सर्वांनी एकत्रीतपणे केंद्र शासनाकडे राज्याच्या प्रलंबित प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा…

मुंबई: संसद सदस्य हे राज्याच्या विकासासाठी झटणारे आणि त्यासाठी देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महाराष्ट्राचा आवाज आहेत. हा आवाज जितका बुलंद तेवढ्या विकासाच्या योजना, निधी राज्यात येणार त्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा. सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारी यंत्रणा करतानाच महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्तांनी केंद्रीय मंत्रालय व राज्यातील विविध विभाग यातील दुवा म्हणून […]

अधिक वाचा..

सकारात्मक वातावरणाचा लाभ घेत खेळाडूंनी विक्रमी कामगिरी करावी

भोपाळ: देशामध्ये गेल्या पाच सहा वर्षात खेळासाठी अतिशय सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी आपल्या देशातील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी वैयक्तिक रित्या भेट घेत खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले आहे आणि खेळाडूंना काहीही कमी पडणार नाही याची हमी दिली आहे आता खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रमी कामगिरी केली पाहिजे असे आवाहन केंद्रीय […]

अधिक वाचा..

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांची सर्व खासदारांसोबतची बैठक म्हणजे वरातीमागून घोडे; महेश तपासे

मुंबई: केंद्रीय अर्थसंकल्पाला एक दिवस बाकी असताना विविध तरतुदींवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत महाराष्ट्राच्या सर्व खासदारांची बैठक बोलावणे म्हणजे वरातीमागून घोडे असेच म्हणावे लागेल अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प दिनांक १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. फक्त एक दिवस बाकी असताना, महाराष्ट्राच्या विकासासाठी खासदार केंद्रीय […]

अधिक वाचा..

संत तुकाराम महाराजांची बदनामी करणा-या भोंदू धीरेंद्र शास्त्रीने तात्काळ माफी मागावी…

मुंबई: दिव्यशक्ती आणि चमत्काराचा दावा करणा-या बागेश्वर धामचा भोंदू धीरेंद्र शास्त्री याने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून त्यांची बदनामी केली आहे. तुकाराम महाराजांबद्दल अपशब्द हा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राचा अवमान असून काँग्रेस पक्ष या भोंदू बाबाचा तीव्र निषेध करत आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, […]

अधिक वाचा..

डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

नाविन्यपूर्ण संकल्पना विद्यापीठाने राबवाव्यात; राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुंबई: डॉ. होमी भाभा यांनी विज्ञानाच्या प्रगतीला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. अणुशक्ती या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. या महान व्यक्तीचे नाव या विद्यापीठाला दिले. या नावाप्रमाणे विद्यापीठाने नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून उत्कृष्ट विद्यापीठ म्हणून लौकिक होईल अशी शैक्षणिक वाटचाल करावी, असे प्रतिपादन […]

अधिक वाचा..

ऐतिहासिक भारत जोडो यात्रेने द्वेषाला दूर करून देशाला प्रेमाने जोडले; नसीम खान

मुंबई: केंद्रातील सत्ताधा-यांनी देशात द्वेष पसरवून सामाजिक ध्रुवीकरण घडवून आणले आहे व त्यावर ते आपल्या राजकीय पोळ्या भाजत आहेत. द्वेषाच्या या वातावरणामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. भाजपाने आपल्या राजकीय फयद्यासाठी द्वेषाच्या माध्यमातून लोकांना विभाजीत करण्याचे काम केले. त्याविरोधात ‘नफरत छोडो, भारत जोडो’ असा नारा देत राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशाला पुन्हा […]

अधिक वाचा..

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त आयोजित परिषदेचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: भरडधान्य हे अन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत असून खाद्यपदार्थ म्हणून त्याची निवड करणे काळाची गरज आहे. भरडधान्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यासाठी भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. आज मुंबईत रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये दोन […]

अधिक वाचा..

मराठी संशोधन मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षाची होणार सांगता…

मुंबई: दादर (पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मराठी संशोधन मंडळाची स्थापना १ फेब्रुवारी १९४८रोजी झाली. ही संशोधन क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे जिचे २०२२-२३ हे अमृतमहोत्सवी वर्ष असून त्याची सांगता १ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. यंदाचे वर्ष हे मुंबई मराठीग्रंथसंग्रहालयाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे! वर्षभरात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाअंतर्गत मराठी संशोधन मंडळाचे […]

अधिक वाचा..

ठाण्यात बिरेवाडीच्या लेकीने उमटविला ठसा; १३ वर्षांपासून देतायेत प्रशिक्षण

मुंबई: फोर व्हीलर किंवा टू हिलर वाहन चालवायचं म्हटलं की, काही नियमावली असते. त्यासाठी वाहन चालवायचे धडे चक्क ग्रामीण भागातील महिला शेकडो विद्यार्थी अथवा विद्यार्थ्यांना देण्याच कार्य करत आहेत. गेल्या १३ वर्षांपासून ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये पारंगत असलेल्या ठाणेसारख्खा शहरात वर्षा मोटार ड्रायव्हिंग स्कूलची स्थापना करत शेतकरी कुटुंबातील सबळ व सक्षम महिला कृषीकन्या वर्षा संतोष पारधी यांनी […]

अधिक वाचा..