1 जानेवारीपासून पगार, कर्ज, रेशन आणि दैनंदिन खर्चाबाबत मोठे नियम बदलणार

औरंगाबाद: 1 जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी, कर्जदार, शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत. हे बदल थेट तुमच्या उत्पन्नावर, खर्चावर आणि आर्थिक नियोजनावर परिणाम करणारे असतील. 8 व्या वेतन आयोगाची शक्यता – पगारात मोठी वाढ 7 व्या वेतन आयोगाचा 10 वर्षांचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार 1 जानेवारी 2026 पासून […]

अधिक वाचा..

खा.चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखालील आजाद समाज पक्ष काँग्रेस सोबत फारकत घेणार 

मुंबई: मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस सोबत समाधानकारक चर्चा न झाल्याने खासदार अॅड चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखालील आजाद समाज पार्टीने काँग्रेस कडून फारकत घेण्याच्या तयारीत आहे.समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचे आदेश खासदार अॅड चंद्रशेखर आजाद यांनी महाराष्ट्रातील पदाधिका-यांना दिले आहेत. त्यांच्या आदेशानंतर आजाद समाज पार्टीच्या पदाधिका-यांनी प्रदेश स्तरावर हर्षवर्धन सपकाळ यांची तर मुंबई अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांची […]

अधिक वाचा..

मलठणमध्ये विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा लंपास झाल्याने वीजपुरवठा खंडित

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): मलठण (ता. शिरूर) येथे चोरट्यांनी गणपती माळ येथील विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा लंपास केल्याची घटना शनिवारी (ता. २७) उघडकीस आली. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. परिसरातील शेतीसाठी कृषीपंप सुरू असणे आवश्यक असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने पिके आणि जनावरांचा चारा वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर; पाण्याच्या प्रश्नावर निवडणुक पण पाण्याची जबाबदारी कोण घेणार…? शेतकऱ्यांचा राजकीय नेत्यांना थेट इशारा…?

पाबळ (तेजस फडके): आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची आणि शास्ताबाद या गावांचा ज्वलंत पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन ‘पाण्याच्या प्रश्नावर मतं घ्यायची, पण पाणी द्यायची जबाबदारी कुणाची…? असा थेट आणि आक्रमक सवाल शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांना केला आहे. प्रत्येक निवडणुकीत पाबळसह बारा गावांचा पाणीप्रश्न गाजवला जातो. मात्र निवडणुक संपताच […]

अधिक वाचा..

‘बेटी बचाओ’ ही भाजपाची पोकळ घोषणा, बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी भाजपा उभा

उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन मुंबई: उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा न्यायालयाने निलंबित केल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्नावसारख्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला दिलासा देणारी व्यवस्था भाजपच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. ‘बेटी बचाओ’ ही केवळ घोषणा असून प्रत्यक्षात भाजप बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी उभा […]

अधिक वाचा..

मुंबईत पीपल्स रिपब्लिकन पक्षाला महायुतीमध्ये हव्यात आठ जागा

निर्णयास विलंब होत असल्याने नाराजी  मुंबई: माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टीने मुंबईतून केवळ आठ जागांची मागणी करूनही अद्याप निर्णय होत नसल्याने या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीची उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती असून हा पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे.या पक्षाकडून मुंबईतून आठ तसेच […]

अधिक वाचा..

लाचलुचपत विरोधी ब्युरोची जनजागृती मोहीम; लाच देऊ नका, लाच घेऊ नका

शिरूर (अरुणकुमार मोटे): सरकारी नोकर किंवा लोकप्रतिनिधी यांनी कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे यांनी केले आहे. या जनजागृती मोहिमेअंतर्गत अॅन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी शिरूर तहसील कार्यालय, भुमिअभिलेख विभाग तसेच पंचायत समिती येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. लाचलुचपतविरोधी कायद्याबाबत माहिती देत “भ्रष्टाचारमुक्त […]

अधिक वाचा..
ajit pawar

पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी; अजित पवार

मुंबई: राज्यात सुमारे १७ हजार गावे सामुदायिक वन हक्क मिळण्यासाठी पात्र असून आतापर्यंत केवळ ५ हजार गावांना सामुदायिक वन हक्क देण्यात आले आहेत. उर्वरित गावांना सामुदायिक वन हक्क देण्यासंदर्भात आदिवासी विकास व अन्य सर्व संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने कार्यवाही करावी. वंचित आदिवासी, गरीब समाजाला सर्व योजनांचे लाभ द्यावेत. अंशतः वन हक्काच्या पात्र दाव्यांवर तातडीने सुनावणी घेऊन […]

अधिक वाचा..

मोदी सरकारकडून राष्ट्रीय शेठला कल्याणची ४५० एकर जमीनही बहाल

मुंबई: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांनी कुळकायदा, सिलिंग ऍक्ट आणून जमीनदारांकडील लाखो एकर जमीन सर्वसामान्य गरिब जनतेला दिली. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीतून लाखो भूमिहिनांना जमीन मिळवून दिली. आता मात्र चक्र उलटे फिरले असून मोदी सरकार राष्ट्रीय शेठसाठी गोरगरिबांच्या जमिनी हिरावून घेऊन आंदण देत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगरमध्ये काळा गणपती मंदिरासमोर कारने ५-६ जणांना चिरडले, एक जण जागीच ठार

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरतील सिडको भागातील काळा गणपती मंदिरासमोर एक भीषण अपघात घडला आहे, ज्यात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना एका भरधाव कारने चिरडले मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ५ ते ६ जणांना चिरडण्यात आले, त्यापैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर चार जण गंभीर जखमी असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे […]

अधिक वाचा..