकारने याची नोंद घ्यावी आणि बेरोजगारीने बेजार झालेल्या तरुणांच्या पदरी पुन्हा निराशा टाकण्याचे पाप सरकारने करू नये अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. MPSC परीक्षेसाठीचा नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा […]

अधिक वाचा..

झी, सोनी, स्टारचे चॅनेल झाले टीव्हीवरून गायब; जाणून घ्या कारण…

औरंगाबाद: डिस्नी स्टार इंडिया, झी एंटरटेनमेंट आणि सोनी यांनी त्यांच्या चॅनेलचे सिग्नल डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म ऑपरेटर्स (डीपीओ)बंद केले आहेत. ज्यांनी दूरसंचार नियामकाने अधिसूचित केलेल्या सुधारित नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO 3.0) च्या तरतुदीनुसार इंटरकनेक्शन करारावर स्वाक्षरी केलेली नाही त्या डिस्ट्रिब्युटर्सचे चॅनेल बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात असताना […]

अधिक वाचा..

पोलिस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ तारखेला होणार…

औरंगाबाद: पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेनंतर लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांमध्ये अजुनही संभ्रम आहे. लेखी परीक्षांच्या तारखा अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांकडून विचारणा करण्यात येत आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. एप्रिल महिन्यात लेखी परीक्षेची शक्यता मैदानी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या […]

अधिक वाचा..

जगाचे श्रद्धास्थान असलेल्या शिवनेरीवर झाला महाआरतीचा विश्वविक्रम

गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे: छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती असल्याने ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जगाचे श्रद्धास्थान मानला जाणाऱ्या शिवनेरीवर शिवाजी महाराजांच्या महाआरतीचा विश्वविक्रम झाला आहे. […]

अधिक वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. भालचंद्र भाटवडेकर यांची जयंती महानगरपालिकेत साजरी

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्‍या जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहातील त्यांच्या अर्धपुतळ्यास उप आयुक्त (परिमंडळ -२) रमाकांत बिरादार यांनी आज (दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३) सकाळी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच १८९८ ते १८९९ या कालावधीत तत्कालीन बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष असलेले आणि मुंबईच्या नागरी व प्रशासकीय जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे डॉ.भालचंद्र कृष्णा भाटवडेकर यांच्या […]

अधिक वाचा..

स्वाभिमानाचा आणि आत्मसिश्वासाचा हुंकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज; खासदार राहुल शेवाळे

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चेंबूर येथील आर सी एफ कर्मचारी संघ (बी एम एस ) या कामगार संघटनेच्या वतीने सिंहगड किल्ला ते चेंबूर अशी शिवज्योत आणण्यात आली. शिवज्योतीच्या आगमनाच्या प्रसंगी आर सी एफ चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास मुडगेरीकर, सुभेदार नरवीर तानाजी – सूर्याजी मालुसरे यांचे पोलादपूर तालुक्यातील वंशज रवींद्र मालुसरे, खासदार राहुल […]

अधिक वाचा..

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे शिवजयंती उत्सव संपन्न

मुंबई: हिंदवी स्वराज्याची स्वबळावर निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘शिवजयंती उत्सव’ छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते (दि. १९) फेब्रुवारी २०२३ पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार सदानंद सरवणकर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक […]

अधिक वाचा..