NEET घोटाळ्याने शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; क्लास संस्कृती, पेपरफुटी आणि धोरणांवर तीव्र संताप

मुंबई: देशातील NEET परीक्षेभोवती निर्माण झालेल्या वाद आणि कथित गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मध्य प्रदेशातील Vyapam Scam प्रकरणाची आठवण करून देत अनेक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि पालकांनी सध्याच्या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. स्पर्धा परीक्षांचे वाढते व्यापारीकरण, क्लासेसची वाढती पकड, सरकारी शाळा-महाविद्यालयांतील अपुरी […]

अधिक वाचा..

प्रबोध डावखरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई: कै. वसंत डावखरे यांचे चिरंजीव प्रबोध डावखरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. कै. वसंत डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी मोठे योगदान दिले होते. अनेक वर्षे त्यांनी विधानपरिषदेचे सभापती म्हणून काम पाहिले. “अजातशत्रू” म्हणून त्यांची ओळख होती, असे […]

अधिक वाचा..

मुंबईच्या ‘लालपरी’ची वेदना! बेस्टच्या निवृत्त कामगारांना न्याय कधी?

मुंबई: मुंबईची ओळख म्हटलं की लोकलसोबत डोळ्यांसमोर उभी राहते ती लाल रंगाची बेस्ट बस. पावसात, पूरस्थितीत, दंगलीत, महामारीत आणि संकटाच्या प्रत्येक काळात मुंबईकरांना आधार देणारी ही सेवा आज स्वतःच आर्थिक, प्रशासकीय आणि नैतिक संकटात अडकलेली दिसते. दुर्दैव म्हणजे, ज्यांनी आयुष्यभर ही व्यवस्था खांद्यावर वाहिली, त्या हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांना आज आपल्या हक्काच्या पैशांसाठी दारोदार फिरावे लागत […]

अधिक वाचा..

कल्याण रेल्वे अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

कल्याण: कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एका अल्पवयीन मुलीवर चाकू व कटरचा धाक दाखवून अत्याचार झाल्याच्या संतापजनक घटनेनंतर शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याला भेट देत संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच म्हणतात की, ‘महिलांचा अधिकार म्हणजेच महिलांचा सन्मान!’ त्यांच्या याच भूमिकेनुसार राज्यातील महिला व […]

अधिक वाचा..

मुंबई मेट्रोत युवक काँग्रेसची NEET पेपरफुटीविरोधात जनजागृती मोहीम; भाजप सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई मेट्रोमधून प्रवास करत NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबवली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटी रॅकेटविरोधात संताप व्यक्त करत भाजप सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांपर्यंत पोहोचत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी NEET पेपरफुटी […]

अधिक वाचा..

MH-CET परीक्षेतील कथित घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा; सचिन सावंत

मुंबई: देशभरात NEET पेपरफुटीमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असताना, महाराष्ट्रातील MH-CET परीक्षेतही गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी Sachin Sawant यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सावंत म्हणाले की, दहावी-बारावीमध्ये अत्यंत कमी गुण मिळवलेल्या अनेक विद्यार्थ्यांना MH-CET मध्ये १०० पर्सेंटाइल किंवा ९९.९ पेक्षा […]

अधिक वाचा..

मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला शिंदेंचा प्रतिसाद; दिल्ली दौऱ्यासाठी एअर इंडियाने प्रवास

मुंबई: पंतप्रधान यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री यांनी आज आपल्या नियोजित दिल्ली दौऱ्यासाठी खासगी विमानाऐवजी एअर इंडियाच्या प्रवासी विमानाने प्रवास केला. ते आज दुपारी ४ वाजताच्या विमानाने मुंबईहून दिल्लीला रवाना झाले. दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत मिशन अर्बन २.०’च्या विशेष आढावा बैठकीत सहभागी होण्यासाठी शिंदे दिल्लीला […]

अधिक वाचा..

कॉलेज-कोचिंग संगनमतावर कारवाईची मागणी; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची सकारात्मक भूमिका

मुंबई: राज्यभरात गाजलेल्या NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता आणि खासगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत चिंता व्यक्त होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मंत्रालयात भेट घेत कठोर कारवाईची मागणी केली. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील ज्युनिअर कॉलेज आणि […]

अधिक वाचा..

महागाई ही मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम; अतुल लोंढे

NEET विद्यार्थ्यांच्या मृत्यूंसाठी केंद्र जबाबदार  मुंबई: देशातील वाढती महागाई ही केवळ इराण युद्धामुळे नसून मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांतील चुकीच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांचा परिपाक असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते Atul Londhe यांनी केला आहे. तसेच NEET पेपरफुटीमुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या “सरकारने घेतलेले बळी” असल्याचे म्हणत केंद्रीय शिक्षण मंत्री आणि […]

अधिक वाचा..

दादा, जरा फोन बघाल का? माणुसकीच्या नावाखाली नवी डिजिटल फसवणूक; नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन

मुंबई: आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार, व्हिडिओ KYC आणि बायोमेट्रिक पडताळणी यांचा वापर झपाट्याने वाढत असताना सायबर गुन्हेगारांनीही फसवणुकीच्या नव्या पद्धती शोधल्या आहेत. “दादा, जरा फोन बघाल का?”, “OTP वाचून सांगा”, “फेस स्कॅन करा” अशा विनंत्यांच्या माध्यमातून नागरिकांची बायोमेट्रिक माहिती, आवाज आणि चेहऱ्याचे तपशील चोरून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. सायबर […]

अधिक वाचा..