ठाकरे ब्रँडचा पराभव, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई: मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट मानल्या जाणाऱ्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल ठरलाय. ९ वर्षांपासून सत्तेत असताना आणि दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतरही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. प्रसाद लाड यांचे ७ तर शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक १४ जागांवर विजय मिळवला. मुंबईमध्ये ‘ठाकरे ब्रँड’चा २१-० असा धुव्वा उडाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची […]

अधिक वाचा..

सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुती सोबत विरोधी पक्षांनी ही मतदान करावे

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सोबत विरोधी पक्षातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या खासदारांनी मतदान करावे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवड […]

अधिक वाचा..

आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल’ म्हणत बाळासाहेब थोरातांना जीवे मारण्याची धमकी 

संगमनेर: संगमनेरमध्ये कीर्तनाच्या कार्यक्रमातून झालेले एक राजकीय वक्तव्य सध्या खूप चर्चेत आले आहे. आता ते वक्तव्य मोठ्या वादाला तोंड देत असून स्थानिक राजकारण तापले आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी थेट काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधत ‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल’ असे वक्तव्य केल्याने राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. शनिवारी रात्री घुलेवाडी येथे कीर्तनात […]

अधिक वाचा..

वसंतदादांनी तेव्हा शरद पवारांना फक्त मुख्यमंत्रीच केलं नाही तर ‘हा’ आशीर्वादही दिला…

सोलापूर: वसंतदादा पाटील यांचे सरकार शरद पवार यांनी त्या वेळच्या राजकीय परिस्थितीनुसार पाडले होते. पण त्यानंतर दहा वर्षांनी वसंतदादा पाटील यांनी शरद पवार यांना केवळ मुख्यमंत्रिपदच दिले नव्हते, तर राजकारणात इथून पुढे सर्व शक्ती आणि ताकद शरद पवारांच्या पाठीशी उभी करां, ते महाराष्ट्राचे भवितव्य घडवतील, असा आशीर्वादही दिला होता, त्यावेळी झालेल्या सभेचा मी साक्षीदार आहे, […]

अधिक वाचा..

पन्नास खोके म्हणताच शिंदेंच्या आमदाराची पत्नी संतापली

चित्रलेखा पाटलांना दिला धक्का, कार्यकर्त्यांची हमरातुमरी रायगड: जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस (Rain) कोसळतोय, सतत कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. पाली-खोपोली राज्य महामार्गावर पाली आंबा नदी पुलाजवळ पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसला असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तळी साचल्याने वाहतूक […]

अधिक वाचा..

ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंची मोठी कोंडी; भाजपने नेमका काय डाव खेळला?

मुंबई: भारतीय जनता पक्षाकडून सध्या एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. याचे उदाहरण आपण पाहिले तर अशा अनेक पदाधिकारी आणि नेत्यांच्या प्रवेश गेल्या काही काळात भाजपमध्ये झालेला आहे ज्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात निवडणूक लढवली आहे अथवा ते स्थानिक पातळीवर शिंदेंच्या नेत्यांचे कट्टर विरोधक आहेत.   पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात […]

अधिक वाचा..

INDIA कडून उपराष्ट्रपतिपदाची उमेदवारी जाहीर होताच सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर येत्या ९ सप्टेंबर रोजी या पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपाप्रणित एनडीएकडून (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपदीपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर […]

अधिक वाचा..

मोदी-शहांनी राजकीय शत्रूचं मन वळवलं, पण…

  मोदी-शहांनी राजकीय शत्रूचं मन वळवलं, पण काँग्रेसच्या ‘मास्टरस्ट्रोक’नं सगळं फिस्कटणार? ‘ मुंबई: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमुर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि रेड्डी असा लढत होणार आहे. पण रेड्डी यांची उमेदवारी केवळ निवडणुकीपुरती मर्यादीत नसून विरोधकांचा हा मास्टरस्ट्रोक […]

अधिक वाचा..

राज्यातल्या जनतेला मोठं गिफ्ट, मंत्रिमंडळ बैठकीत 4 धडाकेबाज निर्णय

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने आरोग्य विभाग, रुग्णालय तसेच कोल्हापुरातील औद्योगिक वसाहतीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील आरोग्यसेवेत सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बैठकीत मंत्रिमंडळाने एकूण चार महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांच्या माध्यमातून राज्यातील आरोग्य विभागाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. […]

अधिक वाचा..

मामाबरोबर भाचा मैदानात! त्यांनी केलेली टीका सामाजिक घडीला बदनाम करणारी आहे

संगमनेर: संगमनेरमधील कीर्तनात झालेल्या राजकीय गोंधळानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तापल्या आहेत. संग्रामबापू भंडारे महाराज यांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांवर टीका करताना, जीभ घसरली. नथूरामजी गोडसे होण्याची भाषा वापरली. भंडारे महाराज यांच्या भाषेवरून राज्यातील संपूर्ण काँग्रेस, थोरातांसाठी मैदानात उतरली आहे. तसेच थोरातांचे भाचे तथा नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी कीर्तनकार संग्रामबापू भंडारे महाराज यांना त्यांच्या […]

अधिक वाचा..