ज्येष्ठ समाजसेवक, निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर…

मुंबई: ज्येष्ठ समाजसेवक आणि निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली. 14 मे 1946 रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी […]

अधिक वाचा..

मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवार यांच्या निधनान मराठा चळवळीच खंबीर नेतृत्वं हरपल…

मुंबई: मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवार यांच्या निधनानं मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शशिकांत पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यशील असलेलं त्यांचं नेतृत्वं होत. महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात […]

अधिक वाचा..

राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश…

मुंबई: राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले. अमरावती जिल्ह्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. राज्यात स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करण्याचा निर्णय शासनाने यापुर्वीच घेतला आहे. दिव्यांग बांधवांच्या शैक्षणिक सोयीसाठी […]

अधिक वाचा..

वेदांत, शुभंकर व फर्नांडिस यांच्याकडून सुवर्णपदकांची अपेक्षा पूर्ती, जलतरणात पदकांचा चौकार

भोपाळ: महाराष्ट्राच्या वेदांत माधवन, शुभंकर पत्की, अपेक्षा फर्नांडिस यांनी सुवर्णपदकांची ‘अपेक्षा’ पूर्ण करताना सोनेरी हॅट्ट्रिकही नोंदविली. अर्जुनवीर गुप्ता या महाराष्ट्राच्या खेळाडूला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवसाची सुरुवातच वेदांत याने मिळविलेल्या सुवर्णपदकाने झाली. मुंबईच्या या खेळाडूने २०० मीटर फ्रीस्टाईलचे अंतर एक मिनिट ५५.३९ सेकंदात पार केले.‌ गतवर्षी डॅनिश खुल्या स्पर्धेत एक सुवर्ण […]

अधिक वाचा..

परदेशी उमेदवारांसाठी प्रवेश नोंदणी वेब पोर्टल विकसित

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दादा यांच्या हस्ते वेब पोर्टलचे उद्घाटन मुंबई: महाराष्ट्रातील विद्यापिठांतर्गत नामांकित संस्थामधुन राबविण्यात येणाऱ्या नाविण्यपुर्ण अभ्यासक्रमांची माहिती परदेशातील उमेदवारांना व्हावी, आणि त्यांची प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत www.mahacet.org हे वेब पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (दादा) […]

अधिक वाचा..

पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात नसून घातपात!

गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन सुत्रधारावरही कारवाई व्हावी… मुंबई: अन्यायाविरुद्ध लढणारा पत्रकार म्हणून ओळखले जाणारे दै. ‘महानगरी टाईम्स’चे झुंजार पत्रकार शशिकांत वारीशे यांची सुनियोजित हत्या करण्यात आली असून या हत्येचा एनयुजेमहाराष्ट्र तीव्र शब्दात निषेध करीत आहे. वारीशे हे सातत्याने रिफायनरी विरोधी जनमताचा आवाज बुलंद करीत होते. त्यांची शेवटची बातमी (दि. ६) फेब्रुवारी, […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांचा वरळी येथील कोळी बांधवांच्या वतीने नागरी सत्कार

कोळीवाड्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई: कोळीवाडे हे मुंबईचे वैभव आहे. कोळी बांधवांची संस्कृती जपण्यासाठी, ती वाढविण्यासाठी तसेच अनेक वर्षे मुंबईत राहणाऱ्या कोळी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कोळीवाड्याचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वरळी कोळीवाड्यातील मच्छिमार बांधवांसाठी १२० मीटरचा नेव्हीगेशन स्पॅन कायमस्वरुपी मिळवून दिल्याबद्दल वरळी कोळीवाडा येथे […]

अधिक वाचा..

मध्यमवर्गीय गृहिणीने मने जिंकली

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या नेहमीच पाचवारी साडीत असतात, कपाळावर कुंकू असते आणि घरातील ताई, माई, वहिनीच्या भूमिकेतून बोलत असतात. केंद्रीय अर्थमंत्रीपद अतिशय शक्तिशाली पद आहे. अर्थमंत्री म्हणून मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, डॉ. मनमोहन सिंग, यशवंत सिन्हा, पी. चिदंबरम, अरुण जेटली अशा अनेक दिग्गजांनी देशाचे अर्थसंकल्प सादर केले. पण तमिळ कन्या असलेल्या निर्मला सीतारामन […]

अधिक वाचा..

पोलिस भरतीची ‘लेखी परीक्षा’एप्रिलमध्ये होणार का…?

तृतीयपंथीच्या ’मैदानी’चे २८ फेब्रुवारीपर्यंत ठरणार निकष औरंगाबाद: राज्यात १८ हजार ३३१ पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील ‘मैदानी’चा पहिला टप्पा संपला आहे. परंतु, तृतीपंथींच्या मैदानी चाचणीचे निकष अजूनही निश्चित झाले नाहीत. त्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. ७२ तृतीयपंथींची मैदानी चाचणी रखडल्याने एक लाख ८४ हजार उमेदवारांची लेखी परीक्षा लांबणीवर पडली आहे. ‘मैदानी’त उत्तीर्ण झालेल्यांपैकी […]

अधिक वाचा..

राज्यात पहिल्यांदाच ITI मधील विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदेचे धडे, शासनाचा अभिनव पुढाकार

मुलूंड आयटीआय येथे पार पडली डक्सलेजीस संस्थेची कार्यशाळा मुंबई: चहाच्या कपाला रबर लावता येईल, खाली प्लेट लावता येईल, कपाचा पृष्ठभाग मोठा करता येईल, विद्यार्थी उत्साहात एकेक पर्याय सुचवित होते आणि अचानक ही संशोधक वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये कुठून आली या प्रश्नासह शिक्षकवृंदाच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव विलसत होते तर विद्यार्थ्यांना आपल्यातील संशोधकवृत्तीचा पहिल्यांदाच परिचय होत होता. गरम चहा […]

अधिक वाचा..