महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

  संरक्षण अधिकारी व भरोसा सेलच्या अधिकाऱ्यांची एकत्रित समन्वय बैठक घेण्याच्या सूचना मुंबई: महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलात आणणे आवश्यक आहे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाचे संरक्षण अधिकारी […]

अधिक वाचा..

परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात

बारावीच्या परीक्षेसाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा मुंबई: परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. त्यामुळे कोणतेही दडपण न घेता उत्सवाच्या भावनेने विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या […]

अधिक वाचा..

संकटातही संघटनशक्ती; पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय

पुणे: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. विशेषतः पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल कसा लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. अजित पवार 9 फेब्रुवारीला ‘कमबॅक’ करणार, अशा आशयाचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच प्रत्यक्ष निवडणूक निकालांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण […]

अधिक वाचा..

पन्हाळा–हातकणंगलेत राजकीय समीकरणे बदलली; सातवे–पोर्लेत राष्ट्रवादीचा गुलाल

कोडोली–कुंभोजमध्ये जनसुराज्यचा दबदबा पन्हाळा: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी पन्हाळा आणि हातकणंगले तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांना त्यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सातवे आणि पोर्ले मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा धक्का बसला आहे. मात्र, कोडोली, कुंभोज आणि टोप परिसरात जनसुराज्यने आपले वर्चस्व कायम राखत ताकद […]

अधिक वाचा..

मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा क्लीन स्वीप; सुनील शेळके यांच्या नेतृत्वावर मतदारांचा शिक्कामोर्तब

मावळ: मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत यश मिळवत आपले संघटनात्मक वर्चस्व कायम ठेवले आहे. मावळ जिल्हा परिषदेच्या पाचही जागांवर आणि पंचायत समितीच्या सर्व दहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या निकालामुळे स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून आमदार सुनील […]

अधिक वाचा..

खानापूर–विटा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचा झेंडा; जिल्हा परिषद–पंचायत समितीवर एकहाती सत्ता

सांगली: सांगली जिल्ह्यातील खानापूर–विटा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने खानापूर तालुक्यात एकहाती सत्ता मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व ४ जागा आणि पंचायत समितीच्या सर्व ८ जागांवर शिवसेना शिंदे […]

अधिक वाचा..

काँग्रेसचा धक्कादायक विजय; ऋषिकेश लाड यांनी धनश्री लाड यांचा पराभव करत वचपा काढला

कुंडल: कुंडल जिल्हा परिषद गटात काँग्रेसने मोठा राजकीय धक्का देत भाजपला पराभवाचा सामना करायला लावला आहे. काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश महेंद्र लाड यांनी भाजपच्या धनश्री शरद लाड यांचा पराभव करत लक्षवेधी विजय मिळवला. मागील निवडणुकीत धनश्री लाड यांचे पती व भाजप नेते शरद लाड यांनी ऋषिकेश लाड यांचे वडील महेंद्र लाड […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे कल स्पष्ट; भाजप आघाडीवर

सोलापुरात दिग्गजांच्या नातेवाईकांत रंगली चुरशीची लढत सोलापूर: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे कल हळूहळू स्पष्ट होत आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्हा परिषदेत भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप ७५ जागांवर आघाडीवर असून शिवसेना ४१, राष्ट्रवादी काँग्रेस ४६, काँग्रेस २२, ठाकरे गट १५ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ५ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, […]

अधिक वाचा..

राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी सुरू; पहिल्या कलात महायुतीची आघाडी

मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली आहे. शनिवारी झालेल्या मतदानात जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितींच्या 1,462 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीत एकूण 7,438 उमेदवार रिंगणात होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा […]

अधिक वाचा..