सरकार भिकारी आहे’ असे जर मंत्रीच म्हणत असतील तर हा असंवेदनशिलतेचा कळस

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिम्मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाही का?: हर्षवर्धन सपकाळ मुंबई: महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा व संस्कृती लाभलेली आहे पण तीच धुळीस मिळवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उचलला आहे काय ?, असा प्रश्न पडला आहे. फडणविसांच्या मंत्रिमंडळात एक एक नमुने म्हणजे माणिक, मोती अशी रत्नेच शोभावी अशी आहेत. राज्याचे […]

अधिक वाचा..

मोठा राजकीय भूकंप! 2 महिन्यात मोदी होणार उपराष्ट्रपती; बड्या नेत्याचं सूचक विधान

मुंबई: सोमवारी रात्री देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. सोमवारी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून तात्काळ प्रभावाने आपण पद सोडत आहोत, असं कळवलं. प्रकृतीसंबंधी समस्या आणि वैद्यकीय सल्ल्याचा संदर्भ देत धनखड यांनी राजीनामा देत असल्याचं सांगितलं. हा राजीनामा संविधानातील कलम 67 (अ) अंतर्गत कायदेशीर असून तो स्वीकारावा असं म्हटलं आहे. मात्र […]

अधिक वाचा..

शिंदेंना सांभाळून घ्या! थेट दिल्लीहून मेसेज, भाजपला नक्की कोणती भीती

नवी दिल्ली: एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या गाठीभेटी वाढत असताना दुसरीकडे शिंदेसेनेत अस्वस्थता पसरली आहे. शिंदेसेनेचे अने मंत्री, आमदार वादात अडकत चालले आहेत. त्यामुळे सत्तेत असलेल्या सेनेची गोची झाली आहे. विशेष म्हणजे अनेक प्रकरणांची चौकशी सुरु झालेली आहे. त्यातच गेल्या आठवड्यात पावसाळी अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाएकी दिल्लीला निघून […]

अधिक वाचा..

मी कोणाचा विनयभंग केला की चोऱ्यामाऱ्या? राजीनामा देण्यासारखं घडलं काय

मुंबई: सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ असो किंवा शेतकऱ्यांबद्दलची आक्षेपार्ह विधाने.. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना चर्चेत कसं रहायचं ते नीट समजतं. काही दिवसांपूर्वीच कोकाटे यांचा सभागृहात रमी ( पत्ते) खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी तो व्हिडीओ ट्विट केल्यावर प्रचंड खळबळ माजली, विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला, राज्यातील […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! पुण्यातील या विधानसभा मतदारसंघात होणार फेरमतमोजणी

पुणे: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं होतं. मात्र, या निवडणुकीत इव्हीएम मशीनवर अनेक प्रश्न उपस्थित करत मतांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केला होता. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणच्या मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवारांनी फेरमतदानाची मागणी केली होती.आता या विषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या 105 उमेदवारांनी फेर मतमोजणीची […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीला कंटाळून ७० ते ७५ टक्के खासदार, आमदार पक्ष सोडणार

मुंबई: उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीला कंटाळून लवकरच अनेक आमदार पक्षाला निरोप देतील. ठाकरे गटाचे ७० ते ७५ टक्के खासदार आणि आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, असा दावा शिवसेनेचे,(शिंदे गट,)उपनेते संजय निरुपम यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला. ठाकरे बंधूंवर टीका करताना म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेसशी युती करून बाळासाहेबांच्या विचारांविरुद्ध पाऊल उचलले आहे. त्याच […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचा नेता उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर

मुंबई: जगदीप धनखड उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार संभाव्य नावामध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. जर बागडे यांची या पदासाठी निवड झाली तर ते या पदावर […]

अधिक वाचा..

ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या, हे असं चालू देऊ शकत नाही; सरन्यायाधीशांनी कठोर शब्दांत फटकारले

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालय (ED) सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, हे असं चालू देऊ शकत नाही,” अशा कठोर शब्दांत आज सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले.वकिलांनी त्यांच्या क्लायंटना दिलेल्या सल्ल्यांवरून त्यांना समन्स पाठवण्यात आल्याच्या प्रकरणावर सुनावणी करताना सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी हे तीव्र निरीक्षण नोंदवलं.सरन्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांना सुनावले […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपतींनी दिला तडकाफडकी राजीनामा, ‘त्या’ एका प्रस्तावामुळे सरकार चिंतेत

मुंबई: देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना रविवारी घडली. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. ऑगस्ट 2028 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असतानाही त्यांनी 21 जुलै 2025 रोजी राजीनामा सादर केला. त्यांनी आपल्या पत्रात प्रकृतीच्या कारणांचा उल्लेख केला असला, तरी हा राजीनामा काही प्रस्तावामुळे सरकारची नाराजी वाढल्याचा परिणाम आहे, अशी जोरदार चर्चा राजकीय […]

अधिक वाचा..

ठाकरे ब्रँड संपणार नाही.! मंत्री प्रताप सरनाईक यांचे धक्कादायक विधान

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात भाषण करताना उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याचे आवाहन केले होते. त्यापाठोपाठ आता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात, असे सूचक विधान केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी एकीकडे भाषेचा वाद सुरू असताना दुसरीकडे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच […]

अधिक वाचा..