भाजपमध्ये मोठे फेरबदल! केशव उपाध्ये उपाध्यक्षपदी, नवनाथ बन यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपद

मुंबई: महाराष्ट्रातील निवडणुकांची रणधुमाळी ओसरताच भारतीय जनता पक्षने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल जाहीर केले आहेत. नव्या कार्यकारिणीत काही जुन्या चेहऱ्यांना नवी जबाबदारी देत तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या आठ वर्षांपासून पक्षाची भूमिका आक्रमक आणि अभ्यासू पद्धतीने मांडणारे केशव उपाध्ये यांची मुख्य प्रवक्तेपदावरून प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवनाथ बन […]

अधिक वाचा..

१६ मार्चला राज्यसभा रणधुमाळी; महाराष्ट्रातील ७ जागांसाठी महायुती-महाविकास आमनेसामने

मुंबई: भारत निवडणूक आयोग यांनी १० राज्यांतील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून महाराष्ट्रातील सात जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान, तर सायंकाळी ५ वाजता मतमोजणी केली जाणार आहे.महाराष्ट्रातील सध्याच्या संख्याबळानुसार सातपैकी सहा जागा सत्ताधारी महायुतीच्या खात्यात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे सत्ताधारी […]

अधिक वाचा..

कथित फसवणूक प्रकरणात अनिल अंबानी यांना मोठा झटका; मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती उठवली

मुंबई: रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या कर्ज खात्यांना ‘फ्रॉड’ म्हणून वर्गीकृत करण्याच्या कारवाईवर मिळालेला दिलासा अखेर मागे घेण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एकलपीठाने दिलेला स्थगिती आदेश रद्द करत बँकांची अपील मंजूर केली. त्यामुळे उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक आणि आयडीबीआय बँक यांनी एकलपीठाच्या आदेशाला आव्हान […]

अधिक वाचा..

दागिने हिसकावण्याच्या घटना वाढल्या; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

सांगली: सांगली शहरासह उपनगरांत घराच्या दरवाजावर थाप मारून किंवा बेल वाजवून दार उघडताच महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढण्याच्या घटना वाढल्या आहेत. सकाळी–सायंकाळी फिरायला बाहेर पडलेल्या महिलांनाही लक्ष्य केले जात आहे. ग्रामीण भागातही अशा प्रकारच्या चोरींची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. दार उघडण्यापूर्वी खात्री करा बेल वाजल्यानंतर बाहेर कोण आहे, व्यक्ती ओळखीची आहे का, […]

अधिक वाचा..

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याबाबत सरकारला ८ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने रस्ता उभारण्यात आलेल्या ठिकाणी त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा होऊनही तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा मुद्दा विधानपरिषद सदस्य हेमंत पाटील यांनी लक्षवेधी द्वारे विधान परिषदेत उपस्थित केला होता.“हा पुतळा नेमक्या किती दिवसांत उभारला जाणार?” असा प्रश्न त्यांनी सरकारकडे केला.यावर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना […]

अधिक वाचा..

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या प्रश्नांवर बेमुदत उपोषणाचा सहावा दिवस

कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत राहणारे नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर गेल्या सहा दिवसांपासून आझाद मैदान मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कल्याण च्या प्रमुख बाजारात आणि नागरिकांना गरज असल्या ठिकाणी मोफत सार्वजनिक सौचालय व मुतारी उभारण्यात यावी, रुक्मिणी बाई दवाखाना नागरिकांसाठी सुसज्ज करावेत ज्यानी […]

अधिक वाचा..

त्या आमदाराला दिली जीवे मारण्याची धमकी; १० कोटींच्या खंडणीसाठी आंतरराष्ट्रीय कॉल

मुंबई: अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देत १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी आज विधानसभेत दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित आमदारांना तात्काळ कडक सुरक्षा पुरवावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. वडेट्टीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की, १७ […]

अधिक वाचा..

शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारकडून पोलीस बळाचा वापर, शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्ती लाटण्याचा घाट

मुंबई: गेल्या २४ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात झालेली गारपीट आणि दुसरीकडे ‘शक्तिपीठ महामार्गा’साठी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, यावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची स्थिती मांडली. विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानीचा पाढा वाचताना वडेट्टीवार म्हणाले की नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर ,नांदेड ,परभणी भागात वादळी […]

अधिक वाचा..

संत गाडगे महाराज यांचा जीवन संदेश आचरणात आणणे काळाची गरज; महापौर रितू तावडे

मुंबई: संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, गोरगरीब रुग्णांची सेवा आणि निवारा या सेवाकार्यांवर दिलेला भर आजच्या काळात अधिक महत्त्वाचा आहे. त्यांचा जीवन संदेश प्रत्येकाने आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी केले. संत गाडगे महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स – […]

अधिक वाचा..

भेदभाव आणि द्वेषाच्या वातावरणात सौंदळा गावाने एकता, समता आणि बंधुत्वाचा संदेश दिला

अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावचा जातमुक्तीचा विचार राज्यभर पोहोचला पाहिजे मुंबई: सर्वत्र भेदभाव निर्माण करणारे, द्वेषाचे, भिती दाखवण्याचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे. जातीपातीच्या, धर्माच्या भिंती उभ्या करून माणसा-माणसातील प्रेम, जिव्हाळा संपवला जात आहे. सर्वत्र द्वेषाची भावना वाढीस जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावाने ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर करून एक वेगळा आदर्श […]

अधिक वाचा..