विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता ‘मिशन मोड’वर

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक निर्देश मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करत आहे.. विशेषतः लोणेरे (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांच्या (DBATU) परीक्षा आणि निकाल प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी उच्च व […]

अधिक वाचा..

सरकार म्हणतं ‘सगळं आलबेल’, पण गॅसचा प्रश्न अजूनही धगधगताच!

मुंबई: देशात एलपीजी पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केंद्र व राज्य सरकारांकडून वारंवार केला जात असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या मनातील शंका आणि भीती अजूनही कायम आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे ऊर्जा बाजारावर परिणाम झाला असला, तरी भारतात गॅसचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पेट्रोलियम सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी एलपीजी तुटवड्याच्या अफवा फेटाळून लावत, सोशल […]

अधिक वाचा..

ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित; राज्यस्तरीय समितीची पहिली बैठक संपन्न

पुणे: गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुर्नगठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीची पहिली बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत जिल्हास्तरीय समित्यांचे स्वरूप लवकरच निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली. पुणे विधान भवनातील झुंबर सभागृहात झालेल्या या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी, आमदार आणि आरोग्य तज्ज्ञ […]

अधिक वाचा..

पुण्यात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह; नातेवाईकांवर गुन्हा दाखल

पुणे : बिबवेवाडी परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली […]

अधिक वाचा..

पुतळ्यांवरून वाद! महाराष्ट्रात वाढते तणावाचे राजकारण; नियम असूनही संघर्ष का?

अंजनगाव: महाराष्ट्रात महापुरुषांच्या पुतळ्यांवरून पुन्हा एकदा सामाजिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून मराठा आणि धनगर समाज आमनेसामने आले असून, परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. खेळोबा देवस्थानाजवळ पुतळा उभारण्यात आल्याने धनगर समाजाने आक्षेप घेतला आहे. ही जागा त्यांच्या देवस्थानाची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर मराठा समाजाचे प्रतिनिधी […]

अधिक वाचा..

महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी करणारा ASI अटकेत

अकोला: अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात घडलेल्या एका गंभीर आणि संतापजनक प्रकारामुळे राज्यातील पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस कोठडीत असलेल्या महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) राजेश जाधव याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक गुन्ह्यात अटकेत असलेल्या एका महिलेला […]

अधिक वाचा..

भोंदू अशोक खरातचा ‘डबल गेम’ उघड! आर्थिक गैरव्यवहारांसह शेतकरी फसवणुकीचाही संशय

नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणामुळे आधीच चर्चेत आलेल्या Ashok Kharat या भोंदू बाबाच्या अडचणी आता आणखी वाढताना दिसत आहेत. तपासादरम्यान त्याच्या आर्थिक व्यवहारांमध्येही मोठा गैरप्रकार झाल्याचा संशय समोर येत आहे. एसआयटीच्या (SIT) प्राथमिक तपासात धक्कादायक बाबी उघड होत आहेत. अनेक नागरिकांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचा गैरवापर करून खरातने विविध पतसंस्थांमध्ये शेकडो बँक खाती उघडल्याची शक्यता […]

अधिक वाचा..

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवा खुलासा; रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार

नाशिक: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत असून आता या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही कनेक्शन समोर आले आहे. तपासात त्यांच्या बहिणी प्रतिभा चाकणकर यांच्या नावाने नाशिकमधील पतसंस्थांमध्ये खाते असल्याचे उघड झाले आहे.पोलीस तपासानुसार, संबंधित खात्यांमधून ४० ते ५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली […]

अधिक वाचा..

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची वरवरची चौकशी नको, खरातची नार्को टेस्ट करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली तरच यातील अनेकांचे खरे चेहरे उघडे पडतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीच्या नावाखाली मलमपट्टी न करता अशोक खरातची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन […]

अधिक वाचा..

बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्यांच्या चढ-उतारासाठी ५० किलोची मर्यादा; जयकुमार रावल

मुंबई: जागतिक कामगार परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व राज्यातील माथाडी कामगाराची मागणी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्या – पिशव्यांच्या वजनाची मर्यादा ५० किलो पर्यंत करण्यात आली आहे. या निर्देशाची राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आदेश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. या अनुषंगाने पणन विभागाने […]

अधिक वाचा..